शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

ऐन हंगामात उभ्या पिकावर चालविला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 23:20 IST

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : सोयाबिनची शेतात पेरणी केली. डौलदार पीक उभे झाले. मात्र वन्यप्राण्यांकडून सोयाबिनच्या पिकाची अक्षरश: नासधूस झाली. मोठ्या मेहनतीने शेतकऱ्यांनी उभे केलेले सोयाबीनचे पीक रानडुक्क़र, हरीण, रोही या वन्यप्राण्यांनी उद्ध्वस्त केले. त्यामुळे हताश झालेल्या पोवनी येथील शेतकऱ्याने स्वत:च्या दोन एकरातील पिकावरच नांगर फिरवला. ऐन हंगामात शेतकऱ्याला ...

ठळक मुद्देवन्यप्राण्यांकडून पीक उद्ध्वस्त: हताश शेतकऱ्याचे पाऊल

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : सोयाबिनची शेतात पेरणी केली. डौलदार पीक उभे झाले. मात्र वन्यप्राण्यांकडून सोयाबिनच्या पिकाची अक्षरश: नासधूस झाली. मोठ्या मेहनतीने शेतकऱ्यांनी उभे केलेले सोयाबीनचे पीक रानडुक्क़र, हरीण, रोही या वन्यप्राण्यांनी उद्ध्वस्त केले. त्यामुळे हताश झालेल्या पोवनी येथील शेतकऱ्याने स्वत:च्या दोन एकरातील पिकावरच नांगर फिरवला. ऐन हंगामात शेतकऱ्याला हा निर्णय घ्यावा लागला. यावरून वन्यप्राण्यांचा शेतातील हैदोस कितपत वाढला असेल, हे दिसून येते.राजेश ऊ लमाले रा. पोवनी असे सदर शेतकºयाचे नाव आहे. या घटनेमुळे वनविभागाप्रति रोष व्यक्त करण्यात येत असून वन्यप्राण्यांच्या बंदोबस्त करण्याची जबाबदारी वनविभागाची असताना वनविभागाचे जबाबदार अधिकारी करतात तरी काय, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.शेतकरी राजेश ऊलमाले यांनी त्यांच्या तीन एकर शेतातील दोन एकर शेतात सोयाबिनचे पीक लावले होते. पंरतु वन्यप्राण्यांनी हे पीक पूर्णत: उद्ध्वस्त करून टाकले. ऊलमाले यांचे शेत अगदी वेकोलिने टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्यालगत आहे. या ठिकाणी वन्यप्राण्यांचा नेहमीच वावर असतो. या परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतीची कमी-जास्त प्रमाणात वन्यप्राण्यांनी नासधूस केली आहे. वन्यप्राणी दिवस-रात्र शेतीची अशी नासधूस करीत असेल तर शेती करूनच काय फायदा, असा प्रश्न पोवनी परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. वनविभागाने शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पोवनीवासीयांनी केली आहे. उसनवारी कर्ज काढून या शेतकऱ्याने कशीबशी शेती केली होती. मात्र वन्यप्राण्यांनी पिकाची नासधूस केल्याने नुकसान झाले आहे.वनविभागाचे अधिकारी करतात तरी काय?वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी वनविभागाची आहे. परंतु वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पीक उद्ध्वस्त करीत असताना वनविभाग वन्यप्राण्यांचा बंदोबस्त का करीत नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. वनविभाग वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करीत नसेल तर वनविभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी करतात तरी काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक झाले आहे.माझ्या शेतात दोन एकरात सोयाबीनचे पीक घेतले होते. परंतु वन्यप्राण्यांनी संपूर्ण पीक उद्ध्वस्त केले. त्यामुळे सोयाबीनच्या पिकात नांगर चालवून पीक पूर्णत: काढून टाकले आहे. आता याठिकाणी दुसरे पीक घ्यावे लागणार आहे. याला वनविभाग दोषी आहे.- राजेश ऊ लमालेनुकसानग्रस्त शेतकरी, पोवनी