शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
2
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
3
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
4
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
5
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
6
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
7
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
8
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
9
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
10
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले
11
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
12
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
13
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
14
प्रबोधिनी एकादशी २०२५: देवउठनी एकादशीला विष्णू खरोखरच ४ महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात का?
15
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
16
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
17
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
18
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
19
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
20
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट

खरिपासाठी कृषी विभागही गुंतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 22:20 IST

हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या १७ जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. खरीप हंगामाच्या कामाला वेग आला असून जिल्ह्यातील शेतकरी पूर्वमशागतीच्या कामात गुंतलेला आहे. शेतकऱ्यांच्या श्रमाचे फळ भरघोस उत्पादनाच्या स्वरूपात मिळावे, यासाठी कृषी विभागही कामाला लागला आहे.

ठळक मुद्देउत्पादन वाढीसाठी प्रयत्न : शेतकऱ्यांना दिल्या जात आहेत विविध सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या १७ जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. खरीप हंगामाच्या कामाला वेग आला असून जिल्ह्यातील शेतकरी पूर्वमशागतीच्या कामात गुंतलेला आहे. शेतकऱ्यांच्या श्रमाचे फळ भरघोस उत्पादनाच्या स्वरूपात मिळावे, यासाठी कृषी विभागही कामाला लागला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत विविध सूचना शेतकºयांना सातत्याने करण्यात येत आहेत. या सूचना तालुका कृषी कार्यालयामार्फत शेतकºयांपर्यंत पोहचविल्या जात आहेत.मागील वर्षीचे सुखदु:ख विसरून आता शेतकरी पुन्हा खरीप हंगामाच्या कामाला लागला आहे. हंगामपूर्व मशागतीची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. मात्र हंगामासाठी शेतकºयांना पैसा हवा आहे. कर्जाची जुळवाजुळव शेतकºयांनी सुरू केली आहे. यासोबत बियाण्यांसाठीही शेतकरी धडपड करताना दिसत आहे. पाऊस दरवर्षीच दगा देतो, हा अनुभव पाठिशी असल्यामुळे पेरणी केव्हा करावी, या विवंचनेत शेतकरी दिसत आहेत. त्यामुळे त्यांना सल्ला देण्यासाठी कृषी विभाग तत्पर झाला आहे. दर्जेदार बियाणे, जमिनीची योग्य मशागत, मान्सूनच्या आगमनानंतरच पेरणीचे नियोजन, बीज प्रक्रिया व योग्य खत व्यवस्थापन, कीड व रोगांपासून पिकांचे संरक्षण याच पंचसूत्रीमुळे शेतकºयांना खरीप हंगामात भरघोस उत्पादन घेता येऊ शकते, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी निसंकोचपणे कृषी विभागाच्या अधिकाºयांचा वेळोवेळी सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केलेले आहे.अशा आहेत सूचनाकृषी विभागामार्फत दिलेल्या आरोग्य पत्रिकेतील सूचनांप्रमाणे खत व्यवस्थापन करावे व जमिनीची सुपीकता वाढवावी, बीज, खते तसेच कीटकनाशके व बुरशीनाशके खरेदी करताना दक्षता घ्यावी. याबाबत कृषी विभागाच्या अधिकाºयांचा सल्ला घ्यावा. बीजप्रक्रियांची प्रात्यक्षिके बघून पीक पेरणीच्या वेळेस बुरशीनाशक जिवाणू खते यांची बीजप्रक्रिया करावी. कपाशीवरील शेंद्री बोंड आळीचा नायनाट करण्यासाठी जमिनीची योग्य पूर्वमशागत तसेच निंबोळी अर्काचा वापर करावा व एकात्मिक कीड व्यवस्थापन करावे. यात कामगंध सापळे, ट्रायकोकार्ड यांचाही वापर करावा. मुख्य पिकात आंतरपीक घ्यावे. कीड व रोग व्यवस्थापनासाठी शक्य असेल तोपर्यंत सेंद्रिय तसेच विषमुक्त निविष्ठांचा वापर करावा. रासायनिक निविष्ठांची हाताळणी व फवारणी करताना काळजी घ्यावी. अशा विविध शेतीपयोगी सूचना कृषी विभागामार्फत देण्यात येत आहे.असे केले जात आहे मार्गदर्शनकृषी विभागामार्फत यावर्षी २५ मे ते ८ जून या कालावधीत उन्नत शेती समृद्ध शेतकरी पंधरवाडा साजरा करण्यात येत असून याअंतर्गत विविध मार्गदर्शनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहे. यामध्ये शेतीशाळा, मार्गदर्शन कार्यशाळा, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके यावर भर दिला जात आहे. यामुळे शेतकºयाला योग्य मार्गदर्शन मिळत आहे.कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना वारंवार सूचना केल्या जात आहे. शेतकºयांनी या सूचनांचे पालन करुन यावर्षीच्या हंगामाचे नियोजन करावे.-डॉ.उदय पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती