शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
3
"गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
4
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
5
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
6
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
7
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
8
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
9
२०२५ची सांगता एकदशीने: २०२६मध्ये किती एकादशी? २ अधिक व्रतांची भर; पाहा, आषाढी-कार्तिकी तिथी
10
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
11
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
12
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
13
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
14
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
15
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
16
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
17
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
18
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
19
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
20
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
Daily Top 2Weekly Top 5

नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा

By admin | Updated: May 14, 2017 01:46 IST

रवी येथील शेतकरी वामन दशरथ मरापे यांच्यावर सकाळी १० वाजताच्या सुमारास शेतावर वाघाने हल्ला करून त्यांना जागीच ठार केले.

आरमोरीत पत्रकार परिषद : वन विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याची आमदारांची माहिती लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : रवी येथील शेतकरी वामन दशरथ मरापे यांच्यावर सकाळी १० वाजताच्या सुमारास शेतावर वाघाने हल्ला करून त्यांना जागीच ठार केले. त्यामुळे या परिसरातील कोंढाळा, अरसोडा येथील शेतकरी धास्तावले आहेत. वन विभागाने नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा, असे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती आ. कृष्णा गजबे यांनी शनिवारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दीड महिन्यापूर्वी कोंढाळा येथील एका इसमावर याच नरभक्षक वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. सदर इसम मोहफूल गोळा करण्याकरिता गेला होता. त्याच्यावर वाघाने अचानक हल्ला केला होता. त्याचीच पुनरावृत्ती शनिवारी घडली. वाघाने वामन मरापे यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले. सध्या उन्हाळी धानपीक व अन्य भाजीपाला पीक तालुका परिसरात लावण्यात आले आहेत. परंतु नरभक्ष्यक वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी धास्तावले आहेत. शेतावर जाण्यास धजावत नाहीत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी देसाईगंजचे उपवनसंरक्षक विवेक हौशिंग तसेच मुख्य वनसंरक्षक एडबाँड यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली, अशी माहितीही आ. कृष्णा गजबे यांनी दिली. नरभक्ष्यक वाघाच्या हल्ल्यात शेतकरी व शेतमजूर ठार झाल्यास त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी मिळावी, यासाठी आपण विधानसभेत मागणी करणार असल्याचे आ. कृष्णा गजबे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला भाजपचे तालुकाध्यक्ष नंदू पेटेवार, युवा मोर्चाचे अध्यक्ष पंकज खरवडे, नंदू नाकतोडे, स्वप्नील धात्रक, सचिन बेहरे, युगल सामृतवार, गोलू वाघरे व कार्यकर्ते हजर होते. दरम्यान पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबीयांचे सांत्वनही केले. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांशी चर्चा कोंढाळा व रवी जंगल परिसरातील नरभक्ष्यक वाघाचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी आरमोरी येथील काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी तांबटकर यांच्याकडे शनिवारी चर्चेदरम्यान केली. माजी आमदार आनंदराव गेडाम, डॉ. रामकृष्ण मडावी व कार्यकर्त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी तांबटकर यांची भेट घेऊन नरभक्ष्यक वाघाचा बंदोबस्त करण्याबाबत चर्चा केली. वनविभागाचे दुर्लक्ष व लोकप्रतिनिधी यांच्या निष्काळजीपणामुळे सदर घटना घडली, अशी टीकाही यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली. देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा जंगल परिसरात काही दिवसांपूर्वी एका नागरिकाला वाघाने भक्ष्य बनविले होते. शनिवारी पुन्हा आरमोरी तालुक्यातील रवी येथे आपल्या शेतात सकाळच्या सुमारास धानपिकाला पाणी देत असताना वामन मरापे या शेतकऱ्यावर वाघाने अचानक हल्ला करून त्याला जागीच ठार केले. त्यामुळे या भागातील शेतकरी दहशतीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी धानाची लागवड केलेली आहे. सध्या धानपीक जोमात असून दररोज शेतकऱ्यांना शेतावर जावे लागते. वाघाच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे वनविभागाने या नरभक्ष्यक वाघाचा तत्काळ बंदोबस्त करून मरापे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी माजी आ. आनंदराव गेडाम, डॉ. रामकृष्ण मडावी, सुभाष सपाटे यांनी केली आहे. दरम्यान आनंदराव गेडाम यांनी उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. तसेच पदाधिकाऱ्यांनी पीडित मरापे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी आ. गेडाम यांच्या समवेत जि. प. सदस्य मनीषा दोनाडकर, अशोक भोयर हजर होते.