शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
2
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
4
टीम इंडियाने 'बुटका' म्हणून हिणवलं, विजयानंतर बवुमा म्हणाला- आता आत्मविश्वास आणखी वाढलाय...
5
संविधान दिन २०२५: PM नरेंद्र मोदींचे देशाला खुले पत्र; म्हणाले, “निवडणुकीत मतदानाची संधी...”
6
काजू, बदाम, पिस्ता आणि शेरनी बाई...; मतदार यादी पाहून अधिकारीही झाले थक्क! हटके नावांमागे कारण काय?
7
“भाजपाची ठोकशाही सहन करणार नाही, सत्तेचा माज उतरायला वेळ लागणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण; आरोपीचा व्हिडीओ समोर आल्याने नवा ट्विस्ट
9
थार मालकाची सटकली...! हरियाणाच्या DGP ना कायदेशीर नोटीस पाठविली, म्हणाला, मी ३० लाख मोजून...
10
आज अर्ध्या किमतीत मिळतोय HDFC AMC चा शेअर; का चर्चेत आहे हा स्टॉक?
11
"घरात चाललीय मी ज्यांच्या ते आहेत महाराष्ट्राचे होम मिनिस्टर...", पूजाने घेतला सोहमच्या नावाचा हटके उखाणा
12
“आमच्या उमेदवाराला विजयी करा अन् १० लाख मिळवा”; भाजपा नेत्याची अख्ख्या गावाला खुली ऑफर
13
Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले
14
लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
15
SMAT: सीएसकेच्या उर्विल पटेलचं वादळी शतक; १८३ धावांचे लक्ष्य अवघ्या १२.३ षटकांत गाठले!
16
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
17
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: ७ राशींना 'धनलक्ष्मी'चा विशेष लाभ, ५ राशींना संयमाचा सल्ला!
18
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
19
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
20
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

२१ वर्षांनंतरही जुळे चंद्रपूर नागरिकांच्या प्रतीक्षेतच

By admin | Updated: November 19, 2014 22:35 IST

प्रचंड गाजावाजा करून तब्बल २१ वर्षांपूर्वी नियोजित केलेल्या जुळ्या चंद्रपूरला अजूनही नागरिकांच्या वसाहतीचीच प्रतीक्षा आहे. केवळ बोटावर मोजण्याएवढी तुरळक आणि विरळ वस्ती सोडली तर,

१९९३ चा आहे आराखडा : अजूनही केवळ तुरळक वसाहतगोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूरप्रचंड गाजावाजा करून तब्बल २१ वर्षांपूर्वी नियोजित केलेल्या जुळ्या चंद्रपूरला अजूनही नागरिकांच्या वसाहतीचीच प्रतीक्षा आहे. केवळ बोटावर मोजण्याएवढी तुरळक आणि विरळ वस्ती सोडली तर, अजूनही बराचसा भूभाग ओसाडच आहे. यामुळे जुन्या चंद्रपूरवरचा भार अजूनही कायमच आहे.२१ आॅगस्ट १९९३ मध्ये नव्या चंद्रपूरची संकल्पना अस्तीत्वात आली होती. त्यानंतर २ सप्टेंबर १९९३ रोजी जुळ्या चंद्रपूरचा नियोजन आराखडा (डी.पी. प्लॅन) तयार करून तो सादर करण्यात आला होता. १ हजार ६०० हेक्टर म्हणजे ४ हजार एकर परिसरात हे नवे शहर वसविले जाणार आहे. या नियोजन आराखड्यात रूंद रस्ते, उद्याने, शालेय परिसर, रूग्णालये, बाजारपेठा, ट्रक टर्मिनल हब, जल शुद्धीकरण प्रकल्प, डे्रनेज लाईन, जल-मल निस्सारण योजना आदींसह अनेक बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. हा आराखडा केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवून त्या दृष्टीने आखणीही करण्यात आली आहे. नव्या चंद्रपूरच्या विकासाच्या दृष्टीने चार सेक्टर पाडण्यात आले असून सर्व सेक्टरमध्ये जीवनावश्यक गरजांची पूर्तता करणाऱ्या बाजारपेठेसह दळणवळणासाठी रुंद रस्त्यांचाही अंतर्भाव आहे. गेल्या चार वर्षात जुळ्या चंद्रपुरात रस्ते आणि नाल्यांचे जाळे निर्माण केले गेले. विद्युत पुरवठाही पोहचविण्यात आला. मात्र ज्यांच्यासाठी हे सर्व होत आहे, त्या नागरिकांनीच मात्र या नव्या शहराकडे पाठ फिरविल्याने निराशाजनक चित्र निर्माण झाले आहे.नव्या चंद्रपुरात सध्या ५०० क्वॉर्टर तयार आहेत. या सोबतच २१४ फ्लॅटची योजनाही तयार आहे. नव्या कृती आराखड्यानुसार या क्वॉर्टरपर्यंत रस्ते, नाल्या, वीजही पोहचली आहे. अलिकडेच पत्रकारांसाठी १०० घरकुलांचा प्रस्तावही निघाला आहे. या परिसरात रस्ते, वीज, नाल्या तयार झाल्या आहेत. या बांधकामात महत्वाची भूमिका बजावणाऱ्यांमध्ये जयंत मामीडवार यांच्या गजानन कन्स्ट्रक्शन कंपनीचे नाव पुढे आहे. या परिसरात उभारल्या जाणाऱ्या बगीचासाठी खनिज विकास निधीतून तरतुद करण्यात आली आहे. दररोज २ लाख व्यक्तींना पाणी पुरवठा करू शकणारा जलशुद्धीकरण प्रकल्पही पूर्णत्वाकडे आला आहे.हा परिसर चंद्रपूरकरांना खुणावत असला तरी अद्यापही आवश्यक सोई सुविधा न पोहचल्याने चंद्रपूरकरांचे बिऱ्हाड नव्या शहराकडे वळताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे.