शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाच तपानंतर बदलतेय राष्ट्रसंतांची ‘तपोभूमी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:32 IST

‘पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना...’ अशा क्रांतिकारी भजनाने जनमाणसात देशप्रेम जागृत करीत मानवतेचा संदेश साºया देशात पोहचविणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी म्हणून चिमूर तालुक्याला ओळखले जाते.

ठळक मुद्दे३४ कोटींची तरतूद : पर्यटन स्थळाच्या दर्जातून विकास

राजकुमार चुनारकर ।आॅनलाईन लोकमतचिमूर : ‘पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना...’ अशा क्रांतिकारी भजनाने जनमाणसात देशप्रेम जागृत करीत मानवतेचा संदेश साºया देशात पोहचविणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी म्हणून चिमूर तालुक्याला ओळखले जाते. चिमूरपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या गोंदेडा येथे राष्ट्रसंतांनी ध्यान साधना केली. त्यामुळे गोंदेडा या भूमीला संपूर्ण देशात ‘तपोभूमी’ म्हणून ओळखले जाते. तपोभूमीला विकासासाठी ‘पाच तपाची’ प्रतीक्षा करावी लागली. मागील तीन वर्षांपासून सुरू असलेली विकासकामे काही प्रमाणात पूर्ण होत असल्याने तपोभूमीचे रुप पालटत आहे.अमरावती जिल्ह्यातील ‘यावली’ येथे राष्ट्रसंतांचा जन्म झाला असला तरी त्यांची कर्मभूमी चिमूर तालुका आहे. राष्ट्रसंतांच्या प्रेरणेमुळेच चिमुरात १६ आॅगस्ट १९४२ ला इंग्रजाविरूद्ध क्रांती झाली. चिमूर तालुक्यातील गोंदेडा गुंफा येथे राष्ट्रसंतांनी ध्यान साधना केली. यामुळे या भूमीला तपोभूमी म्हणून पुर्ण राज्यात नावलौकिक प्राप्त झाले आहे. या भूमीत प्रत्येक वर्षी पाच दिवस यात्रा भरते. या निमित्ताने हजारो गुरुदेवभक्त या ठिकाणी पावन भूमीच्या दर्शनासाठी येऊन नतमस्तक होतात.राष्ट्रसंतांच्या तपोभूमीचा विकास व्हावा म्हणून अनेक वर्षांपासून तालुक्यातील राजकीय पुढारी व स्थानिक लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत होते. तपोभूमीच्या विकासाकरिता वन जमिनीचा मोठा अडसर होता. त्यामुळे ही भूमी विकासापासून दूर राहत गेली. मात्र क्षेत्रातील तत्कालिन आमदारांनीही या भूमीच्या विकासाकरिता हातभार लावून योगदान देण्याचा प्रयत्न चालविला.तपोभूमीचा विकास व्हावा म्हणून प्रथमच आमदार कीर्तीकुमार भांगडिया व विधानपरिषद सदस्य मितेश भांगडिया यांनी सरकारकडे साकडे घातले. तपोभूमीला पर्यटन क्षेत्र घोषित करून विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात तपोभूमीच्या विकासासाठी ३४ कोटी रुपयांची तरतूद केली. या निधीतून तपोभूमीत आजघडीला मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जात आहेत. तपोभूमीच्या विकासाकरिता ३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यापैकी १५ कोटींची विकासकामे प्रगतिपथावर आहेत. त्यामध्ये सभागृह, ध्यान केंद्र, अंतर्गत रस्ते, भवन निवास, विद्युत यासह इतर कामे केली जात आहेत. सभागृह व ध्यान केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. तर २० एकर जागेमध्ये स्व.उत्तमराव पाटील वनउद्यानाचे कामही प्रगतिपथावर आहे.