शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

वनविकास महामंडळाचा अनागोेंदी कारभार

By admin | Updated: January 14, 2017 00:43 IST

मध्य चांदा वनविकास महामंडळ विभाग बल्लारशाह अंतर्गत झरण वनपरिक्षेत्रात मागील सहा महिन्यांपासून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरु असून...

अधिकाऱ्याचा मुख्यालयाला खो : स्थानिक मजूर कामापासून वंचितकोठारी : मध्य चांदा वनविकास महामंडळ विभाग बल्लारशाह अंतर्गत झरण वनपरिक्षेत्रात मागील सहा महिन्यांपासून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरु असून विडींगसह अनेक कामात ठेकेदारांशी हात मिळवणी करुन गैरप्रकार होत असल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे.झरण वनपरिक्षेत्र आधीच अनेक गैरप्रकारात बदनाम असून या क्षेत्रात कार्यरत तत्कालीन वनाधिकारी अजय पवार यांनी सहा महिन्याच्या सेवेत अपप्रकार करुन अनेक मजुरांना मजुरी दिली नाही. त्याची दखल लोकमतने घेत वरिष्ठांना कारवाई करण्यास भाग पाडले. त्याच त्यांची तडकाफडकी बदली देचली येथे करण्यात आली. त्या ठिकाणी सुनिल गोरे यांनी पदभार स्वीकारला. मागील कामाचा आढावा घेत सुरळीत कामे करुन कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करुन नियमानुसार जंगली कामे करुन झरण क्षेत्राची विस्कटलेली घडी बसविणे गरजेचे होते. मात्र त्यांनी अजय पवार यांच्या पावलावर पाऊल टाकीत विविध कामात गैरप्रकार करणे सुरु केले. त्यांनी विडींगच्या कामात मोठ्या प्रमाणात अनागोदी कारभार करीत विडींगच्या कामासह अनेक कामे मर्जीतील ठेकेदाराद्वारे अंदाजपत्रकानुसार व नियमानुसार केलेले नाही. या कामात स्थानिक मजुरांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप होत आहे. (वार्ताहर) ठेकेदारांना नियमबाह्य देतात कामेझरण वनक्षेत्रात भरपूर प्रमाणात हंगामी कामे असतात. त्यासाठी क्षेत्रालगत गावातील मजुरांना कामे देणे आवश्यक असताना स्थानिक मजुरांना अंदाजपत्रकाप्रमाणे कामे प्रत्यक्ष मजुरांकडून करणे आवश्यक असतात. मात्र तसे न करता ठेकेदारांकडे कामे सोपवून त्यांच्याद्वारे कामे करवून स्वत:चे आर्थिक हित जोपासले जात आहेत. स्थानिक मजुरांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामाबाबत मागणी करुन कामे उपलब्ध देण्याची मागणी केली. यात वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनाही निवेदन देण्यात आले होते व स्थानिकांना रोजगार अल्पशाप्रमाणात मिळत आहे. बांबू, बांबू बंडल, चपाटी बांबू यासह इमारती लाकडे, बिट, फाटे निष्कासनाची कामे मोठ्या प्रमाणात सुरु असून त्याची वाहतूक करण्याची दहा किमीच्या आतील कामे स्थानिकांना देण्याचा नियम असताना तसे करण्यात आले नाही. सरसकट सर्व कामे निविदा मागवून देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे स्थानिक वाहतूकदार कामापासून वंचित झाले.वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची मुख्यालयाला दांडीमहामंडळाचे विविध कामे जंगलात असतात. क्षेत्रीय कामे संबंधित वन कर्मचाऱ्यांकडून मजुरामार्फत करायची असतात. त्यासाठी वनाधिकारी मुख्यालयाला मुक्कामी राहणे आवश्यक असताना व त्यांच्या निवासाची व्यवस्था असतानाही वनाधिकारी बल्लारशाहून रोज ये-जा करीत असतात. त्यामुळे त्याचे कर्मचारीही मुख्यालयी राहात नाही. त्याचा गंभीर परिणाम महामंडळाच्या कामावर व जंगल व प्राणी संरक्षणावर होत आहे.चौकशीची मागणीसुनील गोरे यांच्या कार्यकाळात झालेल्या विंडीगच्या कामाची तसेच इतर कामाची चौकशी करण्यात यावी. तसेच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह वनकर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याची गंभीर बाब असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता धिरज बांबोळे यांनी केली आहे.