शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

पाच तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:32 IST

तालुक्यात उशिरा व पुरेसा पाऊस न झाल्याने केवळ ४० टक्के धानाची रोवणी पूर्ण होऊ शकली.

ठळक मुद्देकाँग्रेस कमिटीची मागणी : मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यात उशिरा व पुरेसा पाऊस न झाल्याने केवळ ४० टक्के धानाची रोवणी पूर्ण होऊ शकली. तर ऐन कापणीच्या वेळेस धान पिकाला मावा व तुडतुडा रोगांने पिकांवर हल्ला केल्याने प्रचंड नुकसान झाले. १० ते १५ टक्के उत्त्पन्नाची खात्री राहिली नाही. पिकाची शाश्वती राहिलेली नाही. हीच स्थिती सावली, सिंदेवाही, पोंभूर्णा, ब्रह्मपुरी तालुक्यातही आहे. त्यामुळे ५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा सरचिटणीस संजय मारकवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मूल येथे निवेदनाद्वारे केली.वर्षभर शेतात राबराब राबूनही निसर्गाच्या लहरीपणामुळे हातात आलेले पीक गमावण्याची वेळ आली. अनेक शेतकरी कर्जबाजारी होत आहे. चिंताग्रस्त शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करू शकतात. काही शेतात धानाचे पीक दूरून बरे दिसत असले तरी, प्रत्यक्षातील स्थिती चिंताजनक आहे. सन २०१५ मध्ये मूल तालुक्यासह सावली, सिंदेवाही, पोंभूर्णा, ब्रह्मपुरी तालुक्यांची पैसेवारी ५० पेक्षा कमी होती. मात्र त्यावेळीसुद्धा शेतकºयांची घोर निराशा केली. यावेळी मात्र त्यापेक्षाही बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकºयांना आत्महत्येशिवाय पर्याय दिसत नाही. धान उत्पादक शेतकºयांची वास्तविक परिस्थिती लक्षात घेवून एकरी १० हजार रुपये किंवा १ हजार रुपये प्रति क्विंटल रुपयांची घोषणा करावी अथवा तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष घनश्याम येनूरकर, राकेश रत्नावार, धनंजय चिंतावार, विनोद कामडे आदी उपस्थित होते.