लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : लॉकडाऊन शिथील केले असले तरी विना मास्क बाहेर पडू नये, अशा सुचना प्रशासनाने दिल्या असूनही अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत आहे. त्यामुळे सिंदेवाही नगरपंचायतच्या मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड यांच्या नेतृत्वात एकाच दिवशी ३९ जणांवर कारवाई करुन प्रत्येकी २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापूर्वी आठ व्यावसायिकांवर पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. शासनाने काही प्रमानात शिथिलता देत दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे असताना मात्र शासनाने नागरिकांना मास्क लावणे, शारीरिक अंतराचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. मात्र अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत आहेत. ही बाब लक्षात घेता मुख्याधिकारी डॉ. राठोड यांच्या नेतृत्वात नगर पंचायतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दणका देण्यास सुरूवात केली आहे. याअंतर्गत, नगर पंचायतने मास्कचा वापर न करता फिरणाऱ्या ३९ जणांवर कारवाई करुन प्रत्येकी २०० याप्रमाणे सात हजार ८०० रुपये दंड वसूल केला आहे.सर्व दुकाने ९ वाजता सुरु करुन ५ वाजता बंद करण्याचे निर्देश असताना अनेकजण ९ वाजतापूर्वीच सुरु करतात व पाच वाजतानंतरही सुरु ठेवतात. अशा व्यावसायिकांना नगरपंचायतीतर्फे सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र सूचनांचे पालन न केल्यामुळे शहरातील ८ व्यावसायिकांवर कारवाई करुन पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.सदर कारवाई मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड यांच्या मार्गदर्शनाखली कार्यालयीन अधीक्षक पंकज आसेकर, सुधीर ठाकरे, विनोद काटकर, संतोष घडसे, पुरुषोत्तम खोब्रागडे, राजेंद्र नन्नावरे, संजय रामटेके, बोंडगुलवार, अमोल पाटील, मारभते आदींनी केली.नागरिकांनी अत्यंत महत्वाचे काम असेलच तर घराबाहेर पडावे व मास्कचा वापर करावा. दिवसातून तीन ते चारदा सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवावे, गर्दीच्या ठिकाणी जाण्यास टाळावे, रेड, झोन मधून आलेल्या नागरिकांनी आपली तापासणी करून घ्यावी. कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्वरीत प्रशासनाला कळवून सहकार्य करावे.- डॉ. सुप्रिया राठोड, मुख्याधिकारी,नगर पंचायत, सिंदेवाही
मास्क न लावणे भोवले; ३९ जणांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST
संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. शासनाने काही प्रमानात शिथिलता देत दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे असताना मात्र शासनाने नागरिकांना मास्क लावणे, शारीरिक अंतराचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. मात्र अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत आहेत.
मास्क न लावणे भोवले; ३९ जणांना दंड
ठळक मुद्देसिंदेवाही नगरपंचायतीची कारवाई । आठ व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई