शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

दोन दिवसांत २० पर्यटकांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 05:00 IST

कारवा सफारीची माहिती देताना वन परीक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी सांगितले की बल्लारपूरपासून कारवा वनपरीक्षेत्र अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर आहे. तर चंद्रपूरपासून १९ किमी अंतरावर आहे. मध्य चांदा  वन विभागात कारवा हे आदिवासीबहुल गाव आहे. जंगलाच्या कुशीत सामावलेले आहे. या वनक्षेत्रात वाघ, बिबट, रानगवे, अस्वल, रानमांजर, हरीण चितळ, सांबर, नीलगाय, चौसिंगा, रानकुत्रे या सोबतच २०० पक्षी व फुलपाखरे बघण्याचा आनंद सफारी करणाऱ्यांना लुटता येणार आहे.

मंगल जीवनेलोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये बंद झालेले कारवा येथील देशातील पहिले सफारी पर्यटन ८ महिन्यानंतर पुन्हा २५ डिसेंबरपासून सुरू झाले आहे. दोन दिवसांत २० पर्यटकांनी हजेरी लावली आहे. पहिल्याच दिवशी वाघाने दर्शन दिल्यामुळे पर्यटक जाम खूश आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून बल्लारशाह वन परिक्षेत्रातील सफारी करण्यासाठी जनताही उत्सुक आहे. कारवा सफारीची माहिती देताना वन परीक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी सांगितले की बल्लारपूरपासून कारवा वनपरीक्षेत्र अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर आहे. तर चंद्रपूरपासून १९ किमी अंतरावर आहे. मध्य चांदा  वन विभागात कारवा हे आदिवासीबहुल गाव आहे. जंगलाच्या कुशीत सामावलेले आहे. या वनक्षेत्रात वाघ, बिबट, रानगवे, अस्वल, रानमांजर, हरीण चितळ, सांबर, नीलगाय, चौसिंगा, रानकुत्रे या सोबतच २०० पक्षी व फुलपाखरे बघण्याचा आनंद सफारी करणाऱ्यांना लुटता येणार आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी न्यायधीश अजय भटेवरा यांनी वाघाचे दृश्य टिपले. यामुळे पर्यटकांची उत्सुकता वाढली आहे.याशिवाय ५० किमीचे जुने बैलगाडी आणि कूप रस्त्याचा वापर करून पर्यटन रस्ते तयार करण्यात आले. सफारी पर्यटनासाठी अनेक कक्षातील मार्गावर कारवा रोपवाटिकापर्यंत रस्त्याचे जाळे तयार करण्यात आले आहे. तरीही प्रायोगिक तत्त्वावर एसयूव्ही खासगी वाहनांना प्रवेश देण्यात येत आहे. प्रवेश शुल्क व गाईड शुल्क देऊन या सफारीचा आनंद पर्यटकांना लुटता येतो. सफारी पर्यटन क्षेत्रात ई-सर्विसेसचे कॅमेरे बसविले असून  त्याद्वारे पर्यटकांवर सफारी पर्यटनाच्या घडामोडीवर व वन्यजीव हालचालीवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यास मोलाची मदत होते. सफारीसाठी संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अमोल कवासे यांच्याकडे बुकिंगची व्यवस्था आहे.

सध्या कारवा जंगल वन्यप्राण्यांच्या झुंडीने सर्वदूर प्रसिद्ध आहे. यासाठी मागील अनेक महिन्यांपासून जिल्ह्यातील पर्यटक कारवा सफारी सुरू होण्याची वाट पाहत होते. आता सफारी पर्यटन पुन्हा सुरू झाल्यामुळे पर्यटकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.  -संतोष थिपे, वन परीक्षेत्र अधिकारी, बल्लारशाह

 

टॅग्स :tourismपर्यटन