शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी ‘अटल बांबू समृद्धी’ योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:39 IST

पारंपरिक शेतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रगतीचा नवा मार्ग उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य सरकारने अटल बांबू समृद्धी योजना राबविण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देबांबू शेतीला मिळणार प्रोत्साहन : सरकारकडून टिश्यू कल्चरचा पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पारंपरिक शेतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रगतीचा नवा मार्ग उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य सरकारने अटल बांबू समृद्धी योजना राबविण्याचा निर्णय घेतला. योजनेच्या माध्यमातून सरकारकडून शेतकºयांना बांबू टिश्यू कल्चरसाठी ५० ते ८० टक्क्यांपर्यंत अनुदान तसेच दर्जेदार टिश्यू कल्चरचा पुरवठा केला जाणार आहे.जिल्ह्यातील हवामान बांबू लागवडीसाठी पोषक आहे. शेती व शेतकरी मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत येऊ लागला आहे. शेतीमालाला मिळणारे अल्पदर, अपुरा वीजपुरवठा, व्यापाºयांची मनमानी आदी विविध कारणामुळे शेतकºयांना शेती करताना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. शेतीतील शाश्वत उत्पन्न कमालीचे घडले आहे. शेती व्यवसायाबाबत शेतकºयांसह नव्या पिढीतही प्रचंड उदासीनता निर्माण होऊ लागली. अनेक शेतकरी शेती करण्यासाठी धजावत नाही. रोजगारासाठी शहराकडे स्थलांतर करण्याच्या मानसिकतेत आहेत. शेतकºयांची मुले शेतीपासून लांब चालली. हंगामी नोकरी निमित्ताने शहरात जात आहेत. यावर राज्य सरकारने पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून बांबू शेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ‘अटल बांबू समृद्धी’ योजना तयार करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून चार हेक्टरपर्यंतच्या शेतकºयांना ८० टक्के अनुदानावर दर्जेदार बांबूचे टिश्यू कल्चर शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चार हेक्टरच्या पुढील शेतकºयांना ५० टक्के अनुदानावर हे टिश्यू कल्चर उपलब्ध केल्या जाणार असून हेक्टरी ६०० रोपे दिली जाणार आहेत.टिश्यू कल्चरमध्ये व्यावसायिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या बांबूच्या विविध जातींची लागवड केली जाणार आहे. यामध्ये भारतातील ‘कटांग’ आणि ‘माणगा’ या दोन स्थानिक जातींबरोबरच इतर पाच जातींचा समावेश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांना महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाकडे आॅनलाईन किंवा आॅफलाईन अर्ज करता येईल, अशी माहिती वन विभागाने दिली.जिल्ह्यातील हवामान बांबूला पोषकभारतात सुमारे २६ हजार कोटींची बांबूची बाजारपेठ आहे. त्या तुलनेत शेतात बांबूचे उत्पादन अतिशय अल्प आहे. त्यामुळे शेतकºयांनी बांबू शेतीकडे वळण्याची गरज निर्माण झाली. अल्पभूधारक शेतकºयांनी बांधावर बांबू शेती केल्यास आर्थिकदृष्ट्या परवडू शकते. फर्निचर, प्लायवूड, काटेंज, शोभेच्या वस्तू व बांधकाम व्यवसायात बांबूचा उपयोग केला जातो.

टॅग्स :Farmerशेतकरी