शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

प्राणी सेवाकेंद्र बंद पडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 10:30 PM

पिरली येथील 'पिपल्स फॉर अ‍ॅनिमल' संस्थेच्या प्राणी सुधार केंद्राला मिळणारी शासकीय मदत मागील पाच वर्षांपासून बंद करण्यात आली. त्यामुळे हे केंद्र आर्थिक संकटात सापडले आहे. केंद्रात सुमारे १०० जनावरे असून वैरणाचा खर्च कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला.

ठळक मुद्देपाच वर्षांपासून अनुदान बंद : चाऱ्याअभावी १०० जनावरांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्कआयुधनिर्माणी (भद्रावती) : पिरली येथील 'पिपल्स फॉर अ‍ॅनिमल' संस्थेच्या प्राणी सुधार केंद्राला मिळणारी शासकीय मदत मागील पाच वर्षांपासून बंद करण्यात आली. त्यामुळे हे केंद्र आर्थिक संकटात सापडले आहे. केंद्रात सुमारे १०० जनावरे असून वैरणाचा खर्च कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला.तत्कालीन केंद्रीय सामाजिक न्याय तथा पर्यावरणमंत्री मनेका गांधी यांच्या कल्पनेतून पिपल्स फॉर अ‍ॅनिमल संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेने देशभरात अनेक शाखा तयार केल्या आहेत. पिरली येथे डॉ. महावीर सोईतकर यांच्या अध्यक्षतेखाली हे केंद्र सुरू करण्यात आली. सचिवपदावर भद्रावती येथील डॉ. दिलीप धोंगडे काम पाहतात. या संस्थेला श्रीहरी धोंगडे यांनी जमीन दान दिली. त्या जागेवर प्राणीसेवा केंद्र सुरू करण्यात आले. प्रारंभी भारतीय जीव जंतू कल्याण बोर्डाकडून संस्थेला अल्पशी आर्थिक मदत मिळत होती. त्यावर केंद्राचा कारभार सुरू होता. मात्र २०१३ नंतर केंद्र सरकारची आर्थिक मदत बंद झाल्याने संस्थेचे कार्य अडचणीत आले. दरम्यान, केंद्र चालविण्यासाठी डॉ. सोईतकर यांनी पदरमोड करून दर महिन्याचा खर्च करीत होते. डॉ. धोंगडे यांनीही स्वत:ची मालमत्ता विकून केंद्राला हातभार लावणे सुरू ठेवले. पण केंद्रात १०० जनावरे व कर्मचाºयांचा खर्च सांभाळण्यासाठी ते आर्थिकदृष्ट्या हतबल झाले. कसायाकडून जप्त केलेली व अपघातातून वाचलेली अपंग जनावरे तथा गरीब शेतकºयांनी आणलेल्या शंभराहून अधिक जनावरांच्या रोजच्या वैरणाचा खर्च परवडत नाही. शासन एकीकडे गोपालनासाठी प्रोत्साहन देत असल्याची घोषणा करते तर दुसरीकडे अनुदान बंद करणे सुरू केले. त्यामुळे शहरातील गो-पालक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.लोकप्रतिनिधींची उदासिनताकेंद्र व राज्य शासनाने गोहत्या बंदी, गोपालन आदी विषयांवरून देशभरातील वातावरण ढवळून काढत आहेत. काही कट्टर धर्मवादी व्यक्ती अथवा संघटनांनी अस्मिताकेंद्री राजकारण करून वातावरण तापवत आहेत. पण गो-पालनासाठी प्रामाणिकपणे कार्य संस्थांना अनुदान देणे बंद केले. यावरून शेतकºयांमध्येही प्रचंड नाराजी आहे. लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याने पिरली येथील केंद्र्र बंद पडण्याच्या मार्गावर आहे. समाजातील दानदात्यांनी केंद्राला मदतीचा हात पुढे केल्यास गो-पालनाचे कार्य अविरत सुरू राहू शकेल.