शहरं
Join us  
Trending Stories
1
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
2
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
3
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
4
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
5
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
6
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
7
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
8
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
9
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
10
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
11
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
12
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
13
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
14
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
15
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
16
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
17
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
18
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
19
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
20
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार

पोषण आहारासोबतच शिक्षकांंनी विद्यार्जनही करावे

By admin | Updated: April 12, 2015 00:51 IST

उन्हाळ्याच्या सुट्यांतही शालेय पोषण आहार सुरू ठेवण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. ..

पालकांची अपेक्षा : दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी विशेष योजनानागभीड : उन्हाळ्याच्या सुट्यांतही शालेय पोषण आहार सुरू ठेवण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्यांत ही योजना कितपत यशस्वी होईल, अशी शंका यानिमित्ताने व्यक्त होत असली तरी योजनेबाबत सकारात्मक दृष्टीकोण ठेवून शालेय पोषण आहारासोबत याच वेळात विद्यार्जनही करावे अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे.ज्या जिल्ह्याची परिस्थिती दुष्काळसदृश आहे, अश्या सर्व जिल्ह्यात शासनाने शालेय पोषण आहार उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षकांच्या दृष्टीने अश्या दिवसांत ही योजना कटकटीची असली तरी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने निश्चितच फायद्याची आहे. तसेही उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये विद्यार्थी इकडे तिकडे भटकत असतात. अश्यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या योजनेविषयी योग्य मार्गदर्शन केल्यास निश्चितच ते शाळेत येतील आणि शाळेविषयी त्यांना ओढ कायम राहील.कदाचित १०० टक्के प्रतिसाद या योजनेला या दिवसात मिळणार नाही, हे जरी खरे असले तरी जे विद्यार्थी या निमित्ताने शाळेत येतील, त्या विद्यार्थ्यांना किमान एक ते दीड तास शिक्षकांकडून पुढच्या वर्षाच्या अभ्यासक्रमाविषयी माहिती देण्यात आली, तर त्याचा फायदा विद्यार्थ्यांनाच होणार आहे. आणि अनेक शालोपयोगी उपक्रमही घेण्यात आले तर त्या शाळेचे निश्चितच नाव होणार आहे.तसेही गेल्या काही वर्षात शाळांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांसमोर मोठा गहण प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे १५-२० वर्षाअगोदर शिक्षकांना उन्हाळ्याच्या सुट्टयांचा जो आनंद उपभोगता यायचा तो आनंद विद्यार्थी मिळविण्याच्या या नव्या उद्योगाने केव्हाचाच हिरावून घेतला आहे. विद्यार्थी मिळविण्याच्या या उद्योगांवर चर्चा करण्यासाठी शिक्षकांना उन्हाळ्याच्याही सुट्टयात शाळेत यावेच लागते. त्यामुळेच उन्हाळ्यातील शालेय पोषण आहाराने उन्हाळ्याच्या सुट्टयांचा आनंद हिरावला, असे म्हणणे उचित नाही. (तालुका प्रतिनिधी)या निमित्ताने विद्यार्थ्यांचे शारिरीक पोषण तर होईलच. पण त्याच बरोबर विद्यार्थ्यांना वर्षभर शिक्षकांचा सहवास लाभेल. शिक्षकांनी मनावर घेतले तर ते पुढच्या वर्षाची उत्तम तयारी करू शकतात. त्यांचा फायदा विद्यार्थ्यांनाच होईल.- गोकुल पानसेमुख्याध्यापक, सरस्वती ज्ञान मंदिर, नागभीड