शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

तिघांचा बळी घेणाऱ्या वाघिणीपाठोपाठ वाघही जेरबंद; नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 10:55 IST

ब्रह्मपुरी वनविभागातील घटना

चंद्रपूर : ब्रह्मपुरी वनविभागात तीन जणांचा बळी घेणाऱ्या वाघिणीपाठोपाठ तिच्या साथीदार नर वाघालाही सोमवारी (दि. ६) सकाळी ८ वाजेच्या सुमारास वनविभागाच्या पथकाने जेरबंद केले. गेल्या आठवड्यात तीन घटनांमध्ये वाघाच्या हल्ल्यात तिघांचा बळी गेला. यामुळे नागरिकांत तीव्र संताप होता.

ब्रह्मपुरी वनविभागामध्ये २९ ऑक्टोबर रोजी वाघाने पळसगाव वन परिक्षेत्रातील बेलारा येथे एका मेंढपाळाचा बळी घेतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा खडसंगी वन परिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. १ नोव्हेंबर रोजी हळदा गावातील सैत्राबाई नामदेव कामडी (७०) या महिलेला ब्रह्मपुरी वनविभागाच्या आवळगाव उपक्षेत्रातील हळदा बीटमधील कंपार्टमेंट क्रमांक ११६८ मध्ये शेतात भात कापणी करत असताना वाघाने ठार केले.

वनविभागाने कॅमेरा ट्रॅप बसवल्यानंतर हळदा घटनेत वाघाचे दोन मोठे बछडे सामील असल्याची माहिती मिळाली. तेव्हापासून ब्रह्मपुरी वनविभागाचे वनकर्मचारी कुटुंबापासून दूर गेलेल्या या दोन मोठ्या बछड्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. त्यामुळे दोन ते अडीच वर्षे वयाच्या वाघिणीच्या स्थळाची माहिती मिळताच तिला सायंकाळी ४ वाजता जेरबंद करण्यात आले. सोमवारी सकाळी ८:३० वाजता पुन्हा त्याच परिसरात तिच्या दोन ते अडीच वर्षे वयाच्या साथीदार नर वाघाला पकडण्यातही यश आले. दोन वाघांना जेरबंद केल्याने वनविभाग आणि नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

ही कारवाई वन परिक्षेत्र अधिकारी (प्रा.) शेंडे, पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) डॉ. खोब्रागडे, पोलिस नाईक (शूटर), जीवशास्त्रज्ञ राकेश आहुजा, आरआरटी सदस्य दिपेश डी. टेंभुर्णे, योगेश डी. लाकडे, गुरु नानक व्ही. ढोरे, वसीम शेख, विकास ताजने, प्रफुल्ल वाटगुरे, ए. डी. कोरपे, ए. एम. दांडेकर, नूर अली सय्यद, जय सहारे आदींच्या पथकाने केले.

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभागchandrapur-acचंद्रपूर