शहरं
Join us  
Trending Stories
1
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
2
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
3
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
4
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
5
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
7
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
8
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
9
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
10
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
11
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
12
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
13
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
14
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
15
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
16
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
17
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
18
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
19
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
20
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
Daily Top 2Weekly Top 5

२२ पैकी १६ तेंदू घटकांचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 22:12 IST

मध्य चांदा वन विभागातील तेंदूपाने घटक २२ पैकी १६ घटकांचा लिलाव झाला असून उर्वरित सहा घटकांना कंत्राटदाराने खरेदी न केल्यामुळे ते जैसे थे आहे. विक्री झालेल्या १६ घटकांतून २२ हजार २० प्रमाणित गोणी तेंदूपाने गोरगरीब आदिवासी व इतर स्थानिक लोकांमार्फत गोळा केले जाणार आहे.

ठळक मुद्देमजुरांना दिलासा : मजुरांना पाच कोटी तर शासनाला चार कोटी मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : मध्य चांदा वन विभागातील तेंदूपाने घटक २२ पैकी १६ घटकांचा लिलाव झाला असून उर्वरित सहा घटकांना कंत्राटदाराने खरेदी न केल्यामुळे ते जैसे थे आहे. विक्री झालेल्या १६ घटकांतून २२ हजार २० प्रमाणित गोणी तेंदूपाने गोरगरीब आदिवासी व इतर स्थानिक लोकांमार्फत गोळा केले जाणार आहे. त्यापोटी मजुरांना जवळपास पाच कोटी रुपये मिळणार आहे. शासनालाही यातून चार कोटींची रायल्टी प्राप्त होणार आहे.तेंदूपाने घटक हंगाम दरवर्षी मे महिन्यात येतो. कंत्राटदार घटक खरेदी करून मे महिन्यात पाने गोळा करण्याचे कार्य करतात. यावर्षी शासनाने प्रति प्रमाणित गोणी म्हणजे एक हजार पुडे गोळा करण्याचा १८४५ रु. प्रमाणे दर निश्चित केला आहे. त्यामुळे कंत्राटदाराकडून गोरगरीब मजुरांना मजुरीपोटी सुमारे पाच कोटी रुपये नगदी स्वरुपात मिळणार आहे. तसेच विक्री रकमेतून शासनाकडून मजुरांना ८० टक्के रक्कम बोनसद्वारे मिळणार आहे.तेंदूपाने संकलनाचा सर्व व्यवहार वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या देखरेखीत होतो. तेंदूपाने हे नैसर्गिक उपज असल्यामुळे व वन विभागाला कोणताही खर्च करावा लागत नसल्याने शासन गोरगरीब मजुरांच्या हिताचा निर्णय घेवून सुमारे ८० टक्के रक्कम गोळा करणाºया मजुरांच्या बँक खात्यात दिवाळीची भेट म्हणून जमा करतात. एकंदरीत गोरगरीब मजुरांना १५ दिवसांच्या हंगामात हजारो रुपये कमाईचे हे साधन असल्यामुळे याची मजुरांना आतुरतेने प्रतीक्षा असते.यंदा पोंभूर्णा, कोठारी, गोंडपिपरी, बल्लारशाह, पळसगाव, देवाडा या सहा घटकांचा लिलाव न झाल्यामुळे तेथील गोरगरीब जनतेला रिकाम्या हाताने बसावे लागले आहे. त्यामुळे तेथील मजूरवर्गांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्याचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले आहे. तसेच पेसा कायद्याअंतर्गत या वन विभागातील लक्कडकोट, अंतरगाव, कन्हारगाव, लाम्बोरी येथील तेंदूपाने ग्रामपंचायतीला मिळत असून त्यापासून गावाच्या विकास कामासाठी खर्च केला जातो.असे चालते कामतेंदू हंगाम हा दरवर्षी ठरल्यावेळेस सुरू होते. या हंगामासाठी गोरगरीब जनता आतूरतेने वाट पाहत असतात. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती तेंदूपाने गोळा करण्यासाठी हातभार लावतात. पहाटे ४ वाजता उठून जंगलात जावून सकाळी १० वाजेपर्यंत पाने गोळा करतात. त्यानंतर घरी येवून ७० पानांचे पुडे तयार करतात व सायंकाळी कंत्राटदाराच्या निर्धारित संकलन केंद्रावर पोहचता करतात. त्यानंतर कंत्राटदार नगदी रक्कम मजुरांना देतो.