शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सायकल खरेदीसाठी मिळणार आगाऊ रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:11 IST

मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या आणि शाळेपासून पाच किमी अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू विद्यार्थिनींना सायकल दिली जाते़ यापूर्वी केवळ तीन हजार रुपये मिळत होते़ आता ५०० रुपयांची वाढ करण्यात आली असून त्यातील २००० रुपये आगाऊ म्हणून सायकल खरेदीपूर्वीच देण्याची तरतूद केल्याने गरजू विद्यार्थिनींना दिलासा मिळणार आहे़

ठळक मुद्देविद्यार्थिनींना दिलासा : मानव विकास मिशनमध्ये ५०० रुपयांची वाढ

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या आणि शाळेपासून पाच किमी अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू विद्यार्थिनींना सायकल दिली जाते़ यापूर्वी केवळ तीन हजार रुपये मिळत होते़ आता ५०० रुपयांची वाढ करण्यात आली असून त्यातील २००० रुपये आगाऊ म्हणून सायकल खरेदीपूर्वीच देण्याची तरतूद केल्याने गरजू विद्यार्थिनींना दिलासा मिळणार आहे़या योजनेंतर्गत२०१८-१९ आर्थिक वर्षापासून इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंत श्क्षिण घेत असलेल्या व शाळेपासून पाच किमी अंतराच्या आत राहणाºया लाभधारक विद्यार्थिनींना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद नव्हती़ त्यामुळे सायकल खरेदी करताना विद्यार्थिनींना अडचणींचा सामना करावा लागत होता़ त्यामुळे रकमेत वाढ करावी, अशी मागणी पालक करीत होते़ किमान पाच हजार रुपये वाढ करावी, यासाठी पालकांनी संबंधित जिल्हाधिकाºयांना निवेदनही दिले़ दरम्यान, या रकमेत वाढ करुन ३५०० रुपये इतकी करण्यात शासन मान्यता दिली आहे़मानव विकास कार्यक्रमअंतर्गत इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंत शिक्षण घेणाºया विद्यार्थिनींना ही योजना उपयुक्त ठरली आहे़ पण, अल्प रकमेमुळे सायकल विकत घेण्यास अडचणी येत होत्या़ २०१८-१९ या आर्थिक वर्षापासून निवड करण्यात येणाºया लाभधारक मुलींना सायकल खरेदीसाठी आता २००० आगाऊ रक्कम मिळणार. लाभार्थी मुलींनी सायकल खरेदीची पावती व इतर कागदपत्रे सादर केल्यानंतर उर्वरीत १५०० रक्कम देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे़अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करू नयेमानव विकास कार्यक्रमअंतर्गत इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंत शिक्षण घेणाºया शेकडो विद्यार्थिनींनी मागील सत्रात लाभ घेतला होता. शाळेपासून पाच किमी अंतरापर्यंत राहणाºया गरजू मुलींना सायकल वाटप केल्याने अडचण दूर झाली होती. मात्र, यातील बहुतांश विद्यार्थिनींनी सत्र सुरू झाल्यानंतर ही रक्कम लगेच मिळाली नव्हती. योजनेचा लाभ देण्यासाठी पात्र विद्यार्थिनींची निवड करणे, संबंधित शाळेच्या माध्यमातून यादी तयार करणे आदी कामे पूर्ण झाली नव्हती. परिणामी, सायकल खरेदीला बराच विलंब झाला होता. ३५०० रुपयांचा लाभ देण्यासाठी अटी व शर्तीसंदर्भात नियोजन विभागाने ३ डिसेंबर २०१३ ला आदेश जारी केला होता. तोच आदेश या सत्रातही कायम राहणार आहे. परंतु, मागील सत्राप्रमाणे विलंब करू नये, अशी मागणी पालक करीत आहेत.