शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

पाच तपानंतर बदलतेय राष्ट्रसंतांची ‘तपोभूमी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:32 IST

‘पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना...’ अशा क्रांतिकारी भजनाने जनमाणसात देशप्रेम जागृत करीत मानवतेचा संदेश साºया देशात पोहचविणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी म्हणून चिमूर तालुक्याला ओळखले जाते.

ठळक मुद्दे३४ कोटींची तरतूद : पर्यटन स्थळाच्या दर्जातून विकास

राजकुमार चुनारकर ।आॅनलाईन लोकमतचिमूर : ‘पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना...’ अशा क्रांतिकारी भजनाने जनमाणसात देशप्रेम जागृत करीत मानवतेचा संदेश साºया देशात पोहचविणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी म्हणून चिमूर तालुक्याला ओळखले जाते. चिमूरपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या गोंदेडा येथे राष्ट्रसंतांनी ध्यान साधना केली. त्यामुळे गोंदेडा या भूमीला संपूर्ण देशात ‘तपोभूमी’ म्हणून ओळखले जाते. तपोभूमीला विकासासाठी ‘पाच तपाची’ प्रतीक्षा करावी लागली. मागील तीन वर्षांपासून सुरू असलेली विकासकामे काही प्रमाणात पूर्ण होत असल्याने तपोभूमीचे रुप पालटत आहे.अमरावती जिल्ह्यातील ‘यावली’ येथे राष्ट्रसंतांचा जन्म झाला असला तरी त्यांची कर्मभूमी चिमूर तालुका आहे. राष्ट्रसंतांच्या प्रेरणेमुळेच चिमुरात १६ आॅगस्ट १९४२ ला इंग्रजाविरूद्ध क्रांती झाली. चिमूर तालुक्यातील गोंदेडा गुंफा येथे राष्ट्रसंतांनी ध्यान साधना केली. यामुळे या भूमीला तपोभूमी म्हणून पुर्ण राज्यात नावलौकिक प्राप्त झाले आहे. या भूमीत प्रत्येक वर्षी पाच दिवस यात्रा भरते. या निमित्ताने हजारो गुरुदेवभक्त या ठिकाणी पावन भूमीच्या दर्शनासाठी येऊन नतमस्तक होतात.राष्ट्रसंतांच्या तपोभूमीचा विकास व्हावा म्हणून अनेक वर्षांपासून तालुक्यातील राजकीय पुढारी व स्थानिक लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत होते. तपोभूमीच्या विकासाकरिता वन जमिनीचा मोठा अडसर होता. त्यामुळे ही भूमी विकासापासून दूर राहत गेली. मात्र क्षेत्रातील तत्कालिन आमदारांनीही या भूमीच्या विकासाकरिता हातभार लावून योगदान देण्याचा प्रयत्न चालविला.तपोभूमीचा विकास व्हावा म्हणून प्रथमच आमदार कीर्तीकुमार भांगडिया व विधानपरिषद सदस्य मितेश भांगडिया यांनी सरकारकडे साकडे घातले. तपोभूमीला पर्यटन क्षेत्र घोषित करून विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात तपोभूमीच्या विकासासाठी ३४ कोटी रुपयांची तरतूद केली. या निधीतून तपोभूमीत आजघडीला मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जात आहेत. तपोभूमीच्या विकासाकरिता ३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यापैकी १५ कोटींची विकासकामे प्रगतिपथावर आहेत. त्यामध्ये सभागृह, ध्यान केंद्र, अंतर्गत रस्ते, भवन निवास, विद्युत यासह इतर कामे केली जात आहेत. सभागृह व ध्यान केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. तर २० एकर जागेमध्ये स्व.उत्तमराव पाटील वनउद्यानाचे कामही प्रगतिपथावर आहे.