शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
5
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
6
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
8
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
9
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
10
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
11
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
12
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
13
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
14
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
15
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
16
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
17
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

पाच तपानंतर बदलतेय राष्ट्रसंतांची ‘तपोभूमी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:32 IST

‘पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना...’ अशा क्रांतिकारी भजनाने जनमाणसात देशप्रेम जागृत करीत मानवतेचा संदेश साºया देशात पोहचविणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी म्हणून चिमूर तालुक्याला ओळखले जाते.

ठळक मुद्दे३४ कोटींची तरतूद : पर्यटन स्थळाच्या दर्जातून विकास

राजकुमार चुनारकर ।आॅनलाईन लोकमतचिमूर : ‘पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना...’ अशा क्रांतिकारी भजनाने जनमाणसात देशप्रेम जागृत करीत मानवतेचा संदेश साºया देशात पोहचविणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी म्हणून चिमूर तालुक्याला ओळखले जाते. चिमूरपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या गोंदेडा येथे राष्ट्रसंतांनी ध्यान साधना केली. त्यामुळे गोंदेडा या भूमीला संपूर्ण देशात ‘तपोभूमी’ म्हणून ओळखले जाते. तपोभूमीला विकासासाठी ‘पाच तपाची’ प्रतीक्षा करावी लागली. मागील तीन वर्षांपासून सुरू असलेली विकासकामे काही प्रमाणात पूर्ण होत असल्याने तपोभूमीचे रुप पालटत आहे.अमरावती जिल्ह्यातील ‘यावली’ येथे राष्ट्रसंतांचा जन्म झाला असला तरी त्यांची कर्मभूमी चिमूर तालुका आहे. राष्ट्रसंतांच्या प्रेरणेमुळेच चिमुरात १६ आॅगस्ट १९४२ ला इंग्रजाविरूद्ध क्रांती झाली. चिमूर तालुक्यातील गोंदेडा गुंफा येथे राष्ट्रसंतांनी ध्यान साधना केली. यामुळे या भूमीला तपोभूमी म्हणून पुर्ण राज्यात नावलौकिक प्राप्त झाले आहे. या भूमीत प्रत्येक वर्षी पाच दिवस यात्रा भरते. या निमित्ताने हजारो गुरुदेवभक्त या ठिकाणी पावन भूमीच्या दर्शनासाठी येऊन नतमस्तक होतात.राष्ट्रसंतांच्या तपोभूमीचा विकास व्हावा म्हणून अनेक वर्षांपासून तालुक्यातील राजकीय पुढारी व स्थानिक लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत होते. तपोभूमीच्या विकासाकरिता वन जमिनीचा मोठा अडसर होता. त्यामुळे ही भूमी विकासापासून दूर राहत गेली. मात्र क्षेत्रातील तत्कालिन आमदारांनीही या भूमीच्या विकासाकरिता हातभार लावून योगदान देण्याचा प्रयत्न चालविला.तपोभूमीचा विकास व्हावा म्हणून प्रथमच आमदार कीर्तीकुमार भांगडिया व विधानपरिषद सदस्य मितेश भांगडिया यांनी सरकारकडे साकडे घातले. तपोभूमीला पर्यटन क्षेत्र घोषित करून विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात तपोभूमीच्या विकासासाठी ३४ कोटी रुपयांची तरतूद केली. या निधीतून तपोभूमीत आजघडीला मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जात आहेत. तपोभूमीच्या विकासाकरिता ३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यापैकी १५ कोटींची विकासकामे प्रगतिपथावर आहेत. त्यामध्ये सभागृह, ध्यान केंद्र, अंतर्गत रस्ते, भवन निवास, विद्युत यासह इतर कामे केली जात आहेत. सभागृह व ध्यान केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. तर २० एकर जागेमध्ये स्व.उत्तमराव पाटील वनउद्यानाचे कामही प्रगतिपथावर आहे.