शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

४० वर्षांनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील बांबूला आला फुलोरा; इको-प्रोने दिले प्रशासनाला निवेदन

By साईनाथ कुचनकार | Updated: March 21, 2024 18:09 IST

दर चाळीस वर्षांनी चंद्रपूर जिल्ह्यातील बांबूला फुलोरा येत असल्याचा इतिहास असून, ही बाब वनविभागाला ज्ञात आहे.

साईनाथ कुचनकार चंद्रपूर : दर चाळीस वर्षांनी बांबूला फुलोरा येतो. यावर्षी चंद्रपूरच्या जंगलातील बांबूला फुलोरा आला आहे. यापूर्वी ४० वर्षांपूर्वी म्हणजे १९८३-८४ मध्ये जिल्ह्यातील वनक्षेत्रातील बांबूला फुलोरा आलेला होता. त्यामुळे निधी तसेच वनवणवा प्रतिबंधक कामासाठी निधी मंजूर करण्यासह जंगलात आगी लागू नयेत म्हणून वनवणवा प्रतिबंधक कामे करताना वनविभागच नाहीतर जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत त्यात " विशेष आपत्ती व्यवस्थापन" म्हणून विविध विभागांचे सहकार्य घ्यावे, अशी मागणी इको-प्रोच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात मुख्य वनसंरक्षक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक, प्रधान सचिवांनाही पत्र पाठविण्यात आले आहे.

दर चाळीस वर्षांनी चंद्रपूर जिल्ह्यातील बांबूला फुलोरा येत असल्याचा इतिहास असून, ही बाब वनविभागाला ज्ञात आहे. यापूर्वी ४० वर्षांपूर्वी म्हणजे १९८३-८४ मध्ये जिल्ह्यातील वनक्षेत्रातील बांबूला फुलोरा आलेला होता. त्यानुसार मागील एक-दोन वर्षांपासून थोड्या थोड्या प्रमाणात बांबूला फुलोरा येत असल्याचे दिसून येत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. वनविभागाचे नियोजन सुरू आहे, आराखडे तयार झाले, मात्र अद्याप शासनाकडून कामे करण्यासाठी निधी मिळाला नसल्याने तो निधी त्वरित मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

४० वर्षांपूर्वीच्या परिस्थितीत झाला मोठा बदल -

४० वर्षांपूर्वी बांबूला फुलोरा आला. तेव्हा ताडोबा किंवा चंद्रपूरच्या जंगलात वाघांचे, अन्य वन्य प्राण्यांचे प्रमाण तसेच जंगलाच्या लगत लोकसंख्या सुध्दा कमी होती. वाघांची संख्या कमी होती. आज मात्र ताडोबा व बाहेरील वनक्षेत्र अधिक नसून वाघांची संख्या एकूण ३०० च्या घरात आहे. वाघ सुध्दा जंगलातील तृणभक्षी प्राण्यांवर निर्भर आहेत.

सामूहिक प्रयत्न गरजेचे -

वनविभागाने यावर्षी विविध प्रशासकीय विभागांची मदत घेत जंगलव्याप्त गावे, जंगलालगत असलेल्या गावांत प्रबोधन करणे गरजेचे आहे. यासाठी यात जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, पोलिस विभाग, एनजीओ आदींचे सहकार्य घेणे गरजेचे आहे.

"बांबू फुलोरा व संभाव्य आगीपासून होणारा धोका’ याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी एकट्या वनविभागानेच नाहीतर जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासनासह नागरिकांची मदत घेणेही गरजेचे आहे. शासनाने निधी व संसाधन यांची पूर्तता त्वरित करावी, यामुळे प्रशासनाला वेळीच कामे करता येतील.- बंडू धोतरे,अध्यक्ष इको-प्रो संस्था, चंद्रपूर

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरforest departmentवनविभाग