शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

रेल्वे लाइनमुळे रामपुरात कृत्रिम पूर परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:18 IST

राजुरा-माथरा-गोवरी मार्गावरील वाहतूक ठप्प सास्ती : निसर्गाच्या प्रवाहाला दिशा देण्याच्या नादात व वाढते मानवी अतिक्रमण यामुळे निसर्गाचे चक्र बदलत ...

राजुरा-माथरा-गोवरी मार्गावरील वाहतूक ठप्प

सास्ती : निसर्गाच्या प्रवाहाला दिशा देण्याच्या नादात व वाढते मानवी अतिक्रमण यामुळे निसर्गाचे चक्र बदलत असून याचा परिणाम दिवसेंदिवस मानवी जीवनावर होत आहे. राजुरा शहरालगत असलेल्या रामपूर वस्तीलगत वनविभागाची मोठ्या प्रमाणात जमीन आहे. यामधूनच सिमेंट व कोळसा वाहतुकीसाठी रेल्वे लाइन आहे. पावसाळ्याच्या दिवसात याच रेल्वे लाइनच्या दोन्ही बाजूने लांब अंतरावरून जंगलातील व इतर ठिकाणचे पाणी रामपूर वस्तीकडे येऊन राजुरा-गोवरी राज्यमार्गावर व वस्तीत पावसाळ्याच्या दिवसात पाणी शिरून कृत्रिम पूरस्थिती निर्माण होते. यंदाही अशीच स्थिती निर्माण झाली असून प्रवाश्यांना व रामपूर येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

माणिकगड (चुनाळा) येथून अंबुजा, एल. ॲन्ड टी., माणिकगड, वेकोलि परिसरात माल वाहतुकीसाठी असलेली रेल्वे लाइन रामपूर वस्तीलगत गेली आहे. रेल्वे लाइन व रामपूर वस्तीलगत वनविभागाची मोठ्या प्रमाणात जमीन आहे. पाऊस आला की या परिसरातील मोठ्या प्रमाणात वाहून येणारे पाणी रामपूर वस्तीकडे असलेल्या उतार भागाने येते. मागील दोन दिवसांपासून सतत पाऊस येत असल्याने राजुरा-माथरा राज्यमार्गालगत व या मार्गावर कृत्रिम पूरस्थिती निर्माण झाली आहे. परिसर जलमय झाला आहे. काहींच्या घरात पाणी जात असल्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. ही समस्या नेहमीचीच झाल्याने याचा त्रास मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिकांना होत असून याच परिसरात असलेल्या प्रियदर्शनी विद्यालय रामपूर या शाळेलासुद्धा होत आहे. यासंबंधी प्रशासनाला माहिती दिली. परंतु रेल्वे विभाग याकडे लक्ष देत नसल्याने ही कृत्रिम पूरस्थिती नेहमीचीच असल्याचे बोलले जात आहे.

220721\img_20210722_152658.jpg

राजुरा-माथरा रोडवर रामपूर येथे साचलेले पाणी