शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

४० वर्षांनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील बांबूला आला फुलोरा; इको-प्रोने दिले प्रशासनाला निवेदन

By साईनाथ कुचनकार | Updated: March 21, 2024 18:09 IST

दर चाळीस वर्षांनी चंद्रपूर जिल्ह्यातील बांबूला फुलोरा येत असल्याचा इतिहास असून, ही बाब वनविभागाला ज्ञात आहे.

साईनाथ कुचनकार चंद्रपूर : दर चाळीस वर्षांनी बांबूला फुलोरा येतो. यावर्षी चंद्रपूरच्या जंगलातील बांबूला फुलोरा आला आहे. यापूर्वी ४० वर्षांपूर्वी म्हणजे १९८३-८४ मध्ये जिल्ह्यातील वनक्षेत्रातील बांबूला फुलोरा आलेला होता. त्यामुळे निधी तसेच वनवणवा प्रतिबंधक कामासाठी निधी मंजूर करण्यासह जंगलात आगी लागू नयेत म्हणून वनवणवा प्रतिबंधक कामे करताना वनविभागच नाहीतर जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत त्यात " विशेष आपत्ती व्यवस्थापन" म्हणून विविध विभागांचे सहकार्य घ्यावे, अशी मागणी इको-प्रोच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात मुख्य वनसंरक्षक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक, प्रधान सचिवांनाही पत्र पाठविण्यात आले आहे.

दर चाळीस वर्षांनी चंद्रपूर जिल्ह्यातील बांबूला फुलोरा येत असल्याचा इतिहास असून, ही बाब वनविभागाला ज्ञात आहे. यापूर्वी ४० वर्षांपूर्वी म्हणजे १९८३-८४ मध्ये जिल्ह्यातील वनक्षेत्रातील बांबूला फुलोरा आलेला होता. त्यानुसार मागील एक-दोन वर्षांपासून थोड्या थोड्या प्रमाणात बांबूला फुलोरा येत असल्याचे दिसून येत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. वनविभागाचे नियोजन सुरू आहे, आराखडे तयार झाले, मात्र अद्याप शासनाकडून कामे करण्यासाठी निधी मिळाला नसल्याने तो निधी त्वरित मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

४० वर्षांपूर्वीच्या परिस्थितीत झाला मोठा बदल -

४० वर्षांपूर्वी बांबूला फुलोरा आला. तेव्हा ताडोबा किंवा चंद्रपूरच्या जंगलात वाघांचे, अन्य वन्य प्राण्यांचे प्रमाण तसेच जंगलाच्या लगत लोकसंख्या सुध्दा कमी होती. वाघांची संख्या कमी होती. आज मात्र ताडोबा व बाहेरील वनक्षेत्र अधिक नसून वाघांची संख्या एकूण ३०० च्या घरात आहे. वाघ सुध्दा जंगलातील तृणभक्षी प्राण्यांवर निर्भर आहेत.

सामूहिक प्रयत्न गरजेचे -

वनविभागाने यावर्षी विविध प्रशासकीय विभागांची मदत घेत जंगलव्याप्त गावे, जंगलालगत असलेल्या गावांत प्रबोधन करणे गरजेचे आहे. यासाठी यात जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, पोलिस विभाग, एनजीओ आदींचे सहकार्य घेणे गरजेचे आहे.

"बांबू फुलोरा व संभाव्य आगीपासून होणारा धोका’ याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी एकट्या वनविभागानेच नाहीतर जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासनासह नागरिकांची मदत घेणेही गरजेचे आहे. शासनाने निधी व संसाधन यांची पूर्तता त्वरित करावी, यामुळे प्रशासनाला वेळीच कामे करता येतील.- बंडू धोतरे,अध्यक्ष इको-प्रो संस्था, चंद्रपूर

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरforest departmentवनविभाग