शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
2
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
3
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
4
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
5
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
6
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
7
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
8
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
11
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
12
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
13
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
14
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
15
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
16
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
17
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
18
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
19
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
20
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभाग म्हणतो, केवळ पाच टक्के पेरण्यांना मोड

By admin | Updated: July 14, 2014 23:52 IST

यंदा निसर्गाच्या प्रकोपाचा फटका शेतकऱ्यांना बसला. जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटला असला तरी अद्याप जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली नाही. परिणामी सुरूवातीच्या काळात झालेल्या पाच टक्के

संतोष कुंंडकर - चंद्रपूरयंदा निसर्गाच्या प्रकोपाचा फटका शेतकऱ्यांना बसला. जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटला असला तरी अद्याप जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली नाही. परिणामी सुरूवातीच्या काळात झालेल्या पाच टक्के पेरण्या मोडल्या, असा दावा कृषी विभागाने केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाळी वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून जिल्ह्यात पेरणीच्या कामाला वेग आला आहे.आतापर्यंत चार लाख ६० हजार हेक्टरपैकी एक लाख ३५ हजार ४८५ हेक्टरवरील पेरण्या आटोपल्या असून त्याची सरासरी टक्केवारी ३२ आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सिंदेवाही, सावली, नागभीड, ब्रह्मपुरी, चिमूर, गोंडपिपरी, पोंभुर्णा या भागात धानाची लागवड केली जाते. या तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी जून महिन्यात झालेल्या पहिल्याच हलक्या स्वरूपाच्या पावसानंतर धानाचे पऱ्हे टाकले. मात्र पावसाअभावी व तिव्र उन्हामुळे हे पऱ्हे करपून गेलेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. तेव्हापासून पावासाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात धानासह सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी या पिकांचीही मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येते. जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, बल्लारपूर, राजुरा, कोरपना जीवती या तालुक्यांमध्ये कापूस व सोयाबिनची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. या भागातील शेतकऱ्यांनीही सुरूवातीच्या काळात पेरणी केली. मात्र पावसाअभावी पेरण्या मोडून गेल्या. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. यंदा पावसाचे आगमन बरेच लांबणीवर पडले असले तरी जुलैच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांना पेरण्या करता येऊ शकतात. त्यामुळे वेळापत्रक कोलमडणार नाही, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.