शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

-तर मुस्लिमांतर्फे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करणार

By admin | Updated: October 26, 2016 01:20 IST

२०१४ मध्ये आघाडी सरकारने संवैधानिक अधिकाराअंतर्गत मुस्लम समाजाला दिलेल्या पाच टक्के आरक्षणाला युती सरकारने पुन: बहाल करण्याचा निर्णय घ्यावा.

नवाब मलिक : राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समितीचे आयोजनचंद्रपूर : २०१४ मध्ये आघाडी सरकारने संवैधानिक अधिकाराअंतर्गत मुस्लम समाजाला दिलेल्या पाच टक्के आरक्षणाला युती सरकारने पुन: बहाल करण्याचा निर्णय घ्यावा. त्यापोटी पाच लाख मुस्लीम समाज बांधवासोबत मुख्यमंत्र्यांचा हार्दिक सत्कार करुन स्वागत केल्या जाईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले.स्थानिक नेहरु विद्यालय प्रांगणात राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समिती (महाराष्ट्र) घेतलेल्या विदर्भस्तरीय मुस्लिम आरक्षण परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी मलिक बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष हाजी सय्यद अनवर अली यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समिती हा लढा शेवटपर्यंत लढत राहील, असा निर्धार व्यक्त केला.विशेष अतिथी आ.बच्चू कडू यांनी मुस्लिम समाजाला शिक्षण घेवून संवैधानिक अधिकाराच्या लढ्यात व स्वच्छ राजकारणात आपले योगदान देण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय मुस्लिम बहुजन परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. जावेद शेख यांनी मुस्लिम समाजाची वस्तुस्थिती मांडताना आणि १९४७ ते २०१६ पर्यंत समाजाची परिस्थिती किती हलाखीची झाली. त्यात राष्ट्रीय भूमिका कशी परिणामकारक होती, याचे विस्तृत विवेचन केले. नाशिकचे मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष अजिजखान पठाण यांनी मागील ६० वर्षांमध्ये धर्मनिरपेक्ष पक्षांनी मुस्लिम समाजाचा वापर केवळ मतांकरिता केल्याचा आरोप केला. धर्माच्या नावावर आरक्षण देता येत नाही म्हणणाऱ्या नेत्यांचा खरपूस समाचार घेत आमचा धर्म इस्लाम आहे आणि इस्लामला माणणारा समाज मुस्लिम आहे, हे स्पष्ट करीत मुस्लिमांचा धर्म इस्मा आहे. त्याची न्यायालयीन लढाई लढत असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आ. नाना शमकुळे व आ. बाळू धानोरकर यांनी संपूर्ण समाजांना त्यांचा संवैधानिक अधिकार मिळण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. या परिषदेमध्ये आरक्षणसंबंधी ठराव घेऊन मुख्यमंत्री आणि उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निवेदन पाठविण्यात आले. परिषदेत समितीचे महासचिव फिरोजखान पठाण यांनी आपले मत व्यक्त केले. प्रास्ताविक अ‍ॅड. रफिक शेख यांनी केले. संचालन नईमखान आणि आभार मुख्य संघटक मुश्ताक कुरेशी यांनी मानले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता केंद्रीय उपाध्यक्ष जाकीर शेख, सचिव शाहिद कुरेशी, जिल्हा प्रभारी अश्फाक शेख, केंद्रीय सदस्य अकबर शेख, मजहर अली, शरीफ शेख, मेहमूद शेख, जैनुल आबेदिन, गयास सरफराज मेमन, शहर अध्यक्ष समीज शेख, यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)