शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

चंद्रपूर जिल्ह्यात आनंदवन परिसर सील; बँकेचे कर्मचारीच आणून देताना ग्राहकांना रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 15:31 IST

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी आनंदवनला जिल्हा प्रशासनाने सील केले. याच आवारात बँकेची शाखा आहे. या इमारतीपासून बँकेचे कर्मचारी आंदवन प्रवेशद्वारावर येतात आणि ग्राहकांचे काम घेवून जातात. त्यानंतर काही वेळाने रक्कम अथवा संबंधित दस्ताऐवज परत आणून देण्याचा उपक्रम बँकेने सुरू केला आहे.

ठळक मुद्देबँकेपासून अर्धा किमी अंतरावरून चालतो व्यवहार

प्रवीण खिरटकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा: कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी आनंदवनला जिल्हा प्रशासनाने सील केले. याच आवारात बँकेची शाखा आहे. या इमारतीपासून बँकेचे कर्मचारी आंदवन प्रवेशद्वारावर येतात आणि ग्राहकांचे काम घेवून जातात. त्यानंतर काही वेळाने रक्कम अथवा संबंधित दस्ताऐवज परत आणून देण्याचा उपक्रम बँकेने सुरू केला आहे.आनंदवनात कर्मयोगी बाबा आमटे यांचे कार्य तिसऱ्या पिढीने जोमाने सुरु ठेवले. त्यामुळे समाजसेवेचे कार्य बघण्याकरिता देश- विदेशातील पर्यटक येतात. उन्हाळ्यात पर्यटकांची संख्या अधिक असते. सध्या कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले आहे. त्याचा प्रादूर्भाव होऊ नये, याकरिता जिल्हा प्रशासनाने आनंदवन परिसर सील केले. आनंदवनातील लोकोपयोगी उद्योग व दैनंदीन कामे सुरु आहेत. परंतु कुणालाही प्रवेश नाही. आनंदवनाच्या परिसरात बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. या शाखेत शेकडो खातेदार आहेत.मात्र, ग्राहकांना बँकेपर्यंत जाता येत नाही. त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेने अनोखा उपक्रम सुरू केला. ग्राहक बँकेच्या वेळात आनंदवनच्या प्रवेशद्वारावर येतात त्यावेळी बँकेचे कर्मचारी ग्राहकांचे विड्राल, धनादेश, पासबुक व रक्कम जमा करण्यासाठी स्लीप उपलब्ध करुन देतात.संबंधित कर्मचारी बँकेत घेवून जातात. त्यानंतर आनंदवनाच्या प्रवेशद्वारावर ग्राहकांना सदर रक्कम पोहचवून देण्याचे काम एक महिन्यापासून सुरु आहे.

ग्राहक समाधानीग्राहक व कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद व विश्वासामध्ये वाढ होत असल्याने हे कार्य अविरतपणे सुरू आहे. यामध्ये ग्राहकांचे सर्व व्यवहार करणारे बँक कर्मचारी प्रामाणिकता जोपासत आहेत. लॉकडाऊनच्या काळात बँकेतही गर्दी होत नाही. सर्व व्यवहार सुरळीत असल्याने बँक प्रशासनावरील कामाचा ताण कमी झाला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस