शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अचानक समोर आला वाघ, पण महिलेने लढवली 'अशी' शक्कल अन्..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2022 11:09 IST

खांडला येथील घटना, बकरीला केले वाघाने ठार

दिलीप मेश्राम

नवरगाव (चंद्रपूर) : गावातील गुरे, शेळ्या राखणारे निघून गेल्यामुळे खांडला येथील एक महिला शेळ्या पोहोचविण्यासाठी जंगलात गेली. दरम्यान, तिच्या मागून पट्टेदार वाघ आला. जिवाच्या आकांताने तिने चक्क जवळच्या नाल्यात उडी मारत आपला जीव वाचविला. दरम्यान, वाघाने बकरीला ठार केलेे. ही घटना रविवारी घडली.

सिंदेवाही तालुक्यातील उपक्षेत्र नवरगावअंतर्गत रत्नापूर बिटातील खांडला येथील येथील मीनाक्षी विजय धुर्वे (३०) ही रविवारी सकाळी आपल्याकडील दोन बकऱ्यांना कळपात पोहोचण्यासाठी घेऊन गेली. दरम्यान, खडकाळ नाल्याजवळ पोहोचताच पट्टेदार वाघ तिच्या पाठीमागून येत असल्याचे तिला दिसले. समोर खडकाळ नाल्याचे पाणी आणि पंधरा -वीस फुटांवर वाघ दोन्ही बाजूंनी मृत्यूने आमंत्रण दिले होते. अशा परिस्थितीत जीव वाचविण्यासाठी तिने नाल्यातील पाण्यामध्ये उडी मारली. कशीबशी दुसऱ्या थळीला जाऊन पोहोचली. याचवेळी सोबत असलेल्या बकऱ्यांवर वाघाने हल्ला केला. यामध्ये एक बकरी ठार झाली तर दुसरी जखमी झाली. तिने काही अंतरावरील गुराख्याला सर्व प्रकार सांगितला. त्याने गावातील नागरिकांना माहिती दिली. नागरिक घटनास्थळी पोहोचल्यानंतर तिला सावरत गावात आणले. या घटनेमुळे मात्र गावात वाघाची दहशत पसरली आहे.

घटनास्थळी लावले कॅमेरे

माहिती मिळताच रत्नापूर येथील वनरक्षक जे. एस. वैद्य यांनी घटनास्थळ भेट दिली. वाघाने मारलेली तसेच जखमी शेळीचा पंचनामा केला. वाघावर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात कॅमेरे लावले.

मागील वर्षी एकाचा मृत्यू

खांडला या गावालगतच मोठे जंगल असल्याने सकाळपासून जंगलाशी संबंध येतो. कुठेही जायचे झाल्यास जंगलातूनच जावे लागते. त्यामुळे सतत वाघाच्या दहशतीत जगावे लागत आहे. मागील वर्षी याच परिसरात अनिल सोनुले हे गुरे चारत असताना वाघाने हल्ला केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :Tigerवाघchandrapur-acचंद्रपूर