शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

सततच्या पावसानंतर आता शेतीच्या निंदण खर्चात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:32 IST

जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना जुलैअखेर पावसाने दिलासा दिला. मात्र जुलै व आॅगस्ट महिन्यात संतरधार पाऊस कोसळला. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढली असून कपाशी व सोयाबिन पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देआर्थिक कोंडी : मजुरांच्या वाहतुकीचा खर्चही शेतकऱ्यांवर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना जुलैअखेर पावसाने दिलासा दिला. मात्र जुलै व आॅगस्ट महिन्यात संतरधार पाऊस कोसळला. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढली असून कपाशी व सोयाबिन पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तण निर्माण झाले आहे. परिणामी निंदणाचा खर्च वाढत आहे.सध्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना महिला मजुरांची निंदन कामासाठी मनधरणी करावी लागत आहे. यावर्षी महिला मजुरांची मजुरी १५० ते २०० रुपयांच्या घरात असून गावापासून शेतापर्यंत मजुरांच्या वातहुकीचा खर्चही शेतकऱ्यांनाच करावा लागत आहे. महिला मजुरांची टंचाई असल्याने १० ते १५ महिलांचा जत्था तयार करुन काही महिला ठेका पद्धतीनेही निंदन करून देत आहेत. मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पैसा मोजावा लागत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा, कोरपना, वरोरा, जिवती, भद्रावती आदी तालुक्यात सोयाबीन, कपाशी, तूर तसेच सिंदेवाही, सावली, ब्रह्मपुरी, मूल या तालुक्यांमध्ये भात पिके घेतले जातात. यावर्षी पावसामुळे सुरुवातीला लागवड उशिरा करण्यात आली. त्यातच पावसाने जूनमहिन्यात दगा दिला. त्यानंतर जुलै महिन्याच्या शेवटी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला, मात्र जुलैच्या मध्यापासून सतत पाऊस सुरु झाल्याने सोयाबिन व कपाशी या दोन्ही पिकांत मोठ्या प्रमाणात तण वाढले आहे.तणाची काढणी करण्यासाठी खर्चही वाढत आहे. त्यामुळे महिला मजुरांना मोठी मागणी आहे. सकाळी ९.३० वाजतापासून महिला मजूर शेती कामावर जात आहे. सायंकाळी ५.३० पर्यंत काम करण्यात येत असून २०० रुपये रोज द्यावा लागत आहे. एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांचे निंदनाचे फेर आल्याने महिला मजुरांचे भाव वधारले आहे.अतिरिक्त खर्चपूर्वी गावातून शेत मजूर पायी जात होते. मात्र गेल्या काही वर्षांत मजुरांच्या वाहतुकीसाठी आॅटो रिक्षा, मालवाहू वाहन आदींची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करुन द्यावी लागत आहे. यासाठी किमान ३०० रुपये खर्च प्रती दिवस शेतकऱ्यांवर बसत आहे.

टॅग्स :agricultureशेती