शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
4
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
5
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
6
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
7
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
8
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
9
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
10
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
11
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
12
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
13
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
15
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
16
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
17
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
18
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
19
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
20
Microsoft Layoffs : एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

अवधी संपूनही रक्कम देण्यास टाळाटाळ

By admin | Updated: February 7, 2015 00:36 IST

आदर्श नागरी सहकारी पत संस्था चंद्रपूर शाखा घुग्घुसच्या अनेक खातेदारांच्या मुदत ठेव व पिग्मी खात्यातील रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

चंद्रपूर : आदर्श नागरी सहकारी पत संस्था चंद्रपूर शाखा घुग्घुसच्या अनेक खातेदारांच्या मुदत ठेव व पिग्मी खात्यातील रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात आहे. शाखा व्यवस्थापक अभिकर्त्याना जीवे मारण्याची देत आहे. अनेक संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारी देऊनसुद्धा कारवाई होत नाही आणि रक्कम परत करत नसल्याने त्रस्त झालेल्या अभिकर्ता व खातेदारांनी तत्काळ रक्कम परत न मिळाल्यास १४ फेब्रुवारीपासून घुग्घुस येथील गांधी चौकात आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा पत्रकार परिषदेतून दिला. यावेळी संस्थेचे अभिकर्ता नंदू सपाट, नंदू नंदवाणी, एस. पी. गेडाम, रामिलवार, खातेदार विनोद वैरागडे, डॉ. विलास बोबडे यांच्यासह अनेक खातेदार उपस्थित होते.आदर्श नागरी सहकारी संस्था चंद्रपूर शाखा घुग्घुसच्या चार अभिकर्त्यांनी विविध खातेदारांकडून लाखो रुपये जमा करुन संस्थेच्या कार्यालयात जमा केले. तशी खाते पुस्तकात नोंद आहे. अनेक खातेदारांच्या ठेवीची मुदत ठेवीचा अवधी संपून एक वर्ष झाले. मात्र सदर रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली जात आहे. अध्यक्ष, सचिव आणि संस्थेचे व्यवस्थापक राजेश कारकाळे यांनी या विषयात वेळकाढू धोरण स्वीकारले आहे, तर व्यवस्थापकाकडून जीवे मारण्याच्या धमक्या देत कुठे जायचे आहे, तेथे जा. अधिकारी आमचे आहेत, असे सांगितले जाते. याप्रकाराबाबत त्रस्त अभिकर्ता आणि खातेदारांनी ४ सप्टेंबरला घुग्घुस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता सहाय्यक निबंधक आर. टी. अगले यांच्याकडे अहवाल मागितला. मात्र चार महिने होऊनही तक्रारीची व पोलिसांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या मागितलेला अहवाल अद्यापही देण्यात आला नाही.सदर शाखा चंद्रपूर जिल्ह्यापुरती मर्यादित असली तरी संस्थेने यवतमाळ जिल्ह्यातील लोकांना खातेदार बनवून घेतले. त्यांच्या ठेवीची रक्कम मिळावी म्हणून अनेकदा चकरा मारल्या. नागपूर अधिवेशनाच्या काळात सहकार मंत्र्याचे लक्ष वेधले असता त्यांनी संस्थेच्या अध्यक्ष, सचिव आणि व्यवस्थापकांना बैठकीसाठी बोलावले मात्र हे अधिकारी बैठकीला उपस्थित झाले नाहीत, अशी माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली. या शाखेत एकूण १५० खातेदार असून त्यांची ३० लाखांपेक्षा अधिक रक्कम आहे. गेल्या काही दिवसांपासून सदर संस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावण्यात आल्याने खातेदारांची तारांबळ उडाली आहे. रक्कम परत न मिळाल्यास १४ फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे. यावेळी अनेक खातेदार उपस्थित होते. (वार्ताहर)