शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

धानाला उत्पादन खर्चानुसार हमी भाव घोषित करा

By admin | Updated: March 27, 2015 00:54 IST

आधीच सततची नापिकी, पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना धान पिकाशिवाय उपजिविकेचे अन्य साधन नाही,

सावली : आधीच सततची नापिकी, पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना धान पिकाशिवाय उपजिविकेचे अन्य साधन नाही, अवेळी अपुऱ्या व कमी पावसाने शेतरकरी त्रस्त आहे. त्यातच निर्यात बंदीमुळे शासनाचे हमी भाव देखील घसरले आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर असून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या हवालदिल शेतकऱ्याला न्याय देण्याकरिता उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव शासनाने घोषित करावे, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी लोकसभेत केली. महाराष्ट्र राज्याच्या पूर्व-विदर्भ भागात असलेल्या गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा तथा नागपूर जिल्ह्याच्या काही भागातील धान ुउत्पादकांच्या प्रश्नावर खा. अशोक नेते म्हणाले, या भागातील शेतकऱ्यांचे धानपिक हे मुख्य पीक आहे. गडचिरोली सारख्या अतिमागास जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी नाहीत. मागील खरीपात विलंबाने व अपुऱ्या पावसामुळे पेरणीचे व धान पिकाचे अतोनात नुकसान झाले. मात्र शेतकऱ्यांच्या धानाला भाव कमी मिळत आहे. भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, थायलंड हे धानाचे प्रमुख निर्यात देश आहेत. परंतु, आता या देशाच्या स्पर्धेत काही इतर देश सहभागी झाले असून कमी दराने भाताची निर्यात करीत आहेत. त्यातच इराण व इराक भाताची आयात करणाऱ्या देशानी मार्च अखेर पर्यंत आयात बंद केली आहे. त्यामुळे भारतातील भाताची निर्यात रखडलेली आहे. परिणामी धानाचे हमीभाव कमी झाले आहे.व्यापाऱ्यांना कवडीमोल दराने धान विकावे लागत आहे. त्यामुळे गरीब शेतकरी लाचार व हवालदील झाला असून सामान्य व इतर शेतकऱ्यांचा माल योग्य दराच्या प्रतीक्षेत घरी अथवा गोडावूनमध्ये पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाप्रती प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्यासाठी धानाला उत्पादन खर्चावर हमी भाव शासनाने जाहीर करावा अशी सूचना लोकसभा अध्यक्षामार्फत खा. अशोक नेते यांनी केंद्र शासनाकडे केली आहे. त्यामुळे केंद्र शासन त्यांच्या सूचनेची दखल घेऊन हमी भाव जाहीर करेल का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. (तालुका प्रतिनिधी)