शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
2
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
3
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
4
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
5
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
6
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
7
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
8
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
9
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
10
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
11
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
12
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
13
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
14
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
15
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
16
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
17
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
18
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
19
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
20
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या मुली शाळेत सुरक्षित आहेत का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2022 05:00 IST

शिक्षण विभागाने खासगी व्यवस्थापनातील शाळांना सीसीटीव्ही लावण्याचे आदेश काही वर्षांपूर्वी दिले होते. मात्र,  अनेकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. आता पुण्यातील अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची सक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी लक्ष केंद्रीत केले असून सरकारी आणि खासगी शाळांमध्येही सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचा आदेश जारी केला आहे.

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पुण्यातील शाळेत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर मुलींच्या सुरक्षिततेच्या मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. शाळांमध्येसीसीटीव्हीमुळे मुलींची सुरक्षितता ठेवण्यास मदत होते. मात्र, जिल्ह्यातील तब्बल २ हजार ५५ शाळांमध्येसीसीटीव्ही नसल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये काही खासगी तसेच जिल्हा परिषद शाळांचाही समावेश आहे. त्यामुळे भविष्यात एखादी अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शिक्षण विभागाने खासगी व्यवस्थापनातील शाळांना सीसीटीव्ही लावण्याचे आदेश काही वर्षांपूर्वी दिले होते. मात्र,  अनेकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. आता पुण्यातील अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची सक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी लक्ष केंद्रीत केले असून सरकारी आणि खासगी शाळांमध्येही सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचा आदेश जारी केला आहे. मात्र, आता पालकांनीही सक्त होऊन व्यवस्थापन तसेच प्रशासनाला यासंदर्भात विचारणा करणे सध्या तरी गरजेचे आहे. जिल्ह्यातील काही मोजक्याच आणि शहरातील इंग्रजी शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. मात्र ग्रामीण भागातील इंग्रजी खासगी शाळांध्येही सीसीटीव्ही नसल्याची स्थिती आहे.

अनेक शाळांमध्ये सीसीटीव्ही कागदावरच- जिल्ह्यातील काही शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. मात्र, त्यातील अनेक शाळांतील सीसीटीव्ही बंद आहे तर काही ठिकाणी केवळ कागदोपत्रीच सीसीटीव्ही असल्याचे दाखविण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.

 पालक चिंतेत 

शाळांमध्ये आपले मुले सुरक्षित राहील की नाही याची आता पालकांना चिंता सतावत आहे. खासगी शाळांसह जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही लावून विद्यार्थ्यांची सुरक्षितता बाळगणे सध्यातरी गरजेचे झाले आहे. प्रशासनाने सीसीटीव्ही लावण्याची सक्ती करावी.वनश्री गेडाम, चंद्रपूर

शाळांमध्ये सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही असणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक शाळांत सीसीटीव्हीच नाही. विशेषत: जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही नाही. त्यामुळे  अप्रिय घटना घडण्यापूर्वी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही लावावेत.-प्रतिभा कोडापे, चंद्रपूर 

 

टॅग्स :cctvसीसीटीव्हीSchoolशाळा