शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

उपस्थिती भत्त्याला विद्यार्थिंनी मुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 15:05 IST

Chandrapur news, school, girl, student यावर्षी अद्यापही शाळाच सुरु झाली नसल्याने शैक्षणिक वर्षात ७५ टक्के उपस्थिती होणार नसल्याने उपस्थिती भत्त्यापासून विद्यार्थिंनी वंचित राहणार आहे.

ठळक मुद्देशाळा सुरु न झाल्याने संभ्रम७५ टक्के उपस्थिती अनिवार्य

 लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : समाजातील दुर्बल घटकातील मुलींना शाळेत येण्यास प्रोत्साहन मिळावे, शिक्षणामध्ये सातत्य टिकावे यासाठी इयत्ता पहिली ते चवथीमध्ये शिकणाऱ्या शासकीय, निमशासकी शाळेतील विद्यार्थिंनींना उपस्थिती भत्ता दिली जातो. महागाई वाढत असली तरी भत्ता कमी असल्यामुळे नाराजी आहे. मात्र, यावर्षी अद्यापही शाळाच सुरु झाली नसल्याने शैक्षणिक वर्षात ७५ टक्के उपस्थिती होणार नसल्याने उपस्थिती भत्त्यापासून विद्यार्थिंनी वंचित राहणार आहे.मुली शिक्षणापासून वंचित राहू नये, त्यांची पटसंख्या वाढावी तसेच शाळेतील विद्यार्थिंनींची संख्या टिकून राहावी यासाठी राज्य शासनाने १९९२ ला ही योजना सुरु केली. योजनेनुसार संबंधित विद्यार्थिंनींना शैक्षणिक वर्षामध्ये किंमान ७५ टक्के उपस्थिती राहणे गरजेचे आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील मुलींचे शाळेत येण्याचे प्रमाण बरेच वाढले. मात्र यावर्षी सप्टेंबर महिना संपत असतानाही शाळा सुरू झाल्या नाही. त्यामुळे भविष्यात शाळा सुरु झाली तरीही शासन नियमाप्रमाणे ७५ टक्के उपस्थिती होणार नसल्याने विद्यार्थिंनी या भत्ताला मुकावे लागणार आहे. त्यामुळे शासनाने यामध्ये बदल करणे गरजेचे आहे.भत्ता वाढविण्याची मागणी२८ वर्षापूर्वी शासनाने ही योजना सुरु केली. त्यावेळी एका दिवसासाठी एक रुपया उपस्थिती भत्ता दिल्या जात होता. आता सर्वत्र महागाई वाढली आहे. त्यामुळे आजच्या काळात एका रुपयात काहीच होत नसल्याने या भत्त्यामध्ये वाढ करण्याची मागणी शिक्षकांसह सामाजिक संघटनांनी ही केली आहे.या योजनेंतर्गंत विद्यार्थिंनींना शैक्षणिक वर्षात ७५ टक्के उपस्थिती राहणे अनिवार्य आहे. मात्र कोरोनामुळे यावर्षी शाळा अद्यापही सुरु झाल्या नसल्याने भत्तापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. शासनाने योजनेचे स्वरुप बदलवून आणि भत्त्यामध्ये वाढ करून देणे गरजेचे आहे.-जे.डी. पोटेशिक्षण समिती सदस्य, जि.प.चंद्रपूर

टॅग्स :Studentविद्यार्थी