शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

भरपाई देण्यास वेकोलिची टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2016 00:39 IST

वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या पोवनी खुल्या कोळसा खाणीकरीता गोवरी शेतशिवारातील चिंचोली नाल्यांचा ...

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना : नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेतसास्ती : वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या पोवनी खुल्या कोळसा खाणीकरीता गोवरी शेतशिवारातील चिंचोली नाल्यांचा प्रवाह बदलविल्यामुळे व नाल्याच्या काठावर मातीचे महाकाय ढिगारे उभे केल्यामुळे अल्पशा पावसामुळे सुद्धा कृत्रिम पूरस्थिती निर्माण होते. परिसरातील शेकडो एकरातील शेती पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेकोलिने नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिला. मात्र वेकोलिने नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना केली आहे.राजुरा तालुक्यातील सास्ती-गोवरी-पोवनी परिसरात मोठ्या प्रमाणात वेकोलिच्या कोळसा खाणी आहेत. नव्यानेच पोवनी-२ व पोवनी-३ अशा दोन कोळसा खाणीही सुरू झाल्या आहेत. वेकोलि कोळसा उत्पादनासाठी वाटेल तशा पद्धतीने प्रयत्न करीत असून नियमबाह्य व धोकादायक कामे करीत आहे. त्यात शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या जीवाचाही विचार केला जात नाही.वेकोलि कोळसा खाणीकरीता परिसरात असलेल्या नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह सुद्धा बदलविला आहे. नाल्याच्या काठावरच उत्खनन केलेले मातीचे महाकाय ढिगारे उभे केले आहे. त्यामुळे अल्पशा पावसामुळे सुद्धा कृत्रिम पूरस्थिती निर्माण होत असून गोवरी- पोवनी परिसरातील शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान होते. तर गोवरी गावात सुद्धा पाणी शिरून मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागतो. परंतु वेकोलि याकडे कमालीचे दुर्लक्ष करीत असून त्यावर कोणतीही उपाययोजना करीत नसल्याचे दिसून येत आहे.यावर्षीच्या हंगामात जून २०१५ ला कृत्रिम पूरस्थिती निर्माण होऊन परिसरातील दोनशे एकरातील लागवड केलेले पीक नष्ट झाले होते. त्यानंतर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी म्हणून वेकोलि व शासनाकडे मागणी केली होती. त्यानुसार उपविभागीय अधिकारी राजुरा यांनी परिसराचे सर्व्हेक्षण करुन शेतीचे नुकसान झालेल्या २९ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश नोव्हेंबर २०१५ ला वेकोलिला दिले होते. परंतु आजपर्यंत त्या शेतकऱ्यांना सदर नुकसान भरपाई मिळाली नसून शेतकरी नुकसान भरपाईच्या आशा बाळगून आहेत. २० जानेवारीला केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सुद्धा नुकसान भरपाई द्यावी असे पत्र वेकोलिला दिले आहे. परंतु वेकोलिने याकडे दुर्लक्षच केले आहे. (वार्ताहर)नियमांचे होत नाही पालनवेकोलिने कोळसा खाणीकरीता परिसरातील जिवंत नाल्यांचा प्रवाह बदलविला. सदर प्रवाह बदलविण्यासाठी रितसर शासनाची मंजूरी घेतली असली तरी परवानगी देताना जलसंधारण विभागाने घातलेल्या अटींचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. वळविलेल्या नाल्याची दरवर्षी पावसाळ्यापूर्वी गाळ काढणे, रुंदी व खोली नियमानुसार ठेवणे अशा विविध अटी आहेत. परंतु वेकोलि प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे परिसरात कृत्रिम पूरस्थिती निर्माण होत असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.वेकोलिने वळविलेल्या नाल्यामुळे मागील अनेक वर्षांपासून आमच्या शेतीचे नुकसान होत आहे. वेळोवेळी वेकोलि प्रशासन व शासनाकडे नुकसान भरपाई मागणी केल्या गेली. परंतु याकडे दुर्लक्षच होत गेले. यावेळी मात्र उपविभागीय अधिकाऱ्यांनी वेकोलिला आदेश देऊनही नुकसान भरपाई मिळाली नसल्याने वेकोलिची बळबजरी उघड झाली आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी.- रुपेश पाचभाई,शेतकरी गोवरी