शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

पोषण आहारासोबतच शिक्षकांंनी विद्यार्जनही करावे

By admin | Updated: April 12, 2015 00:51 IST

उन्हाळ्याच्या सुट्यांतही शालेय पोषण आहार सुरू ठेवण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. ..

पालकांची अपेक्षा : दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी विशेष योजनानागभीड : उन्हाळ्याच्या सुट्यांतही शालेय पोषण आहार सुरू ठेवण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्यांत ही योजना कितपत यशस्वी होईल, अशी शंका यानिमित्ताने व्यक्त होत असली तरी योजनेबाबत सकारात्मक दृष्टीकोण ठेवून शालेय पोषण आहारासोबत याच वेळात विद्यार्जनही करावे अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे.ज्या जिल्ह्याची परिस्थिती दुष्काळसदृश आहे, अश्या सर्व जिल्ह्यात शासनाने शालेय पोषण आहार उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षकांच्या दृष्टीने अश्या दिवसांत ही योजना कटकटीची असली तरी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने निश्चितच फायद्याची आहे. तसेही उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये विद्यार्थी इकडे तिकडे भटकत असतात. अश्यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या योजनेविषयी योग्य मार्गदर्शन केल्यास निश्चितच ते शाळेत येतील आणि शाळेविषयी त्यांना ओढ कायम राहील.कदाचित १०० टक्के प्रतिसाद या योजनेला या दिवसात मिळणार नाही, हे जरी खरे असले तरी जे विद्यार्थी या निमित्ताने शाळेत येतील, त्या विद्यार्थ्यांना किमान एक ते दीड तास शिक्षकांकडून पुढच्या वर्षाच्या अभ्यासक्रमाविषयी माहिती देण्यात आली, तर त्याचा फायदा विद्यार्थ्यांनाच होणार आहे. आणि अनेक शालोपयोगी उपक्रमही घेण्यात आले तर त्या शाळेचे निश्चितच नाव होणार आहे.तसेही गेल्या काही वर्षात शाळांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांसमोर मोठा गहण प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे १५-२० वर्षाअगोदर शिक्षकांना उन्हाळ्याच्या सुट्टयांचा जो आनंद उपभोगता यायचा तो आनंद विद्यार्थी मिळविण्याच्या या नव्या उद्योगाने केव्हाचाच हिरावून घेतला आहे. विद्यार्थी मिळविण्याच्या या उद्योगांवर चर्चा करण्यासाठी शिक्षकांना उन्हाळ्याच्याही सुट्टयात शाळेत यावेच लागते. त्यामुळेच उन्हाळ्यातील शालेय पोषण आहाराने उन्हाळ्याच्या सुट्टयांचा आनंद हिरावला, असे म्हणणे उचित नाही. (तालुका प्रतिनिधी)या निमित्ताने विद्यार्थ्यांचे शारिरीक पोषण तर होईलच. पण त्याच बरोबर विद्यार्थ्यांना वर्षभर शिक्षकांचा सहवास लाभेल. शिक्षकांनी मनावर घेतले तर ते पुढच्या वर्षाची उत्तम तयारी करू शकतात. त्यांचा फायदा विद्यार्थ्यांनाच होईल.- गोकुल पानसेमुख्याध्यापक, सरस्वती ज्ञान मंदिर, नागभीड