वनमंत्र्याकडे साकडे : आमदारांची मागणीगडचिरोली : गडचिरोली जिल्हा उद्योगविरहीत जिल्हा असून जिल्ह्यातील लोकांना वर्षातून एकदाच तेंदूपत्ता संकलनातून रोजगार मिळत असतो. परंतु तेंदूपत्ता हंगाम सुरूहोऊनही जिल्ह्यातील रेगडी, देवदा, बोलेपल्ली, गेदा, मक्केपल्ली, वेंगनूर या युनिटचा लिलाव झाला नाही. त्यामुळे परिसरातील लोकांना रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे. परिसरातील नागरिकांचे शिष्टमंडळाने आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांना भेटून आपल्या समस्या मांडल्या. जिल्ह्यातील तेंदूपत्ता युनिटचा लिलाव करून युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबतचे पत्र मुख्य वनसंरक्षक व वनमंत्री पतंगराव कदम यांच्याकडे दिले आहे.जिल्ह्यातील सर्व तेंदूपत्ता युनिटचा लिलाव करण्यात आला आहे. परंतु रेगडी, देवदा, बोलेपल्ली, गेदा, मक्केपल्ली, वेंगनूर या युनिटचा लिलाव झालेला नाही. तेंदूपत्ता हंगामाला सुरूवात झाली असल्याने परिसरातील नागरिकांवर तेंदूपत्ता रोजगारापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तेंदूपत्ता युनिटचा लिलाव त्वरित करण्याची मागणी परिसरातील शिष्टमंडळाने आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्याकडे केली.शिष्टमंडळात रेगडीचे सरपंच बाजीराव गावडे, माडे आमगावचे सरपंच मंचु पुंगाटी, बोलेपल्लीचे सरपंच मारोती कल्लो, गरंजीचे पोलीस पाटील चैतू हिचामी, वेंगनूरचे सरपंच मंगू कांदो, मोरखंडीचे सरपंच केसरी तेलामी, पडकोटोलाचे पोलीस पाटील प्रभाकर पडको, सुधाकर पोटावी, बाबुराव नरोटे, रमेश दमालवार, सुधाकर परमा, श्यामराव नरोटे, लालसू नरोटे, तेजराव नरोटे, सोमजी नरोटे, फकीरा दुर्वा, सोनु झोरे, मारोती मडावी, किशोर हिचामी, मधुकर कांदो आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील तेंदूपत्ता युनिटचा लिलाव करा
By admin | Updated: May 8, 2014 01:50 IST