वयोवृद्ध राजकारणी मात्र मागील दोन निवडणुकांत कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण होते, यावर लक्ष केंद्रित करून समोरील गमिनी कावे ठरवत असल्याचे दिसत आहे. पॅनलप्रमुख आपला उमेदवार दुसऱ्या गटाकडे जाऊ न देण्याकरिता डोळ्यात तेल घालून खडा पहारा देताना दिसत आहेत. तरीही अनेक जण पळवापळवीचे राजकारण करण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. ग्रामपंचायतीचा सरपंच यापूर्वी थेट जनतेतून निवडला जायचा. आता मात्र, हा निर्णय शासनाने बदलला आहे. त्यामुळे जुनेच फोडाफोडीचे राजकारण करणे सुरू झाले आहे. ग्रामपंचायतीमध्ये आपल्या गावाचा नवा कारभारी कोण असेल, याकडे प्रत्येकाचे लक्ष लागले आहे. सर्व पॅनलप्रमुख नवनिर्वाचित सदस्यांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आपले सदस्य फुटणार नाहीत, याची खबरदारी घेत आहेत.
गावकारभारी कोण, याकडे सर्वांच्या नजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 4:29 AM