शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी ‘अटल बांबू समृद्धी’ योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:39 IST

पारंपरिक शेतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रगतीचा नवा मार्ग उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य सरकारने अटल बांबू समृद्धी योजना राबविण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देबांबू शेतीला मिळणार प्रोत्साहन : सरकारकडून टिश्यू कल्चरचा पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पारंपरिक शेतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रगतीचा नवा मार्ग उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य सरकारने अटल बांबू समृद्धी योजना राबविण्याचा निर्णय घेतला. योजनेच्या माध्यमातून सरकारकडून शेतकºयांना बांबू टिश्यू कल्चरसाठी ५० ते ८० टक्क्यांपर्यंत अनुदान तसेच दर्जेदार टिश्यू कल्चरचा पुरवठा केला जाणार आहे.जिल्ह्यातील हवामान बांबू लागवडीसाठी पोषक आहे. शेती व शेतकरी मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत येऊ लागला आहे. शेतीमालाला मिळणारे अल्पदर, अपुरा वीजपुरवठा, व्यापाºयांची मनमानी आदी विविध कारणामुळे शेतकºयांना शेती करताना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. शेतीतील शाश्वत उत्पन्न कमालीचे घडले आहे. शेती व्यवसायाबाबत शेतकºयांसह नव्या पिढीतही प्रचंड उदासीनता निर्माण होऊ लागली. अनेक शेतकरी शेती करण्यासाठी धजावत नाही. रोजगारासाठी शहराकडे स्थलांतर करण्याच्या मानसिकतेत आहेत. शेतकºयांची मुले शेतीपासून लांब चालली. हंगामी नोकरी निमित्ताने शहरात जात आहेत. यावर राज्य सरकारने पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून बांबू शेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ‘अटल बांबू समृद्धी’ योजना तयार करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून चार हेक्टरपर्यंतच्या शेतकºयांना ८० टक्के अनुदानावर दर्जेदार बांबूचे टिश्यू कल्चर शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चार हेक्टरच्या पुढील शेतकºयांना ५० टक्के अनुदानावर हे टिश्यू कल्चर उपलब्ध केल्या जाणार असून हेक्टरी ६०० रोपे दिली जाणार आहेत.टिश्यू कल्चरमध्ये व्यावसायिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या बांबूच्या विविध जातींची लागवड केली जाणार आहे. यामध्ये भारतातील ‘कटांग’ आणि ‘माणगा’ या दोन स्थानिक जातींबरोबरच इतर पाच जातींचा समावेश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांना महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाकडे आॅनलाईन किंवा आॅफलाईन अर्ज करता येईल, अशी माहिती वन विभागाने दिली.जिल्ह्यातील हवामान बांबूला पोषकभारतात सुमारे २६ हजार कोटींची बांबूची बाजारपेठ आहे. त्या तुलनेत शेतात बांबूचे उत्पादन अतिशय अल्प आहे. त्यामुळे शेतकºयांनी बांबू शेतीकडे वळण्याची गरज निर्माण झाली. अल्पभूधारक शेतकºयांनी बांधावर बांबू शेती केल्यास आर्थिकदृष्ट्या परवडू शकते. फर्निचर, प्लायवूड, काटेंज, शोभेच्या वस्तू व बांधकाम व्यवसायात बांबूचा उपयोग केला जातो.

टॅग्स :Farmerशेतकरी