शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

चंद्रपूर जिल्ह्यात आनंदवन परिसर सील; बँकेचे कर्मचारीच आणून देताना ग्राहकांना रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 15:31 IST

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी आनंदवनला जिल्हा प्रशासनाने सील केले. याच आवारात बँकेची शाखा आहे. या इमारतीपासून बँकेचे कर्मचारी आंदवन प्रवेशद्वारावर येतात आणि ग्राहकांचे काम घेवून जातात. त्यानंतर काही वेळाने रक्कम अथवा संबंधित दस्ताऐवज परत आणून देण्याचा उपक्रम बँकेने सुरू केला आहे.

ठळक मुद्देबँकेपासून अर्धा किमी अंतरावरून चालतो व्यवहार

प्रवीण खिरटकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा: कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी आनंदवनला जिल्हा प्रशासनाने सील केले. याच आवारात बँकेची शाखा आहे. या इमारतीपासून बँकेचे कर्मचारी आंदवन प्रवेशद्वारावर येतात आणि ग्राहकांचे काम घेवून जातात. त्यानंतर काही वेळाने रक्कम अथवा संबंधित दस्ताऐवज परत आणून देण्याचा उपक्रम बँकेने सुरू केला आहे.आनंदवनात कर्मयोगी बाबा आमटे यांचे कार्य तिसऱ्या पिढीने जोमाने सुरु ठेवले. त्यामुळे समाजसेवेचे कार्य बघण्याकरिता देश- विदेशातील पर्यटक येतात. उन्हाळ्यात पर्यटकांची संख्या अधिक असते. सध्या कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले आहे. त्याचा प्रादूर्भाव होऊ नये, याकरिता जिल्हा प्रशासनाने आनंदवन परिसर सील केले. आनंदवनातील लोकोपयोगी उद्योग व दैनंदीन कामे सुरु आहेत. परंतु कुणालाही प्रवेश नाही. आनंदवनाच्या परिसरात बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. या शाखेत शेकडो खातेदार आहेत.मात्र, ग्राहकांना बँकेपर्यंत जाता येत नाही. त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेने अनोखा उपक्रम सुरू केला. ग्राहक बँकेच्या वेळात आनंदवनच्या प्रवेशद्वारावर येतात त्यावेळी बँकेचे कर्मचारी ग्राहकांचे विड्राल, धनादेश, पासबुक व रक्कम जमा करण्यासाठी स्लीप उपलब्ध करुन देतात.संबंधित कर्मचारी बँकेत घेवून जातात. त्यानंतर आनंदवनाच्या प्रवेशद्वारावर ग्राहकांना सदर रक्कम पोहचवून देण्याचे काम एक महिन्यापासून सुरु आहे.

ग्राहक समाधानीग्राहक व कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद व विश्वासामध्ये वाढ होत असल्याने हे कार्य अविरतपणे सुरू आहे. यामध्ये ग्राहकांचे सर्व व्यवहार करणारे बँक कर्मचारी प्रामाणिकता जोपासत आहेत. लॉकडाऊनच्या काळात बँकेतही गर्दी होत नाही. सर्व व्यवहार सुरळीत असल्याने बँक प्रशासनावरील कामाचा ताण कमी झाला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस