शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

राजुरा शहरातील गुंडगिरीला आवर घाला

By admin | Updated: July 12, 2015 01:20 IST

राजुरा शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले असून त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

बी.यू.बोर्डेवार ल्ल राजुराराजुरा शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले असून त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. राजुरा पोलिसांचा गुंडावरील धाक संपुष्टात आला की काय, अशी शंका निर्माण होण्याईतकी परिस्थिती बिघडली आहे. भारतीय जनता पक्षाचे राजुरा शहर अध्यक्ष तथा पत्रकार बादल बेले यांच्यावर हल्ला केला जातो. कर्नल चौकातून रामनगर कॉलनीपर्यंत त्यांना बेदम मारहाण करीत नेले जाते, एखाद्या सिनेमात शोभावी अशी ही थरारक घटना परवा राजुरा शहरातील नागरिकांनी पाहिली. याला गुंडाराज म्हणावे नाही तर काय? राजुरा शहरातील वातावरण दूषित होत चालल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. हे गुंड पत्रकाराच्या गळ्यातील ४० हजार रुपयांची सोन्याची साखळी ओरबडून नेतात. खिशात हात घालून पाकीट काढून घेतात. मोबाईल फोडून टाकतात, याला काय म्हणावे. यावरून या गुंडांना कायद्याचा धाकच उरला नाही, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. राजुरा शहरात यापूर्वी अशी घटना कधीच घडली नाही. सोनियानगर आणि बेघरवस्ती या दोन वसाहतीतील वाद पोलिसांनी योग्य प्रकारे हाताळला नाही. त्यामुळेच ही भ्याड हल्ल्याची घटना घडली, असा आरोप आता केला जात आहे. अशा घटना घडल्यानंतर राजुरा शहरात पोलीस यंत्रणा आहे की नाही, अशी शंका येते. राजुराचे ठाणेदार प्रमोद डोंगरे रुजू झाल्यापासून शहरात नव्हे तर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. चोरट्यांचा सातत्याने उच्छाद सुरू आहे. या चोरट्यांनी आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांचे बंधू सतीश धोटे यांचे दुकान फोडले.तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पंचायत समिती चौकातील ट्रॉफीक कंट्रोल लाईन बंद पडली आहे. वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. शहरात धनदांडग्यांची मिसरूडही न फुटलेली मुले वाऱ्याच्या वेगाने वाहने चालवून पादचारी ज्येष्ठ नागरिकांना हैराण करतात. पोलिसांनी तीन महिन्यात ६३ व्यक्तींंवर अवैध दारु विक्रीचे गुन्हे दाखल करुन पाच लाखांची दारु जप्त केली. मात्र तालुक्यातील गावागावांत दारुचा महापूर वाहतच आहे. राजुरा शहरात काही दिवसांपूर्वी पंचायत समिती चौकात एकाला अडवून मारहाण करण्यात आली. देशी कट्टा घेऊन शहरात काही व्यक्ती शिरल्याची माहिती पोलिसांना होती. परंतु पोलिसांना आपला हिसका दाखविता आला नाही. राजुरा शहरात अवैध भंगार खरेदी, अवैध वाहतूक, ओव्हरलोड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र आहे. एखादी माहिती पोलिसांना दिली तर ती माहिती सार्वजनिक होते. त्यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास उडत चालला आहे.राजुराचे तत्कालिन ठाणेदार संजय निकम यांची तर दहा महिन्यातच बदली झाली. येथील पाच वाहतूक पोलिसांची अकारण बदली करून त्यांना जिल्हा मुख्यालयात पाठविण्यात आले. त्यांची चौकशी समितीतर्फे चौकशी झाल्यानंतर ते निर्दोष आढळले. आता पोलिसच पोलिसांवर अन्याय करीत असतील तर सामान्य नागरिकांना न्याय कोण मिळवून देणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. राजुरा तालुक्यात सट्टापट्टीसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू असून ‘एन्ट्री’ सुद्धा डबल केल्याची विश्वसनिय माहिती आहे. आॅटोवाल्यांकडूनसुद्धा हप्ते वसुल केले जात आहेत.शहरात चार झोन पाडण्यात आले. मग एवढी गुंडागर्दी का वाढली. पत्रकारांवर हल्ला होत असताना हे झोनचे पोलीस कुठे होते. सगळे कसे आलबेल सुरू असून जोपर्यंत कडक कारवाई होणार नाही, तो पर्यंत गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच राहणार आहे. गुन्हेगारीचे प्रमाण कमी करायचे असेल तर पोलिसांचा दरारा वाढणे गरजेचे आहे. नाही तर ‘सेटलमेंट’ चे धोरण ठेवले तर परिस्थिती बिघडायला वेळ लागणार नाही.