शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
3
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
4
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
5
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
6
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
7
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
8
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
9
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
10
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
11
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
12
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
13
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
14
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
15
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
17
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
18
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
19
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
20
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस

गावातील हालचालींवर राजकीय नेत्यांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:24 IST

चंद्रपूर : कोरोनाच्या संकटात रखडलेल्या जिल्ह्यात ६२८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका घोषित झाल्या. १५ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, ग्रामपंचायत ...

चंद्रपूर : कोरोनाच्या संकटात रखडलेल्या जिल्ह्यात ६२८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका घोषित झाल्या. १५ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आता गावातील वातावरण चांगलेच तापायला लागले आहे. विविध पदांवर असलेले अनेक पदाधिकारी आपापल्या गावातील राजकीय हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. आपलाच कार्यकर्ता निवडणुकीत जिंकून यावा, यासाठी प्रत्येक जण कामाला लागला आहे.

ग्रामपंचायत निवडणूक ग्रामीण भागात प्रतिष्ठेची मानली जाते. पूर्वी गावात राजकीय पक्षांचा हस्तक्षेप नव्हता. त्यामुळे गावातील नेतेच आपापले पॅनल लढवून निवडणूक लढवायचे. आताही तेच आहे. मात्र गावांकडे राजकीय नेत्यांनी लक्ष देणे सुरू केले आहे आणि प्रत्येक गावात आपल्या पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

सदस्यांसाठी सातवी उत्तीर्णची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांना निवडणुकीपूर्वीच माघार घ्यावी लागली., तर काही पॅनलना उमेदवार शोधताना चांगलीच धावपळ झाली. दरम्यान, उद्या अर्ज मागे घेण्याची तारीख असल्याने काहींनी मनधरणीही करणे सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणूक गावातील अतिशय प्रतिष्ठेची समजली जाते. गावाचा विकास यावरच निवडणूक लढविली जाते. त्यामुळे जो विकास करेल तोच निवडून येतो. मात्र गावात ज्यांचे राजकीय वजन जास्त त्याच नेत्याची चलती बघायला मिळत आहे. जिल्ह्यात ६२८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडत आहेत. त्यासाठी प्रशासनानेही तयारी सुरू केली आहे. कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही पार पडले आहे.

-----

इच्छुकांची मनधरणी सुरू

चंद्रपूर : ६२८ ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून गावातील राजकीय वातावरण तापायला लागले आहे. दरम्यान, उद्या ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी केली जात आहे. काही गावात अविरोध निवडणूक होण्याची स्थिती असतानाही ऐनवेळी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे हे उमेदवार अर्ज मागे घेतात की निवडणूक लढवितात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, गावातील गटातटात राजकीय आखाडे रंगत आहेत.

---

जिल्ह्यातील बहुतांश गावामध्ये दोनच पॅनल निवडणूक लढवीत आहे. त्यामुळे थेट आमने-सामने उमेदवार आहेत. तर काही गावात तिहेरी निवडणूक रंगणार आहे. दरम्यान, राजकीय पक्षांचा हस्तक्षेप झाल्यामुळे या निवडणुकीला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे.