शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तीर्ण होऊनही ९९.८५ टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीतून बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:33 IST

गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना शिक्षणात आर्थिक हातभार लागावा यासाठी राज्य शासनाकडून सर्व व्यवस्थापनातील इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते.

ठळक मुद्देसर्व व्यवस्थापनातील शाळा : इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचा हिरमोड

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना शिक्षणात आर्थिक हातभार लागावा यासाठी राज्य शासनाकडून सर्व व्यवस्थापनातील इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. २०१६-१७ या वर्षात १३ हजार ६८३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यातील १३ हजार ५१२ विद्यार्थी उत्तीर्णही झाले. मात्र, केवळ २० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्याने ९९़.८५ टक्के विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक प्रोत्साहन देण्याचे काम शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून शासनाकडून सुरू आहे. या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांला इयत्तेनुसार मासिक १०० ते २०० रूपये शिष्यवृत्ती दिली जाते. यापूर्वी ही परीक्षा इयत्ता चवथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जात होती. मात्र, नव्या धोरणानुसार ही शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व आठवीसाठी लागू केली आहे. २०१६-१७ या वर्षात सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमिक गटाच्या पाचवीमधील ७ हजार २८८ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा दिली. यातील ७ हजार २३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परंतु, यातील केवळ २० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. तर इयत्ता आठवीच्या ६ हजार ३९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातील ६ हजार २८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मात्र यातील एकाही विद्यार्थ्याची निवड झाली नाही.केवळ गोंडपिपरीच्या विद्यार्थ्यांची निवडमाध्यमिक गटातील ७ हजार २८८ विद्यार्थ्यांपैकी ७ हजार २३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ३ हजार ८६३ मुले तर ३ हजार ३६७ मुलींचा समावेश आहे. या निकालाची टक्केवारी ९९.२० असली तरी यातील केवळ २० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, शिष्यवृत्तीसाठी निवड झालेले २० विद्यार्थी हे केवळ गोंडपिपरी तालुक्यातीलच आहेत.हायस्कूल गटातील विद्यार्थी मेरीटमध्ये माघारलेआठव्या वर्गातील ६ हजार ३९५ विद्यार्थ्यांपैकी ६ हजार २८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या निकालाची टक्केवारी ९८.२३ एवढी आहे. मात्र, यातील एकाही विद्यार्थ्याची शिष्यवृत्तीसाठी निवड झालेली नाही. गुणवत्ता यादीनुसार शिष्यवृत्तीसाठी निवड होत असल्याने उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.प्रत्येक जिल्ह्याला शिष्यवृत्तीसाठी निवड विद्यार्थ्यांचा कोटा शासन ठरवून देत असतो. यात ग्रामीण व शहरी भागाचा समावेश असतो. शंभर टक्के निकाल लागला तरी गुणवत्ता यादीनुसार शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याची निवड होते. त्यामुळे शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे.- राम गारकर,शिक्षणाधिकारी (प्राथ.) चंद्रपूर.