शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

ऐन हंगामात उभ्या पिकावर चालविला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 23:20 IST

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : सोयाबिनची शेतात पेरणी केली. डौलदार पीक उभे झाले. मात्र वन्यप्राण्यांकडून सोयाबिनच्या पिकाची अक्षरश: नासधूस झाली. मोठ्या मेहनतीने शेतकऱ्यांनी उभे केलेले सोयाबीनचे पीक रानडुक्क़र, हरीण, रोही या वन्यप्राण्यांनी उद्ध्वस्त केले. त्यामुळे हताश झालेल्या पोवनी येथील शेतकऱ्याने स्वत:च्या दोन एकरातील पिकावरच नांगर फिरवला. ऐन हंगामात शेतकऱ्याला ...

ठळक मुद्देवन्यप्राण्यांकडून पीक उद्ध्वस्त: हताश शेतकऱ्याचे पाऊल

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : सोयाबिनची शेतात पेरणी केली. डौलदार पीक उभे झाले. मात्र वन्यप्राण्यांकडून सोयाबिनच्या पिकाची अक्षरश: नासधूस झाली. मोठ्या मेहनतीने शेतकऱ्यांनी उभे केलेले सोयाबीनचे पीक रानडुक्क़र, हरीण, रोही या वन्यप्राण्यांनी उद्ध्वस्त केले. त्यामुळे हताश झालेल्या पोवनी येथील शेतकऱ्याने स्वत:च्या दोन एकरातील पिकावरच नांगर फिरवला. ऐन हंगामात शेतकऱ्याला हा निर्णय घ्यावा लागला. यावरून वन्यप्राण्यांचा शेतातील हैदोस कितपत वाढला असेल, हे दिसून येते.राजेश ऊ लमाले रा. पोवनी असे सदर शेतकºयाचे नाव आहे. या घटनेमुळे वनविभागाप्रति रोष व्यक्त करण्यात येत असून वन्यप्राण्यांच्या बंदोबस्त करण्याची जबाबदारी वनविभागाची असताना वनविभागाचे जबाबदार अधिकारी करतात तरी काय, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.शेतकरी राजेश ऊलमाले यांनी त्यांच्या तीन एकर शेतातील दोन एकर शेतात सोयाबिनचे पीक लावले होते. पंरतु वन्यप्राण्यांनी हे पीक पूर्णत: उद्ध्वस्त करून टाकले. ऊलमाले यांचे शेत अगदी वेकोलिने टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्यालगत आहे. या ठिकाणी वन्यप्राण्यांचा नेहमीच वावर असतो. या परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतीची कमी-जास्त प्रमाणात वन्यप्राण्यांनी नासधूस केली आहे. वन्यप्राणी दिवस-रात्र शेतीची अशी नासधूस करीत असेल तर शेती करूनच काय फायदा, असा प्रश्न पोवनी परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. वनविभागाने शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पोवनीवासीयांनी केली आहे. उसनवारी कर्ज काढून या शेतकऱ्याने कशीबशी शेती केली होती. मात्र वन्यप्राण्यांनी पिकाची नासधूस केल्याने नुकसान झाले आहे.वनविभागाचे अधिकारी करतात तरी काय?वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी वनविभागाची आहे. परंतु वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पीक उद्ध्वस्त करीत असताना वनविभाग वन्यप्राण्यांचा बंदोबस्त का करीत नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. वनविभाग वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करीत नसेल तर वनविभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी करतात तरी काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक झाले आहे.माझ्या शेतात दोन एकरात सोयाबीनचे पीक घेतले होते. परंतु वन्यप्राण्यांनी संपूर्ण पीक उद्ध्वस्त केले. त्यामुळे सोयाबीनच्या पिकात नांगर चालवून पीक पूर्णत: काढून टाकले आहे. आता याठिकाणी दुसरे पीक घ्यावे लागणार आहे. याला वनविभाग दोषी आहे.- राजेश ऊ लमालेनुकसानग्रस्त शेतकरी, पोवनी