शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

धान पिकावर तुडतुडा लाल्या रोगाचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 22:32 IST

चिमूर तालुका हा धान पिकासाठी प्रसिद्ध आहे. सर्वत्र धानाची लागवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : कृषी विभागाने उपाययोजना सुचविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनेरी : चिमूर तालुका हा धान पिकासाठी प्रसिद्ध आहे. सर्वत्र धानाची लागवड करण्यात आली आहे. परंतु पीक ऐन जोमात असताना या पिकावर मावा तुडतुडा, बेरड, लाल्या रोग, घाटेअळी, करपा अशा रोगाचे आक्रमण वाढले असून संपूर्ण पीक जमीनदोस्त होण्याची वेळ आली आहे. कीटकनाशक औषधांसाठी कृषी केंद्र चालक शेतकºयांकडून मनमानीने रक्कम उखडत असून या सर्व बाबीकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे.चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड झाली आहे. मात्र रोगाच्या प्रार्दुभावामुळे जो तो शेतकरी विविध औषधांची फवारणी करून पीक वाचविण्याच्या प्रयत्न करीत आहेत. कृषी केंद्रांमध्ये जाऊन फवारणीसाठी औषधाची खरेदी करत आहेत. मिळेल ती औषधी खरेदी करून पिकावर फवारणी करीत आहेत. मात्र फवारणी करूनही पिकांवरील रोग दूर होत नसल्याने शेतकºयांत चिंता पसरली आहे.औषधांसाठी शेतकºयांना मोठी रक्कम मोजावी लागत आहे. तरीही औषधांचा तुटवडा जाणवत असून कृषी केंद्रांकडून औषधासाठी मनमानीने रक्कम उखडली जात आहे. या सर्व बाबींकडे कृषी विभाग दुर्लक्ष करीत आहे.शासनाने कृषी विभागाची निर्मिती शेतकºयांच्या मदतीसाठी, हितासाठी, संरक्षणासाठी केली आहे. शासन शेतकºयांच्या फायद्यासाठी व हितासाठी आहोत, असा गाजावाजा करते. पण इकडे जगाच्या पोशिंद्यावर उपासमारीची पाळी निर्माण झाली आहे. बळीराजाकडे लक्ष देण्यासाठी कुणाकडेही वेळ नाही. परंतु निवडणुका, राजकारण आले की, सर्वजण शेतकºयांच्या हिताचे, फायद्याचे, मताचे समीकरण करतात. एकदा वेळ निघून गेल्यावर कुणीही बळीराजाकडे लक्ष देत नाही. त्यामुळे शेतकºयांत नाराजी पसरली असून कृषी विभागाप्रति रोष व्यक्त करीत आहे. याची शासनाने दखल घेवून मदत करण्याची मागणी आहे.कृषी अधिकाºयांनी शेतकºयांच्या भेटी घ्यावेपिकावरील रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी अधिकाºयांनी शेतकºयांना मार्गदर्शन करायला पाहिजे तसेच प्रत्येक गावागावात जाऊन शेतकºयांच्या भेटीगाठी घ्यायला पाहीजे. तसेच कृषी मार्गदर्शनपर शिबिरे घ्यायला पाहिजे. परंतु हे सर्व न करता कृषी विभाग कोणतीही हालचाल करताना दिसत नाही. तेव्हा या सर्व गंभीर बाबींची दखल घेऊन संबधित विभागाने शेतकºयांना मार्गदर्शन उपाययोजना सुचविण्याची मागणी आहे.