शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

राजुरा शहरातील गुंडगिरीला आवर घाला

By admin | Updated: July 12, 2015 01:20 IST

राजुरा शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले असून त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

बी.यू.बोर्डेवार ल्ल राजुराराजुरा शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले असून त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. राजुरा पोलिसांचा गुंडावरील धाक संपुष्टात आला की काय, अशी शंका निर्माण होण्याईतकी परिस्थिती बिघडली आहे. भारतीय जनता पक्षाचे राजुरा शहर अध्यक्ष तथा पत्रकार बादल बेले यांच्यावर हल्ला केला जातो. कर्नल चौकातून रामनगर कॉलनीपर्यंत त्यांना बेदम मारहाण करीत नेले जाते, एखाद्या सिनेमात शोभावी अशी ही थरारक घटना परवा राजुरा शहरातील नागरिकांनी पाहिली. याला गुंडाराज म्हणावे नाही तर काय? राजुरा शहरातील वातावरण दूषित होत चालल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. हे गुंड पत्रकाराच्या गळ्यातील ४० हजार रुपयांची सोन्याची साखळी ओरबडून नेतात. खिशात हात घालून पाकीट काढून घेतात. मोबाईल फोडून टाकतात, याला काय म्हणावे. यावरून या गुंडांना कायद्याचा धाकच उरला नाही, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. राजुरा शहरात यापूर्वी अशी घटना कधीच घडली नाही. सोनियानगर आणि बेघरवस्ती या दोन वसाहतीतील वाद पोलिसांनी योग्य प्रकारे हाताळला नाही. त्यामुळेच ही भ्याड हल्ल्याची घटना घडली, असा आरोप आता केला जात आहे. अशा घटना घडल्यानंतर राजुरा शहरात पोलीस यंत्रणा आहे की नाही, अशी शंका येते. राजुराचे ठाणेदार प्रमोद डोंगरे रुजू झाल्यापासून शहरात नव्हे तर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. चोरट्यांचा सातत्याने उच्छाद सुरू आहे. या चोरट्यांनी आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांचे बंधू सतीश धोटे यांचे दुकान फोडले.तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पंचायत समिती चौकातील ट्रॉफीक कंट्रोल लाईन बंद पडली आहे. वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. शहरात धनदांडग्यांची मिसरूडही न फुटलेली मुले वाऱ्याच्या वेगाने वाहने चालवून पादचारी ज्येष्ठ नागरिकांना हैराण करतात. पोलिसांनी तीन महिन्यात ६३ व्यक्तींंवर अवैध दारु विक्रीचे गुन्हे दाखल करुन पाच लाखांची दारु जप्त केली. मात्र तालुक्यातील गावागावांत दारुचा महापूर वाहतच आहे. राजुरा शहरात काही दिवसांपूर्वी पंचायत समिती चौकात एकाला अडवून मारहाण करण्यात आली. देशी कट्टा घेऊन शहरात काही व्यक्ती शिरल्याची माहिती पोलिसांना होती. परंतु पोलिसांना आपला हिसका दाखविता आला नाही. राजुरा शहरात अवैध भंगार खरेदी, अवैध वाहतूक, ओव्हरलोड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र आहे. एखादी माहिती पोलिसांना दिली तर ती माहिती सार्वजनिक होते. त्यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास उडत चालला आहे.राजुराचे तत्कालिन ठाणेदार संजय निकम यांची तर दहा महिन्यातच बदली झाली. येथील पाच वाहतूक पोलिसांची अकारण बदली करून त्यांना जिल्हा मुख्यालयात पाठविण्यात आले. त्यांची चौकशी समितीतर्फे चौकशी झाल्यानंतर ते निर्दोष आढळले. आता पोलिसच पोलिसांवर अन्याय करीत असतील तर सामान्य नागरिकांना न्याय कोण मिळवून देणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. राजुरा तालुक्यात सट्टापट्टीसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू असून ‘एन्ट्री’ सुद्धा डबल केल्याची विश्वसनिय माहिती आहे. आॅटोवाल्यांकडूनसुद्धा हप्ते वसुल केले जात आहेत.शहरात चार झोन पाडण्यात आले. मग एवढी गुंडागर्दी का वाढली. पत्रकारांवर हल्ला होत असताना हे झोनचे पोलीस कुठे होते. सगळे कसे आलबेल सुरू असून जोपर्यंत कडक कारवाई होणार नाही, तो पर्यंत गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच राहणार आहे. गुन्हेगारीचे प्रमाण कमी करायचे असेल तर पोलिसांचा दरारा वाढणे गरजेचे आहे. नाही तर ‘सेटलमेंट’ चे धोरण ठेवले तर परिस्थिती बिघडायला वेळ लागणार नाही.