शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दोन दिवसांत २० पर्यटकांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 05:00 IST

कारवा सफारीची माहिती देताना वन परीक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी सांगितले की बल्लारपूरपासून कारवा वनपरीक्षेत्र अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर आहे. तर चंद्रपूरपासून १९ किमी अंतरावर आहे. मध्य चांदा  वन विभागात कारवा हे आदिवासीबहुल गाव आहे. जंगलाच्या कुशीत सामावलेले आहे. या वनक्षेत्रात वाघ, बिबट, रानगवे, अस्वल, रानमांजर, हरीण चितळ, सांबर, नीलगाय, चौसिंगा, रानकुत्रे या सोबतच २०० पक्षी व फुलपाखरे बघण्याचा आनंद सफारी करणाऱ्यांना लुटता येणार आहे.

मंगल जीवनेलोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये बंद झालेले कारवा येथील देशातील पहिले सफारी पर्यटन ८ महिन्यानंतर पुन्हा २५ डिसेंबरपासून सुरू झाले आहे. दोन दिवसांत २० पर्यटकांनी हजेरी लावली आहे. पहिल्याच दिवशी वाघाने दर्शन दिल्यामुळे पर्यटक जाम खूश आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून बल्लारशाह वन परिक्षेत्रातील सफारी करण्यासाठी जनताही उत्सुक आहे. कारवा सफारीची माहिती देताना वन परीक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी सांगितले की बल्लारपूरपासून कारवा वनपरीक्षेत्र अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर आहे. तर चंद्रपूरपासून १९ किमी अंतरावर आहे. मध्य चांदा  वन विभागात कारवा हे आदिवासीबहुल गाव आहे. जंगलाच्या कुशीत सामावलेले आहे. या वनक्षेत्रात वाघ, बिबट, रानगवे, अस्वल, रानमांजर, हरीण चितळ, सांबर, नीलगाय, चौसिंगा, रानकुत्रे या सोबतच २०० पक्षी व फुलपाखरे बघण्याचा आनंद सफारी करणाऱ्यांना लुटता येणार आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी न्यायधीश अजय भटेवरा यांनी वाघाचे दृश्य टिपले. यामुळे पर्यटकांची उत्सुकता वाढली आहे.याशिवाय ५० किमीचे जुने बैलगाडी आणि कूप रस्त्याचा वापर करून पर्यटन रस्ते तयार करण्यात आले. सफारी पर्यटनासाठी अनेक कक्षातील मार्गावर कारवा रोपवाटिकापर्यंत रस्त्याचे जाळे तयार करण्यात आले आहे. तरीही प्रायोगिक तत्त्वावर एसयूव्ही खासगी वाहनांना प्रवेश देण्यात येत आहे. प्रवेश शुल्क व गाईड शुल्क देऊन या सफारीचा आनंद पर्यटकांना लुटता येतो. सफारी पर्यटन क्षेत्रात ई-सर्विसेसचे कॅमेरे बसविले असून  त्याद्वारे पर्यटकांवर सफारी पर्यटनाच्या घडामोडीवर व वन्यजीव हालचालीवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यास मोलाची मदत होते. सफारीसाठी संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अमोल कवासे यांच्याकडे बुकिंगची व्यवस्था आहे.

सध्या कारवा जंगल वन्यप्राण्यांच्या झुंडीने सर्वदूर प्रसिद्ध आहे. यासाठी मागील अनेक महिन्यांपासून जिल्ह्यातील पर्यटक कारवा सफारी सुरू होण्याची वाट पाहत होते. आता सफारी पर्यटन पुन्हा सुरू झाल्यामुळे पर्यटकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.  -संतोष थिपे, वन परीक्षेत्र अधिकारी, बल्लारशाह

 

टॅग्स :tourismपर्यटन