शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
3
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
4
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
5
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
6
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
7
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
8
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
9
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
10
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
11
मोठ्या पडद्यावर फ्लॉप पण बिझनेसमध्ये केली कमाल, चालवतोय १०००० कोटींची कंपनी; कमाईच्या बाबतीत अनेकांना टाकलं मागे
12
ट्रम्पसमोर नेतन्याहूंनी फोनवर कुणाची माफी मागितली? इस्रायल-गाझा युद्ध थांबवण्यात महत्वाची भूमिका
13
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
14
सारा तेंडुलकर जेव्हा पापाराझी समोर मराठीत बोलते...; Viral Video पाहून नेटकरीही पडले प्रेमात
15
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
16
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
18
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
19
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
20
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर

३० एप्रिल: लॉकडाऊनसाठी प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:00 IST

राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या काळात आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, अडकून पडलेल्या नागरिकांना निवारा, बेघर ,निराश्रित व व विमनस्क लोकांना रोजचे भोजन, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था व आरोग्य यंत्रणाआणखी नियोजनबद्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देअन्नधान्यांचा तुटवडा भासणार नाही । सीमावर्ती भागातील गावे, रस्ते कडेकोट बंदोबस्तात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे आता १४ एप्रिल ही मर्यादा वाढवून ३० एप्रिलपर्यंत राज्यात लॉकडाऊन सुरू राहणार आहे. यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन तयार असून नागरिकांची कुठलीही गैरव्यवस्था होणार नाही. याबाबतच्या उपाययोजना करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यात येणारे प्रत्येक वाहन, प्रत्येक व्यक्ती तपासली जाईल व त्याचे निर्जंतुकीकरण केले जाईल.सोबतच सीमावर्ती भागांमध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी स्वत: दक्ष राहून बाहेरून येणाºया नागरिकांची माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या काळात आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, अडकून पडलेल्या नागरिकांना निवारा, बेघर ,निराश्रित व व विमनस्क लोकांना रोजचे भोजन, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था व आरोग्य यंत्रणाआणखी नियोजनबद्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.पोलिसांसाठी निर्जंतुकीकरण व्हॅनजिल्ह्यातील पोलिस यंत्रणेवर या काळामध्ये प्रचंड बंदोबस्ताचा तणाव आहे. पोलीस दलाला विविध ठिकाणी कर्तव्य पूर्तीसाठी जावे लागते. त्यांच्यासाठी एका निर्जंतुकीकरण वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नाकाबंदी करणारे कर्मचारी यांना कर्तव्य पूर्ण करताना कोणताही धोका संभवू नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याचे डॉ.महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहेविनाकारण फिरणारे २४३ वाहने जप्तजिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू असताना व पूर्णत: लॉकडाऊन करण्याचे निर्देश असतानादेखील काही नागरिक विनाकारण घराबाहेर फिरत आहेत. अशा नागरिकांच्या २४३ वाहनांना जप्त करण्यात आले आहे. १०२ लोकांवर केसेस दाखल करण्यात आल्या असून पाच लाखावर दंड करण्यात आला आहे. नागरिकांनी पुढील काळात घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.६४२ नागरिक निवारागृहातजिल्ह्यामध्ये सध्या ६४२ नागरिक विविध निवारागृहामध्ये आश्रयास आहेत.. त्यांना ३० एप्रिलपर्यंत राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अन्य राज्यात अडकलेल्या नागरिकांनीदेखील या काळात आहे तिथेच राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरामध्ये महानगरपालिकेच्या पुढाकारातून विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने १७ हजारावर नागरिकांना भोजनदान करण्यात येत आहे. आजूबाजूच्या परिसरात कोणीही नागरिक उपाशी असल्यास या संदर्भातील हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी त्याची मदत घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.नव्या २६ लोकांपैकी २५ जणांचे नमुने निगेटिव्हजिल्हा आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सध्या २८ नागरिकांची वैद्यकीय तपासणी झाली असून त्यातील २६ लोकांचे नमुने घेण्यात आले आहे. त्यापैकी २५ नागरिकांचे नमुने निगेटिव्ह असून दोन नमुने प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत विदेशातून परत आलेल्या बाहेर राज्यातून बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची संख्या २६ हजार ६६३ आहे. त्यापैकी चार हजार ४८२ नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर यापैकी २२ हजार १८१ लोकांनी १४ दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा कालावधी पूर्ण केला आहे. ३० नागरिकांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे.