शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

रक्कम पूर्ण, मात्र घरकूल अर्धवट

By admin | Updated: March 25, 2015 01:27 IST

कोरपना पंचायत समिती अंतर्गत सन २०१० ते २०१४ पर्यंत ५३ ग्रामपंचायतीमध्ये घरकुलाचे वाटप करण्यात आले.

नांदाफाटा: कोरपना पंचायत समिती अंतर्गत सन २०१० ते २०१४ पर्यंत ५३ ग्रामपंचायतीमध्ये घरकुलाचे वाटप करण्यात आले. यात काही गावातील घरकुलासाठी पूर्ण रक्कमही देण्यात आली. मात्र घरकुलाचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. सोबतच सन २०१०- २०१२ पर्यंतच्या मंजूर घरकुलासाठी ६८ हजार रुपये मंजूर असताना तेच घरकुल वाढीव रकमेतील सन २०१३-१४ च्या योजनेत मंजूर झाल्याचे दाखवून ९५ हजारपर्यंत रक्कमेच्या देयकांचे वितरण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये नमुना आठमध्ये पक्क्या घराची नोंद असणाऱ्यांनाही घरकुलाची मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये पिपर्डा, पारधीगुडा, उमरहिरा, कोडशी बु., मांडवा आदी गावांमध्ये घरकुलाची कामे अद्यापही अर्धवट आहे. याबाबत काही महिन्यापूर्वी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या त्रिस्तरीय समितीने या प्रकरणाची चौकशी केली होती. त्यानंतर आता विधानसभेत आमदार आरीफ नसीम खान यांनी या प्रकरणाला न्याय देण्याचा प्रयत्न केला.नुकतीच चौकशी समिती कोरपना येथे दाखल झाली असून चार ते पाच अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता असल्याची माहिती पुढे आली आहे. देयके वाटप करुनही घरकुल पूर्ण न झालेली बहुतांश गावे आदिवासी बहुल भागात असून विचारणा करण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांना अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे समजते. काही ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव घेऊन गावे बीपीएल यादीतून वगळल्यानंतरही अशा नागरिकांच्या नावे घरकुलाचे वाटप झाले कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तालुक्यात जवळपास २४० ते २५० हून अधिक घरकुलाचे काम अद्यापही अर्धवट असल्याचे समजते. सदर अर्धवट घरकुलाचे काम स्वखर्चाने पूर्ण करण्याची लाभार्थ्यांची ऐपत नसून त्यांना कच्च्या घराचा आसरा घेत कुटुंबाचा उर्दरनिर्वाह करावा लागत आहे. तर कुठे बांबूच्या ताटव्यांमध्ये आदिवासी बांधव राहत आहे. त्रिस्तरीय सदस्य समितीच्या अहवालातून काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)