शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

रेल्वे लाइनमुळे रामपुरात कृत्रिम पूर परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:18 IST

राजुरा-माथरा-गोवरी मार्गावरील वाहतूक ठप्प सास्ती : निसर्गाच्या प्रवाहाला दिशा देण्याच्या नादात व वाढते मानवी अतिक्रमण यामुळे निसर्गाचे चक्र बदलत ...

राजुरा-माथरा-गोवरी मार्गावरील वाहतूक ठप्प

सास्ती : निसर्गाच्या प्रवाहाला दिशा देण्याच्या नादात व वाढते मानवी अतिक्रमण यामुळे निसर्गाचे चक्र बदलत असून याचा परिणाम दिवसेंदिवस मानवी जीवनावर होत आहे. राजुरा शहरालगत असलेल्या रामपूर वस्तीलगत वनविभागाची मोठ्या प्रमाणात जमीन आहे. यामधूनच सिमेंट व कोळसा वाहतुकीसाठी रेल्वे लाइन आहे. पावसाळ्याच्या दिवसात याच रेल्वे लाइनच्या दोन्ही बाजूने लांब अंतरावरून जंगलातील व इतर ठिकाणचे पाणी रामपूर वस्तीकडे येऊन राजुरा-गोवरी राज्यमार्गावर व वस्तीत पावसाळ्याच्या दिवसात पाणी शिरून कृत्रिम पूरस्थिती निर्माण होते. यंदाही अशीच स्थिती निर्माण झाली असून प्रवाश्यांना व रामपूर येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

माणिकगड (चुनाळा) येथून अंबुजा, एल. ॲन्ड टी., माणिकगड, वेकोलि परिसरात माल वाहतुकीसाठी असलेली रेल्वे लाइन रामपूर वस्तीलगत गेली आहे. रेल्वे लाइन व रामपूर वस्तीलगत वनविभागाची मोठ्या प्रमाणात जमीन आहे. पाऊस आला की या परिसरातील मोठ्या प्रमाणात वाहून येणारे पाणी रामपूर वस्तीकडे असलेल्या उतार भागाने येते. मागील दोन दिवसांपासून सतत पाऊस येत असल्याने राजुरा-माथरा राज्यमार्गालगत व या मार्गावर कृत्रिम पूरस्थिती निर्माण झाली आहे. परिसर जलमय झाला आहे. काहींच्या घरात पाणी जात असल्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. ही समस्या नेहमीचीच झाल्याने याचा त्रास मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिकांना होत असून याच परिसरात असलेल्या प्रियदर्शनी विद्यालय रामपूर या शाळेलासुद्धा होत आहे. यासंबंधी प्रशासनाला माहिती दिली. परंतु रेल्वे विभाग याकडे लक्ष देत नसल्याने ही कृत्रिम पूरस्थिती नेहमीचीच असल्याचे बोलले जात आहे.

220721\img_20210722_152658.jpg

राजुरा-माथरा रोडवर रामपूर येथे साचलेले पाणी