शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

चंद्रपुरात कृत्रिम टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 22:41 IST

चंद्रपूर औद्योगिक शहर आहे. शासनाला या भूमीतून कोट्यवधीची रॉयल्टी मिळते. असे असले तरी प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे या भूमीतील लेकरांना मुलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागत आहे.

ठळक मुद्देआमसभेतही निर्णय नाही : धरण हाऊसफुल्ल; तरीही नागरिकांना पाणी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर औद्योगिक शहर आहे. शासनाला या भूमीतून कोट्यवधीची रॉयल्टी मिळते. असे असले तरी प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे या भूमीतील लेकरांना मुलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागत आहे. मागील अनेक वर्षांपासून पाण्यासाठी चंद्रपुरात बोंब सुरू असतानाही आजपर्यंत पाण्याची वितरण व्यवस्था चांगली होऊ शकली नाही. भर पावसाळ्यात इरई धरण तुडुंब भरले असतानाही चंद्रपुरात अनियमित पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.विशेष म्हणजे, चंद्रपूरकरांना या संघर्षातून कोणताही नगरसेवक वा मनपा प्रशासन मुक्त करू शकले नाही. चंद्रपूरची लोकसंख्या चार लाखांच्या घरात गेली आहे. पूर्वी चंद्रपूरला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी जीवन प्राधीकरणाकडे होती. त्यावेळी एखादवेळी पाण्याची बोंब व्हायची. त्यानंतर पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नगरपालिकेकडे देण्यात आली. बऱ्याच कालावधीपर्यंत नगरपालिकेने स्वत: ही जबाबदारी सांभाळली. त्यावेळी शहरात काही ठिकाणी पाईप लाईन बदलविण्यात आली होती. यालाही आता ५०-६० वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यानंतर पुढे कर्मचाºयांच्या अभावामुळे व वाढत्या कामाच्या ताणामुळे नगरपालिका प्रशासनाला शहराला पाणी पुरवठा करणे जिकरीचे होऊ लागले. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे खासगीकरण करण्यात आले.मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे इरई धरणात पाण्याची साठवणूक होऊ शकली नाही. हिवाळ्यातच धरणाने तळ गाठला. त्यामुळे उन्हाळ्याच्या प्रारंभीच शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. यावर्षी बºयापैकी पाऊस झाला. इरई धरणातही मुबलक जलसाठा आहे. मात्र अद्यापही शहरात एक दिवसाआडच पाणी दिले जात आहे.यातून नागरिकांच्या गरजाही पूर्ण होत नाही. नागरिकांना पाण्यासाठी मोठे हाल सहन करावे लागत आहे. विशेष म्हणजे, नळ आल्यानंतर प्रारंभी काही वेळ दूषित व गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी वापरता येत नाही.चंद्रपुरात दररोज केव्हा पाणी पुरवठा केला जाईल, याबाबत विचारणा केली असता लवकरच केला जाईल, असे मनपाकडून सांगितले जाते. मात्र अद्यापही मनपा यासाठी मुहुर्त शोधत असल्याचे दिसते.कंत्राटी कंपनीचे फावलेपाणी पुरवठ्याचे खासगीकरण झाल्यानंतरच पाणी पुरवठ्याचे धिंडवडे उडाले. वितरण व्यवस्थाच अस्तित्वात आहे की नाही, असेच वाटायले लागले. सध्या शहराचा पाणी पुरवठा करण्याचे कंत्राट उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. मात्र या कंपनीचे वितरण व्यवस्थेकडे अजिबात लक्ष नसल्याने शहरभर पाण्यासाठी बोंबा मारल्या जात आहे. नवीन कनेक्शन देऊन ही कंत्राटी कंपनी मोकळी होते. पुढे त्या कनेक्शनधारकाला व्यवस्थित पाणी मिळत आहे की नाही, हे पाहण्याचे सौजन्यही दाखविले जात आहे. एखाद्याने पाणी मिळत नाही, अशी तक्रार केली की त्याला पुन्हा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. आता एक दिवसाआड पाणी देणे सुरू असल्याने या कंपनीचे चांगले फावत आहे.