शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

आयुष्याच्या सायंकाळी हवा आधार

By admin | Updated: September 30, 2014 23:33 IST

आयुष्याची संध्याकाळ सुख-समाधानाने जावी, अशी प्र्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठीच प्रत्येकजण सारखा धडपडत असतो. मान-सन्मान, प्र्रतिष्ठा आणि धन या सर्व गोष्टींची पुंजी जमा करताना अख्खे आयुष्य घालवतोे.

साईनाथ कुचनकार - चंद्रपूरआयुष्याची संध्याकाळ सुख-समाधानाने जावी, अशी प्र्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठीच प्रत्येकजण सारखा धडपडत असतो. मान-सन्मान, प्र्रतिष्ठा आणि धन या सर्व गोष्टींची पुंजी जमा करताना अख्खे आयुष्य घालवतोे. मात्र आयुष्याच्या संध्याकाळी काही वृद्धांच्या नशीबी हाल, अपेष्टा तसेच अपमानित जीवन जगण्याची वेळ येते. तेव्हा मात्र जीवनाचा प्र्रत्येक क्षण आठवतो. आयुष्यात जे कमावले त्याची उतारवयात काहीच किमत नसल्याचे त्यांना जाणवते. प्रेमाचे दोन शब्द बोलण्यासाठीही कुणीच नसते. वृद्धापकाळात आधार मिळावा यासाठी प्रत्येकांना आशा आहे. मात्र त्यांच्या आशेवर अनेकवेळा पाणी फेरल्या जाते. आता मात्र येथील ज्येष्ठ नागरिक संघाने आपल्या समवयस्कांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरु केला. एवढेच नाही तर, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यातही सहभाग घेऊन स्वत:चा ‘आधार’ शोधण्यासाठी धडपड सुरु केली आहे.ज्येष्ठांना समाधानाने दोन शब्द बोलता यावे, त्यांचा विळंगुळा व्हावा यासाठी येथील ज्येष्ठ नागरिक संघाने काम सुरु केले आहे. या संघाचे अध्यक्ष रामदास रायपुरे हे आहे. विशेष म्हणजे, राज्यात या संघाचे काम वाखान्याजोगे असून शहरात तब्बल ५ हजारावर सदस्यांची नोंदणी झाली आहे. ज्येष्ठांच्या समस्यांवर येथे विचारमंथन केले जाते. अनेकवेळा मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात येत आहे. एवढेच नाही तर, येथील ज्येष्ठ नागरिक संघाने सामाजिक, सांस्कृतिक कार्यातही आपले योगदान देत आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि श्रमशक्तीचा वापर भावी पिढीला आजही प्रेरणादायी ठरत आहे. वृद्धांच्या अनेक समस्या आहे मात्र त्या सोडविण्यासाठी पाहिजे तसे लक्ष देण्यासाठी शासन, समाज तसेच कुटुंबाकडेही वेळ नसल्याचे सध्याचे चित्र आहे. भारतातील ज्येष्ठ नागरिकांपैकी ६० टक्के ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. यातील बहुतांश ज्येष्ठांना सामाजिक व आरोग्य विषयक सुरक्षितता नाही. ४० टक्के ज्येष्ठांना घरात मानसिक त्रास दिला जातो. तर, १७ टक्के ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात. परिणामी काहींना वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागतो. शासनातर्फे विविध योजनेंतर्गत मदत दिली जात असली तरी ती त्यांना पोहचतेच असे नाही. त्यामुळे ठोस धोरण आखून त्यांना आधार देणे गरजेचे आहे.