शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे 
3
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
4
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
5
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
6
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
7
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
8
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
9
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
10
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
11
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
12
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
13
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
14
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
15
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
16
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
17
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
18
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
19
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
20
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

शेतीचा औद्योगिक क्षेत्र म्हणून विकास करावा

By admin | Updated: August 30, 2015 00:47 IST

कृषी क्षेत्रात सहकार शेतीचा पाया डॉ. विठ्ठलराव विखे यांनी रचला. शेतकरी देशाचा आधारस्तंभ करण्याची त्यांची तळमळ होती.

बल्लारपुरात शेतकरी दिन : हरीश गेडाम यांचे मार्गदर्शनबल्लारपूर : कृषी क्षेत्रात सहकार शेतीचा पाया डॉ. विठ्ठलराव विखे यांनी रचला. शेतकरी देशाचा आधारस्तंभ करण्याची त्यांची तळमळ होती. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने शेतीचा औद्योगिक क्षेत्र म्हणून विकास करण्याची गरज आहे, असे मार्गदर्शन बल्लारपूर पंचायत समितीचे माजी सभापती अ‍ॅड. हरीश गेडाम यांनी शनिवारी शेतकरी दिन कार्यक्रमात केले.बल्लारपूर तालुका कृषी विभागाच्यावतीने डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून स्थानिक पंचायत समिती सभागृहात शेतकरी दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शक म्हणून अ‍ॅड. गेडाम बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. हरीश गेडाम, सहायक गट विकास अधिकारी संध्या दिकोंडवार, तालुका कृषी अधिकारी प्रशांत कसराळे, नायब तहसीलदार पी.डी. वंजारी, कृषी मंडळ अधिकारी एम.एस. वरभे, कृषी विस्तार अधिकारी सुधाकर खांडरे, कृषी सहायक प्रशांत गजभिये यांची उपस्थिती होती.यावेळी मार्गदर्शन करताना अनेकश्वर मेश्राम म्हणाले, देशाच्या आर्थिक व्यवस्थेला हातभार लावण्यासाठी कृषी क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यात सहकार क्षेत्राची महत्त्वाची भूमिका ठरते. डॉ. विठ्ठलराव विखे पाटलांनी लावलेल्या वटवृक्षाचा विस्तार करण्यासाठी शेतकऱ्यांनी झटले पाहिजे. शेतकऱ्यांना समृद्ध व सुखी करण्यासाठी त्यांची प्रेरणा घेण्याची गरज आहे. शेती क्षेत्रात नियोजन करून उत्पादन घेण्याची मानसिकता शेतकऱ्यांनी बाळगावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. संचालन प्रशांत गजभिये यांनी तर आभार सुधाकर खांडरे यांनी मानले. याप्रसंगी तालुका कृषी विभागाचे ए.आर. फटिंग, एम.बी. दानव, सी.एम. निब्रड, अश्विनी कुळकर्णी, मनीषा भांडारकर, बी.एस. धवने, एस.जी. बावणे यांच्यासह शेतकरी बांधवाची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)