शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

चंद्रपूरमध्ये अख्खे घर जमिनीत गडप, आणखी ४ घरांना तडे; अपघाताने उडवली एकच खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2022 10:37 IST

५३ कुटुंबांना तत्काळ इतरत्र हलविले; घुग्घुसच्या आमराही वाॅर्डातील 'तो' परिसर सील

घुग्घुस (चंद्रपूर) : घुग्घुस अमराही परिसरातील एक घर शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास शंभर फूट जमिनीत गेल्यानंतर परत त्या परिसरातील चार घरांच्या भिंतीला तडे गेले. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने तत्काळ तेथील ५३ कुटुंबांना इतरत्र हलविले आहे. त्या परिसरात पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला असून, परिसर सील केला आहे.

या परिसरात चार दशकांपूर्वी भूमिगत कोळसा खाणीतून कोळसा ब्लास्टिंग करून काढण्यात आला होता. कोळसा उत्खननासाठी वेकोलिने अधिक क्षमतेची ब्लास्टिंग करून कमी वेळेत अधिक कोळसा उत्पादन असे लक्ष साधून कोळसा उत्पादन केले. मात्र, ती भूमिगत खाण कोळसा काढल्यानंतर व्यवस्थित बुजविण्यात आली नाही. त्यानंतर अनेक वेळा भूकंपासारखे धक्के या परिसरात बसले. भिंतींना तेव्हाही तडे गेले. मात्र, नागरिकांच्या तक्रारीनंतरही वेकोलि आणि जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही.

रिकाम्या क्वाॅर्टरमध्ये तात्पुरती व्यवस्था

यावर्षी पाऊस भरपूर पडल्याने जमिनीत पाणी मुरले व त्यातूनच शुक्रवारी सायंकाळी अमराही वाॅर्डातील गजानन मडावी यांचे घर शंभर फूट जमिनीत गडप झाले. ते मागील २५ वर्षांपासून येथे वास्तव्यास आहेत. सुदैवाने घरात कुणीही नसल्याने जीवितहानी टळली. शनिवारी त्याच परिसरातील चार घराच्या भिंतीला तडे गेल्याने सर्वत्र दहशत पसरली आहे. प्रशासनाने दखल घेत ५३ कुटुंबांना घरातून इतरत्र हलवून त्या परिवाराची तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली आहे. पुनर्वसनाची सोय होईपर्यत वेकोलिने आपल्याच रिकाम्या असलेल्या क्वाॅर्टरमध्ये या कुटुंबाची राहण्याची व्यवस्था करण्याची सूचना केली आहे. वणी क्षेत्राचे मुख्य महाव्यवस्थापक आभाससिंग यांनी शनिवारी या परिसराला भेट देऊन पाहणी केली.

टॅग्स :Accidentअपघातchandrapur-acचंद्रपूरlandslidesभूस्खलन