शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

धान पिकावर तुडतुडा लाल्या रोगाचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 22:32 IST

चिमूर तालुका हा धान पिकासाठी प्रसिद्ध आहे. सर्वत्र धानाची लागवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : कृषी विभागाने उपाययोजना सुचविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनेरी : चिमूर तालुका हा धान पिकासाठी प्रसिद्ध आहे. सर्वत्र धानाची लागवड करण्यात आली आहे. परंतु पीक ऐन जोमात असताना या पिकावर मावा तुडतुडा, बेरड, लाल्या रोग, घाटेअळी, करपा अशा रोगाचे आक्रमण वाढले असून संपूर्ण पीक जमीनदोस्त होण्याची वेळ आली आहे. कीटकनाशक औषधांसाठी कृषी केंद्र चालक शेतकºयांकडून मनमानीने रक्कम उखडत असून या सर्व बाबीकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे.चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड झाली आहे. मात्र रोगाच्या प्रार्दुभावामुळे जो तो शेतकरी विविध औषधांची फवारणी करून पीक वाचविण्याच्या प्रयत्न करीत आहेत. कृषी केंद्रांमध्ये जाऊन फवारणीसाठी औषधाची खरेदी करत आहेत. मिळेल ती औषधी खरेदी करून पिकावर फवारणी करीत आहेत. मात्र फवारणी करूनही पिकांवरील रोग दूर होत नसल्याने शेतकºयांत चिंता पसरली आहे.औषधांसाठी शेतकºयांना मोठी रक्कम मोजावी लागत आहे. तरीही औषधांचा तुटवडा जाणवत असून कृषी केंद्रांकडून औषधासाठी मनमानीने रक्कम उखडली जात आहे. या सर्व बाबींकडे कृषी विभाग दुर्लक्ष करीत आहे.शासनाने कृषी विभागाची निर्मिती शेतकºयांच्या मदतीसाठी, हितासाठी, संरक्षणासाठी केली आहे. शासन शेतकºयांच्या फायद्यासाठी व हितासाठी आहोत, असा गाजावाजा करते. पण इकडे जगाच्या पोशिंद्यावर उपासमारीची पाळी निर्माण झाली आहे. बळीराजाकडे लक्ष देण्यासाठी कुणाकडेही वेळ नाही. परंतु निवडणुका, राजकारण आले की, सर्वजण शेतकºयांच्या हिताचे, फायद्याचे, मताचे समीकरण करतात. एकदा वेळ निघून गेल्यावर कुणीही बळीराजाकडे लक्ष देत नाही. त्यामुळे शेतकºयांत नाराजी पसरली असून कृषी विभागाप्रति रोष व्यक्त करीत आहे. याची शासनाने दखल घेवून मदत करण्याची मागणी आहे.कृषी अधिकाºयांनी शेतकºयांच्या भेटी घ्यावेपिकावरील रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी अधिकाºयांनी शेतकºयांना मार्गदर्शन करायला पाहिजे तसेच प्रत्येक गावागावात जाऊन शेतकºयांच्या भेटीगाठी घ्यायला पाहीजे. तसेच कृषी मार्गदर्शनपर शिबिरे घ्यायला पाहिजे. परंतु हे सर्व न करता कृषी विभाग कोणतीही हालचाल करताना दिसत नाही. तेव्हा या सर्व गंभीर बाबींची दखल घेऊन संबधित विभागाने शेतकºयांना मार्गदर्शन उपाययोजना सुचविण्याची मागणी आहे.