शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

धानाला उत्पादन खर्चानुसार हमी भाव घोषित करा

By admin | Updated: March 27, 2015 00:54 IST

आधीच सततची नापिकी, पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना धान पिकाशिवाय उपजिविकेचे अन्य साधन नाही,

सावली : आधीच सततची नापिकी, पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना धान पिकाशिवाय उपजिविकेचे अन्य साधन नाही, अवेळी अपुऱ्या व कमी पावसाने शेतरकरी त्रस्त आहे. त्यातच निर्यात बंदीमुळे शासनाचे हमी भाव देखील घसरले आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर असून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या हवालदिल शेतकऱ्याला न्याय देण्याकरिता उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव शासनाने घोषित करावे, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी लोकसभेत केली. महाराष्ट्र राज्याच्या पूर्व-विदर्भ भागात असलेल्या गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा तथा नागपूर जिल्ह्याच्या काही भागातील धान ुउत्पादकांच्या प्रश्नावर खा. अशोक नेते म्हणाले, या भागातील शेतकऱ्यांचे धानपिक हे मुख्य पीक आहे. गडचिरोली सारख्या अतिमागास जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी नाहीत. मागील खरीपात विलंबाने व अपुऱ्या पावसामुळे पेरणीचे व धान पिकाचे अतोनात नुकसान झाले. मात्र शेतकऱ्यांच्या धानाला भाव कमी मिळत आहे. भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, थायलंड हे धानाचे प्रमुख निर्यात देश आहेत. परंतु, आता या देशाच्या स्पर्धेत काही इतर देश सहभागी झाले असून कमी दराने भाताची निर्यात करीत आहेत. त्यातच इराण व इराक भाताची आयात करणाऱ्या देशानी मार्च अखेर पर्यंत आयात बंद केली आहे. त्यामुळे भारतातील भाताची निर्यात रखडलेली आहे. परिणामी धानाचे हमीभाव कमी झाले आहे.व्यापाऱ्यांना कवडीमोल दराने धान विकावे लागत आहे. त्यामुळे गरीब शेतकरी लाचार व हवालदील झाला असून सामान्य व इतर शेतकऱ्यांचा माल योग्य दराच्या प्रतीक्षेत घरी अथवा गोडावूनमध्ये पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाप्रती प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्यासाठी धानाला उत्पादन खर्चावर हमी भाव शासनाने जाहीर करावा अशी सूचना लोकसभा अध्यक्षामार्फत खा. अशोक नेते यांनी केंद्र शासनाकडे केली आहे. त्यामुळे केंद्र शासन त्यांच्या सूचनेची दखल घेऊन हमी भाव जाहीर करेल का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. (तालुका प्रतिनिधी)