शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
3
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
4
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
5
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
6
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
7
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
8
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
9
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
10
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
11
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
12
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
13
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
14
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
15
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
16
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
17
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
18
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
19
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
20
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 

जिल्ह्यातील नियमित कर्जदार अनुदानाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 05:00 IST

नियमित कर्जदारांना देखील कर्जमाफी करू अशा प्रकारची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. परंतु अद्याप काहीच निर्णय झाला नसल्याने आशेवर झुलवत ठेवले आहे.  आहे. त्यामुळे त्यांच्या पदरी निराशा आली आहे.  वेळप्रसंगी सावकारांचे कर्ज काढून काही शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्ज भरले आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका  शेतकऱ्यांना बसत आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांना न्याय मिळतो मग प्रामाणिक असणाऱ्या नियमित कर्जदारांना का लाभ  का नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया वंचित कर्जदार व्यक्त करीत आहेत. 

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे शासन निर्णयाकडे डोळे, रब्बी हंगामाला पैसे नाही

  लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर :  महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना सुरू होऊन सहा महिने झाले. मात्र या कर्जमाफीची पूर्ण प्रक्रिया पार पडलेली नाही. या कर्जमाफीत थकबाकीदारांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, नियमित कर्ज भरणारे सभासद कर्जमाफीच्या आशेवर झुलत आहेत.  शासनाने नियमित कर्जदारांसाठी प्रोत्साहनपर कर्जमाफी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी होत आहे.  नियमित कर्जदारांना देखील कर्जमाफी करू अशा प्रकारची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. परंतु अद्याप काहीच निर्णय झाला नसल्याने आशेवर झुलवत ठेवले आहे.  आहे. त्यामुळे त्यांच्या पदरी निराशा आली आहे.  वेळप्रसंगी सावकारांचे कर्ज काढून काही शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्ज भरले आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका  शेतकऱ्यांना बसत आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांना न्याय मिळतो मग प्रामाणिक असणाऱ्या नियमित कर्जदारांना का लाभ  का नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया वंचित कर्जदार व्यक्त करीत आहेत. कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची देखील परिस्थिती फार चांगली  नाही. परंतु या शेतकऱ्यांची मानसिकता सकारात्मक असल्याने कोणतेही अडचण आली तरी त्यांनी आपल्या कर्जाचा भरणा वेळेत केला आहे. तसेच डॉ.पंजाबराव देशमुख पीक प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्यासाठी काही शेतकऱ्यांनी वेळेत कर्जाची परतफेड केली आहे. परंतु शासनाने नियमित कर्जदारांसाठीची घोषणा अंमलात आणली नाही तर नियमित कर्जदारांची ही संख्या भविष्यात घटणार आहे. वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २००८ च्या कर्जमाफीत २० हजार अथवा कर्जाच्या २५ टक्के प्रमाणात कर्जमाफी मिळाली होती. याखेपेस मात्र योजनेची घोषणा होऊनही सरकारने शेतकऱ्यांना लाभ दिलेला नाही, अशा तक्रारी आहेत.

शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी केली. यामध्येही जे शेतकरी नियमित बँकेचे,सहकारी संस्थाचे कर्ज नियमित भरले त्याच्यासाठी प्रोत्साहन देण्याची घोषणा शासनाने केली. मात्र दिवाळी येऊनही शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली नाही. या हंगामात सोयाबीन, धान व कापुस उत्पादन रोगामुळे कमी येत आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होण्यास भर पडणार आहे.- प्रशांत कोल्हे, प्रगत शेतकरी,  वाहांनगाव,ता चिमूर

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी