शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
2
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
3
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
4
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
5
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
6
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
7
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
9
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
10
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना
11
Share Market Today: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २७० अंकांनी वधारला; Nifty २४,९४२ च्या पार, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
12
VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर
13
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
14
मंदिरातून झाली 'मदिरा दान'ची घोषणा! आज सकाळपासूनच देशी दारूचा ठेक्यावर उसळली गर्दी, १० ची दिली होती वेळ...
15
₹५ लाखांचं बनतील ₹५० कोटी; ५ स्टेप फॉर्म्युला जो तुम्हाला देईल फायनान्शिअल फ्रीडम आणि अनस्टॉबेल ग्रोथ
16
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
17
Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
18
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
19
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
20
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड

सायकल खरेदीसाठी मिळणार आगाऊ रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:11 IST

मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या आणि शाळेपासून पाच किमी अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू विद्यार्थिनींना सायकल दिली जाते़ यापूर्वी केवळ तीन हजार रुपये मिळत होते़ आता ५०० रुपयांची वाढ करण्यात आली असून त्यातील २००० रुपये आगाऊ म्हणून सायकल खरेदीपूर्वीच देण्याची तरतूद केल्याने गरजू विद्यार्थिनींना दिलासा मिळणार आहे़

ठळक मुद्देविद्यार्थिनींना दिलासा : मानव विकास मिशनमध्ये ५०० रुपयांची वाढ

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या आणि शाळेपासून पाच किमी अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू विद्यार्थिनींना सायकल दिली जाते़ यापूर्वी केवळ तीन हजार रुपये मिळत होते़ आता ५०० रुपयांची वाढ करण्यात आली असून त्यातील २००० रुपये आगाऊ म्हणून सायकल खरेदीपूर्वीच देण्याची तरतूद केल्याने गरजू विद्यार्थिनींना दिलासा मिळणार आहे़या योजनेंतर्गत२०१८-१९ आर्थिक वर्षापासून इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंत श्क्षिण घेत असलेल्या व शाळेपासून पाच किमी अंतराच्या आत राहणाºया लाभधारक विद्यार्थिनींना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद नव्हती़ त्यामुळे सायकल खरेदी करताना विद्यार्थिनींना अडचणींचा सामना करावा लागत होता़ त्यामुळे रकमेत वाढ करावी, अशी मागणी पालक करीत होते़ किमान पाच हजार रुपये वाढ करावी, यासाठी पालकांनी संबंधित जिल्हाधिकाºयांना निवेदनही दिले़ दरम्यान, या रकमेत वाढ करुन ३५०० रुपये इतकी करण्यात शासन मान्यता दिली आहे़मानव विकास कार्यक्रमअंतर्गत इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंत शिक्षण घेणाºया विद्यार्थिनींना ही योजना उपयुक्त ठरली आहे़ पण, अल्प रकमेमुळे सायकल विकत घेण्यास अडचणी येत होत्या़ २०१८-१९ या आर्थिक वर्षापासून निवड करण्यात येणाºया लाभधारक मुलींना सायकल खरेदीसाठी आता २००० आगाऊ रक्कम मिळणार. लाभार्थी मुलींनी सायकल खरेदीची पावती व इतर कागदपत्रे सादर केल्यानंतर उर्वरीत १५०० रक्कम देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे़अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करू नयेमानव विकास कार्यक्रमअंतर्गत इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंत शिक्षण घेणाºया शेकडो विद्यार्थिनींनी मागील सत्रात लाभ घेतला होता. शाळेपासून पाच किमी अंतरापर्यंत राहणाºया गरजू मुलींना सायकल वाटप केल्याने अडचण दूर झाली होती. मात्र, यातील बहुतांश विद्यार्थिनींनी सत्र सुरू झाल्यानंतर ही रक्कम लगेच मिळाली नव्हती. योजनेचा लाभ देण्यासाठी पात्र विद्यार्थिनींची निवड करणे, संबंधित शाळेच्या माध्यमातून यादी तयार करणे आदी कामे पूर्ण झाली नव्हती. परिणामी, सायकल खरेदीला बराच विलंब झाला होता. ३५०० रुपयांचा लाभ देण्यासाठी अटी व शर्तीसंदर्भात नियोजन विभागाने ३ डिसेंबर २०१३ ला आदेश जारी केला होता. तोच आदेश या सत्रातही कायम राहणार आहे. परंतु, मागील सत्राप्रमाणे विलंब करू नये, अशी मागणी पालक करीत आहेत.