शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

ऐन हंगामात उभ्या पिकावर चालविला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 23:20 IST

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : सोयाबिनची शेतात पेरणी केली. डौलदार पीक उभे झाले. मात्र वन्यप्राण्यांकडून सोयाबिनच्या पिकाची अक्षरश: नासधूस झाली. मोठ्या मेहनतीने शेतकऱ्यांनी उभे केलेले सोयाबीनचे पीक रानडुक्क़र, हरीण, रोही या वन्यप्राण्यांनी उद्ध्वस्त केले. त्यामुळे हताश झालेल्या पोवनी येथील शेतकऱ्याने स्वत:च्या दोन एकरातील पिकावरच नांगर फिरवला. ऐन हंगामात शेतकऱ्याला ...

ठळक मुद्देवन्यप्राण्यांकडून पीक उद्ध्वस्त: हताश शेतकऱ्याचे पाऊल

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : सोयाबिनची शेतात पेरणी केली. डौलदार पीक उभे झाले. मात्र वन्यप्राण्यांकडून सोयाबिनच्या पिकाची अक्षरश: नासधूस झाली. मोठ्या मेहनतीने शेतकऱ्यांनी उभे केलेले सोयाबीनचे पीक रानडुक्क़र, हरीण, रोही या वन्यप्राण्यांनी उद्ध्वस्त केले. त्यामुळे हताश झालेल्या पोवनी येथील शेतकऱ्याने स्वत:च्या दोन एकरातील पिकावरच नांगर फिरवला. ऐन हंगामात शेतकऱ्याला हा निर्णय घ्यावा लागला. यावरून वन्यप्राण्यांचा शेतातील हैदोस कितपत वाढला असेल, हे दिसून येते.राजेश ऊ लमाले रा. पोवनी असे सदर शेतकºयाचे नाव आहे. या घटनेमुळे वनविभागाप्रति रोष व्यक्त करण्यात येत असून वन्यप्राण्यांच्या बंदोबस्त करण्याची जबाबदारी वनविभागाची असताना वनविभागाचे जबाबदार अधिकारी करतात तरी काय, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.शेतकरी राजेश ऊलमाले यांनी त्यांच्या तीन एकर शेतातील दोन एकर शेतात सोयाबिनचे पीक लावले होते. पंरतु वन्यप्राण्यांनी हे पीक पूर्णत: उद्ध्वस्त करून टाकले. ऊलमाले यांचे शेत अगदी वेकोलिने टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्यालगत आहे. या ठिकाणी वन्यप्राण्यांचा नेहमीच वावर असतो. या परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतीची कमी-जास्त प्रमाणात वन्यप्राण्यांनी नासधूस केली आहे. वन्यप्राणी दिवस-रात्र शेतीची अशी नासधूस करीत असेल तर शेती करूनच काय फायदा, असा प्रश्न पोवनी परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. वनविभागाने शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पोवनीवासीयांनी केली आहे. उसनवारी कर्ज काढून या शेतकऱ्याने कशीबशी शेती केली होती. मात्र वन्यप्राण्यांनी पिकाची नासधूस केल्याने नुकसान झाले आहे.वनविभागाचे अधिकारी करतात तरी काय?वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी वनविभागाची आहे. परंतु वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पीक उद्ध्वस्त करीत असताना वनविभाग वन्यप्राण्यांचा बंदोबस्त का करीत नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. वनविभाग वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करीत नसेल तर वनविभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी करतात तरी काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक झाले आहे.माझ्या शेतात दोन एकरात सोयाबीनचे पीक घेतले होते. परंतु वन्यप्राण्यांनी संपूर्ण पीक उद्ध्वस्त केले. त्यामुळे सोयाबीनच्या पिकात नांगर चालवून पीक पूर्णत: काढून टाकले आहे. आता याठिकाणी दुसरे पीक घ्यावे लागणार आहे. याला वनविभाग दोषी आहे.- राजेश ऊ लमालेनुकसानग्रस्त शेतकरी, पोवनी