शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी ‘अटल बांबू समृद्धी’ योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:39 IST

पारंपरिक शेतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रगतीचा नवा मार्ग उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य सरकारने अटल बांबू समृद्धी योजना राबविण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देबांबू शेतीला मिळणार प्रोत्साहन : सरकारकडून टिश्यू कल्चरचा पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पारंपरिक शेतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रगतीचा नवा मार्ग उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य सरकारने अटल बांबू समृद्धी योजना राबविण्याचा निर्णय घेतला. योजनेच्या माध्यमातून सरकारकडून शेतकºयांना बांबू टिश्यू कल्चरसाठी ५० ते ८० टक्क्यांपर्यंत अनुदान तसेच दर्जेदार टिश्यू कल्चरचा पुरवठा केला जाणार आहे.जिल्ह्यातील हवामान बांबू लागवडीसाठी पोषक आहे. शेती व शेतकरी मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत येऊ लागला आहे. शेतीमालाला मिळणारे अल्पदर, अपुरा वीजपुरवठा, व्यापाºयांची मनमानी आदी विविध कारणामुळे शेतकºयांना शेती करताना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. शेतीतील शाश्वत उत्पन्न कमालीचे घडले आहे. शेती व्यवसायाबाबत शेतकºयांसह नव्या पिढीतही प्रचंड उदासीनता निर्माण होऊ लागली. अनेक शेतकरी शेती करण्यासाठी धजावत नाही. रोजगारासाठी शहराकडे स्थलांतर करण्याच्या मानसिकतेत आहेत. शेतकºयांची मुले शेतीपासून लांब चालली. हंगामी नोकरी निमित्ताने शहरात जात आहेत. यावर राज्य सरकारने पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून बांबू शेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ‘अटल बांबू समृद्धी’ योजना तयार करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून चार हेक्टरपर्यंतच्या शेतकºयांना ८० टक्के अनुदानावर दर्जेदार बांबूचे टिश्यू कल्चर शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चार हेक्टरच्या पुढील शेतकºयांना ५० टक्के अनुदानावर हे टिश्यू कल्चर उपलब्ध केल्या जाणार असून हेक्टरी ६०० रोपे दिली जाणार आहेत.टिश्यू कल्चरमध्ये व्यावसायिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या बांबूच्या विविध जातींची लागवड केली जाणार आहे. यामध्ये भारतातील ‘कटांग’ आणि ‘माणगा’ या दोन स्थानिक जातींबरोबरच इतर पाच जातींचा समावेश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांना महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाकडे आॅनलाईन किंवा आॅफलाईन अर्ज करता येईल, अशी माहिती वन विभागाने दिली.जिल्ह्यातील हवामान बांबूला पोषकभारतात सुमारे २६ हजार कोटींची बांबूची बाजारपेठ आहे. त्या तुलनेत शेतात बांबूचे उत्पादन अतिशय अल्प आहे. त्यामुळे शेतकºयांनी बांबू शेतीकडे वळण्याची गरज निर्माण झाली. अल्पभूधारक शेतकºयांनी बांधावर बांबू शेती केल्यास आर्थिकदृष्ट्या परवडू शकते. फर्निचर, प्लायवूड, काटेंज, शोभेच्या वस्तू व बांधकाम व्यवसायात बांबूचा उपयोग केला जातो.

टॅग्स :Farmerशेतकरी