शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

गावातील हालचालींवर राजकीय नेत्यांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:24 IST

चंद्रपूर : कोरोनाच्या संकटात रखडलेल्या जिल्ह्यात ६२८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका घोषित झाल्या. १५ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, ग्रामपंचायत ...

चंद्रपूर : कोरोनाच्या संकटात रखडलेल्या जिल्ह्यात ६२८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका घोषित झाल्या. १५ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आता गावातील वातावरण चांगलेच तापायला लागले आहे. विविध पदांवर असलेले अनेक पदाधिकारी आपापल्या गावातील राजकीय हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. आपलाच कार्यकर्ता निवडणुकीत जिंकून यावा, यासाठी प्रत्येक जण कामाला लागला आहे.

ग्रामपंचायत निवडणूक ग्रामीण भागात प्रतिष्ठेची मानली जाते. पूर्वी गावात राजकीय पक्षांचा हस्तक्षेप नव्हता. त्यामुळे गावातील नेतेच आपापले पॅनल लढवून निवडणूक लढवायचे. आताही तेच आहे. मात्र गावांकडे राजकीय नेत्यांनी लक्ष देणे सुरू केले आहे आणि प्रत्येक गावात आपल्या पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

सदस्यांसाठी सातवी उत्तीर्णची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांना निवडणुकीपूर्वीच माघार घ्यावी लागली., तर काही पॅनलना उमेदवार शोधताना चांगलीच धावपळ झाली. दरम्यान, उद्या अर्ज मागे घेण्याची तारीख असल्याने काहींनी मनधरणीही करणे सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणूक गावातील अतिशय प्रतिष्ठेची समजली जाते. गावाचा विकास यावरच निवडणूक लढविली जाते. त्यामुळे जो विकास करेल तोच निवडून येतो. मात्र गावात ज्यांचे राजकीय वजन जास्त त्याच नेत्याची चलती बघायला मिळत आहे. जिल्ह्यात ६२८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडत आहेत. त्यासाठी प्रशासनानेही तयारी सुरू केली आहे. कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही पार पडले आहे.

-----

इच्छुकांची मनधरणी सुरू

चंद्रपूर : ६२८ ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून गावातील राजकीय वातावरण तापायला लागले आहे. दरम्यान, उद्या ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी केली जात आहे. काही गावात अविरोध निवडणूक होण्याची स्थिती असतानाही ऐनवेळी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे हे उमेदवार अर्ज मागे घेतात की निवडणूक लढवितात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, गावातील गटातटात राजकीय आखाडे रंगत आहेत.

---

जिल्ह्यातील बहुतांश गावामध्ये दोनच पॅनल निवडणूक लढवीत आहे. त्यामुळे थेट आमने-सामने उमेदवार आहेत. तर काही गावात तिहेरी निवडणूक रंगणार आहे. दरम्यान, राजकीय पक्षांचा हस्तक्षेप झाल्यामुळे या निवडणुकीला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे.