शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

२२ पैकी १६ तेंदू घटकांचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 22:12 IST

मध्य चांदा वन विभागातील तेंदूपाने घटक २२ पैकी १६ घटकांचा लिलाव झाला असून उर्वरित सहा घटकांना कंत्राटदाराने खरेदी न केल्यामुळे ते जैसे थे आहे. विक्री झालेल्या १६ घटकांतून २२ हजार २० प्रमाणित गोणी तेंदूपाने गोरगरीब आदिवासी व इतर स्थानिक लोकांमार्फत गोळा केले जाणार आहे.

ठळक मुद्देमजुरांना दिलासा : मजुरांना पाच कोटी तर शासनाला चार कोटी मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : मध्य चांदा वन विभागातील तेंदूपाने घटक २२ पैकी १६ घटकांचा लिलाव झाला असून उर्वरित सहा घटकांना कंत्राटदाराने खरेदी न केल्यामुळे ते जैसे थे आहे. विक्री झालेल्या १६ घटकांतून २२ हजार २० प्रमाणित गोणी तेंदूपाने गोरगरीब आदिवासी व इतर स्थानिक लोकांमार्फत गोळा केले जाणार आहे. त्यापोटी मजुरांना जवळपास पाच कोटी रुपये मिळणार आहे. शासनालाही यातून चार कोटींची रायल्टी प्राप्त होणार आहे.तेंदूपाने घटक हंगाम दरवर्षी मे महिन्यात येतो. कंत्राटदार घटक खरेदी करून मे महिन्यात पाने गोळा करण्याचे कार्य करतात. यावर्षी शासनाने प्रति प्रमाणित गोणी म्हणजे एक हजार पुडे गोळा करण्याचा १८४५ रु. प्रमाणे दर निश्चित केला आहे. त्यामुळे कंत्राटदाराकडून गोरगरीब मजुरांना मजुरीपोटी सुमारे पाच कोटी रुपये नगदी स्वरुपात मिळणार आहे. तसेच विक्री रकमेतून शासनाकडून मजुरांना ८० टक्के रक्कम बोनसद्वारे मिळणार आहे.तेंदूपाने संकलनाचा सर्व व्यवहार वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या देखरेखीत होतो. तेंदूपाने हे नैसर्गिक उपज असल्यामुळे व वन विभागाला कोणताही खर्च करावा लागत नसल्याने शासन गोरगरीब मजुरांच्या हिताचा निर्णय घेवून सुमारे ८० टक्के रक्कम गोळा करणाºया मजुरांच्या बँक खात्यात दिवाळीची भेट म्हणून जमा करतात. एकंदरीत गोरगरीब मजुरांना १५ दिवसांच्या हंगामात हजारो रुपये कमाईचे हे साधन असल्यामुळे याची मजुरांना आतुरतेने प्रतीक्षा असते.यंदा पोंभूर्णा, कोठारी, गोंडपिपरी, बल्लारशाह, पळसगाव, देवाडा या सहा घटकांचा लिलाव न झाल्यामुळे तेथील गोरगरीब जनतेला रिकाम्या हाताने बसावे लागले आहे. त्यामुळे तेथील मजूरवर्गांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्याचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले आहे. तसेच पेसा कायद्याअंतर्गत या वन विभागातील लक्कडकोट, अंतरगाव, कन्हारगाव, लाम्बोरी येथील तेंदूपाने ग्रामपंचायतीला मिळत असून त्यापासून गावाच्या विकास कामासाठी खर्च केला जातो.असे चालते कामतेंदू हंगाम हा दरवर्षी ठरल्यावेळेस सुरू होते. या हंगामासाठी गोरगरीब जनता आतूरतेने वाट पाहत असतात. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती तेंदूपाने गोळा करण्यासाठी हातभार लावतात. पहाटे ४ वाजता उठून जंगलात जावून सकाळी १० वाजेपर्यंत पाने गोळा करतात. त्यानंतर घरी येवून ७० पानांचे पुडे तयार करतात व सायंकाळी कंत्राटदाराच्या निर्धारित संकलन केंद्रावर पोहचता करतात. त्यानंतर कंत्राटदार नगदी रक्कम मजुरांना देतो.