शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
4
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
5
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
6
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
7
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
8
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
9
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
10
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
11
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
12
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
13
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
14
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
15
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
16
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
17
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
18
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
19
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
20
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...

अन् चिता जळते ग्रामपंचायत समोरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:30 IST

प्रशासनाला जाग नाही : पाच वर्षांपासून स्मशानभूमीच्या जागेसाठी संघर्ष प्रकाश पाटील मासळ (बु) : गाव तिथे सुसज्ज स्मशानभूमी व्हावी, ...

प्रशासनाला जाग नाही : पाच वर्षांपासून स्मशानभूमीच्या जागेसाठी संघर्ष

प्रकाश पाटील

मासळ (बु) : गाव तिथे सुसज्ज स्मशानभूमी व्हावी, असा शासनाचा मानस असताना नंदारा गावात अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीसाठी हक्काची जागाच उपलब्ध नाही. गावाच्या अगदी ग्रामपंचायतीसमोरच मृतावर अंत्यसंस्कार केले जातात. असे असतानाही प्रशासनाला जाग आली नाही, हे विशेष.

तालुक्यापासून काही अंतरावर असलेल्या नंदारा गावात स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष उलटूनही समस्या सुटू शकल्या नाही. अंत्यसंस्कारचे सोपस्कार पार पाडण्यासाठी व गावात कोणाचाही मृत्यू झाल्यास चिता जाळण्यासाठी हक्काची जागा नाही. त्यामुळे गावातील नागरिक ग्रामपंचायतीसमोरील खाली जागेत चितेला मुखाग्नी देत आहेत. नंदारा ग्रामपंचायतीने मागील पाच वर्षांपासून निस्तार पत्रकाप्रमाणे तलाठी साजा क्र. ११ भूमापन क्र. ३८ मधील ०.४० हे.आर जागा स्मशानभूमीकरिता मिळावी म्हणून चिमूर महसूल विभागाशी नंदारा ग्रामपंचायतने पत्रव्यवहार केला; मात्र प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नाही. लोकप्रतिनिधीकडूनही फक्त आश्वासनेच मिळतात; मात्र गावकऱ्यांच्या हक्काच्या स्मशानभूमीकरिता जागाच मिळू शकली नाही.

ग्रामपंचायतीसमोरच अंत्यसंस्कार होत असतानाही प्रशासन उघड्या डोळ्याने बघूनही गप्पच असल्याने समस्या ‘जैसे थे’ आहे.

कोट

महसूल विभागाला मागील पाच वर्षांपासून स्मशानभूमीची जागा मिळावी म्हणून पत्रव्यवहार सुरूच आहे; परंतु अजूनपर्यंत पत्राला प्रतिसाद मिळाला नाही.

-केशव गजभे, ग्रामसेवक, नंदारा.

..................................................................................

" स्मशानभूमीसाठी राखीव जागा नसल्याने अंत्यसंस्कार मिळेल त्या जागेवर करावा लागत आहे, तसेच पावसाळ्यात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य राहत असल्याने अनेक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने दखल घेऊन स्मशानभूमीची जागा राखीव करावी.

नत्थु खाटे, गावकरी, नंदारा.

290721\1651-img-20210724-wa0128.jpg

नंदारा ग्रामपंचायतीच्या समोरील खाली जागेतच शेवटचा अत्यसंस्कार करावा लागत आहे.