शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रेल्वे लाइनमुळे रामपुरात कृत्रिम पूर परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:18 IST

राजुरा-माथरा-गोवरी मार्गावरील वाहतूक ठप्प सास्ती : निसर्गाच्या प्रवाहाला दिशा देण्याच्या नादात व वाढते मानवी अतिक्रमण यामुळे निसर्गाचे चक्र बदलत ...

राजुरा-माथरा-गोवरी मार्गावरील वाहतूक ठप्प

सास्ती : निसर्गाच्या प्रवाहाला दिशा देण्याच्या नादात व वाढते मानवी अतिक्रमण यामुळे निसर्गाचे चक्र बदलत असून याचा परिणाम दिवसेंदिवस मानवी जीवनावर होत आहे. राजुरा शहरालगत असलेल्या रामपूर वस्तीलगत वनविभागाची मोठ्या प्रमाणात जमीन आहे. यामधूनच सिमेंट व कोळसा वाहतुकीसाठी रेल्वे लाइन आहे. पावसाळ्याच्या दिवसात याच रेल्वे लाइनच्या दोन्ही बाजूने लांब अंतरावरून जंगलातील व इतर ठिकाणचे पाणी रामपूर वस्तीकडे येऊन राजुरा-गोवरी राज्यमार्गावर व वस्तीत पावसाळ्याच्या दिवसात पाणी शिरून कृत्रिम पूरस्थिती निर्माण होते. यंदाही अशीच स्थिती निर्माण झाली असून प्रवाश्यांना व रामपूर येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

माणिकगड (चुनाळा) येथून अंबुजा, एल. ॲन्ड टी., माणिकगड, वेकोलि परिसरात माल वाहतुकीसाठी असलेली रेल्वे लाइन रामपूर वस्तीलगत गेली आहे. रेल्वे लाइन व रामपूर वस्तीलगत वनविभागाची मोठ्या प्रमाणात जमीन आहे. पाऊस आला की या परिसरातील मोठ्या प्रमाणात वाहून येणारे पाणी रामपूर वस्तीकडे असलेल्या उतार भागाने येते. मागील दोन दिवसांपासून सतत पाऊस येत असल्याने राजुरा-माथरा राज्यमार्गालगत व या मार्गावर कृत्रिम पूरस्थिती निर्माण झाली आहे. परिसर जलमय झाला आहे. काहींच्या घरात पाणी जात असल्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. ही समस्या नेहमीचीच झाल्याने याचा त्रास मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिकांना होत असून याच परिसरात असलेल्या प्रियदर्शनी विद्यालय रामपूर या शाळेलासुद्धा होत आहे. यासंबंधी प्रशासनाला माहिती दिली. परंतु रेल्वे विभाग याकडे लक्ष देत नसल्याने ही कृत्रिम पूरस्थिती नेहमीचीच असल्याचे बोलले जात आहे.

220721\img_20210722_152658.jpg

राजुरा-माथरा रोडवर रामपूर येथे साचलेले पाणी