शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या पॉझिटिव्ह रुग्णामुळे वाढली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:01 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील दुसरा रुग्ण पॉझिटीव्ह आल्यानंतर एक व्हिडिओ संदेश विजय वडेट्टीवार यांनी जारी केला. यामध्ये त्यांनी जिल्हावासीयांना कोरोना आजाराला सहज न घेण्याचे आवाहन केले. अन्य राज्यातील, जिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्यात परत घेताना त्यांना आता संस्थात्मक अलगीकरण (इन्स्टिट्यूशनल क्वारन्टाईन ) करण्याचे निर्देश दिले. आत्तापर्यंत जिल्हा हा कोरोनामुक्त होता.

ठळक मुद्देबिनबा गेट परिसर सील : चंद्रपुरात १७ मेपर्यंत पुन्हा लॉकडाऊन पूर्ववत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपुरात बुधवारी दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. महानगर प्रशासनाने ९ मे रोजी यवतमाळ येथून आलेल्या २३ वर्षीय मुलीला होम क्वारन्टाईन केले होते. ११ मे रोजी या मुलीचे स्वॅब घेण्यात आले. त्याचा अहवाल बुधवारी पॉझिटीव्ह आला. त्यामुळे तत्काळ आरोग्य पथक सदर मुलगी राहत असलेल्या बिनगा गेट परिसरात दाखल झाले. पुढील १४ दिवसांसाठी बिनबा गेट परिसर सील करण्यात आला आहे.जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी स्वत: बिनबा गेट परिसरात जाऊन पाहणी केली. दरम्यान यापुढे रेडझोनमधून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला संस्थात्मक अलगीकरण (इन्स्टिटयूशनल क्वारन्टाइन) करण्यात यावेत, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.चंद्रपूर जिल्ह्यातील दुसरा रुग्ण पॉझिटीव्ह आल्यानंतर एक व्हिडिओ संदेश विजय वडेट्टीवार यांनी जारी केला. यामध्ये त्यांनी जिल्हावासीयांना कोरोना आजाराला सहज न घेण्याचे आवाहन केले. अन्य राज्यातील, जिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्यात परत घेताना त्यांना आता संस्थात्मक अलगीकरण (इन्स्टिट्यूशनल क्वारन्टाईन ) करण्याचे निर्देश दिले. आत्तापर्यंत जिल्हा हा कोरोनामुक्त होता. २ मे रोजी रात्रपाळी काम करणारा एक सुरक्षारक्षक पॉझिटिव्ह आढळला. मात्र त्याच्या कुटुंबातील कोणीही पॉझिटिव्ह नाही. तो राहत असलेला कृष्णनगर परिसर व सुरक्षारक्षक म्हणून काम करत असलेल्या अपार्टमेंटमध्ये कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही. सगळ्यांचे नमुने निगेटिव्ह निघाले आहेत. बुधवारी पुन्हा एक रुग्ण पॉझिटिव्ह निघाला. यापुढे नागरिक रेडझोन व जोखमीच्या जिल्ह्यातून परतल्यानंतर त्यांना संस्थात्मक अलगीकरण करण्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.१३ मे रोजी रात्री १२ वाजतापासून १७ मे रोजीपर्यंत संपूर्ण चंद्रपूर शहरात ४ मेपूर्वी असणारे लॉकडाऊन कायम राहील, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे १४ मेपासून शहरांमध्ये फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत उघडी राहणार आहेत.संपर्कातील नागरिकांची सूची तयार करणारसंबंधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची सूची तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर या परिसरातील संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब तपासणी करणे, परिसराची संपूर्ण नाकाबंदी करणे, आरोग्य पथक प्रत्येक घराच्या तपासणीसाठी गठित करण्यात येणार आहे. पोलीस विभागाने तत्काळ या परिसरात नाकाबंदी करावी, असे निर्देशही ना. वडेट्टीवार यांनी दिले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या