शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उत्तीर्ण होऊनही ९९.८५ टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीतून बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:33 IST

गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना शिक्षणात आर्थिक हातभार लागावा यासाठी राज्य शासनाकडून सर्व व्यवस्थापनातील इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते.

ठळक मुद्देसर्व व्यवस्थापनातील शाळा : इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचा हिरमोड

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना शिक्षणात आर्थिक हातभार लागावा यासाठी राज्य शासनाकडून सर्व व्यवस्थापनातील इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. २०१६-१७ या वर्षात १३ हजार ६८३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यातील १३ हजार ५१२ विद्यार्थी उत्तीर्णही झाले. मात्र, केवळ २० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्याने ९९़.८५ टक्के विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक प्रोत्साहन देण्याचे काम शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून शासनाकडून सुरू आहे. या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांला इयत्तेनुसार मासिक १०० ते २०० रूपये शिष्यवृत्ती दिली जाते. यापूर्वी ही परीक्षा इयत्ता चवथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जात होती. मात्र, नव्या धोरणानुसार ही शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व आठवीसाठी लागू केली आहे. २०१६-१७ या वर्षात सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमिक गटाच्या पाचवीमधील ७ हजार २८८ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा दिली. यातील ७ हजार २३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परंतु, यातील केवळ २० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. तर इयत्ता आठवीच्या ६ हजार ३९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातील ६ हजार २८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मात्र यातील एकाही विद्यार्थ्याची निवड झाली नाही.केवळ गोंडपिपरीच्या विद्यार्थ्यांची निवडमाध्यमिक गटातील ७ हजार २८८ विद्यार्थ्यांपैकी ७ हजार २३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ३ हजार ८६३ मुले तर ३ हजार ३६७ मुलींचा समावेश आहे. या निकालाची टक्केवारी ९९.२० असली तरी यातील केवळ २० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, शिष्यवृत्तीसाठी निवड झालेले २० विद्यार्थी हे केवळ गोंडपिपरी तालुक्यातीलच आहेत.हायस्कूल गटातील विद्यार्थी मेरीटमध्ये माघारलेआठव्या वर्गातील ६ हजार ३९५ विद्यार्थ्यांपैकी ६ हजार २८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या निकालाची टक्केवारी ९८.२३ एवढी आहे. मात्र, यातील एकाही विद्यार्थ्याची शिष्यवृत्तीसाठी निवड झालेली नाही. गुणवत्ता यादीनुसार शिष्यवृत्तीसाठी निवड होत असल्याने उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.प्रत्येक जिल्ह्याला शिष्यवृत्तीसाठी निवड विद्यार्थ्यांचा कोटा शासन ठरवून देत असतो. यात ग्रामीण व शहरी भागाचा समावेश असतो. शंभर टक्के निकाल लागला तरी गुणवत्ता यादीनुसार शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याची निवड होते. त्यामुळे शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे.- राम गारकर,शिक्षणाधिकारी (प्राथ.) चंद्रपूर.