शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

२१ वर्षांनंतरही जुळे चंद्रपूर नागरिकांच्या प्रतीक्षेतच

By admin | Updated: November 19, 2014 22:35 IST

प्रचंड गाजावाजा करून तब्बल २१ वर्षांपूर्वी नियोजित केलेल्या जुळ्या चंद्रपूरला अजूनही नागरिकांच्या वसाहतीचीच प्रतीक्षा आहे. केवळ बोटावर मोजण्याएवढी तुरळक आणि विरळ वस्ती सोडली तर,

१९९३ चा आहे आराखडा : अजूनही केवळ तुरळक वसाहतगोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूरप्रचंड गाजावाजा करून तब्बल २१ वर्षांपूर्वी नियोजित केलेल्या जुळ्या चंद्रपूरला अजूनही नागरिकांच्या वसाहतीचीच प्रतीक्षा आहे. केवळ बोटावर मोजण्याएवढी तुरळक आणि विरळ वस्ती सोडली तर, अजूनही बराचसा भूभाग ओसाडच आहे. यामुळे जुन्या चंद्रपूरवरचा भार अजूनही कायमच आहे.२१ आॅगस्ट १९९३ मध्ये नव्या चंद्रपूरची संकल्पना अस्तीत्वात आली होती. त्यानंतर २ सप्टेंबर १९९३ रोजी जुळ्या चंद्रपूरचा नियोजन आराखडा (डी.पी. प्लॅन) तयार करून तो सादर करण्यात आला होता. १ हजार ६०० हेक्टर म्हणजे ४ हजार एकर परिसरात हे नवे शहर वसविले जाणार आहे. या नियोजन आराखड्यात रूंद रस्ते, उद्याने, शालेय परिसर, रूग्णालये, बाजारपेठा, ट्रक टर्मिनल हब, जल शुद्धीकरण प्रकल्प, डे्रनेज लाईन, जल-मल निस्सारण योजना आदींसह अनेक बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. हा आराखडा केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवून त्या दृष्टीने आखणीही करण्यात आली आहे. नव्या चंद्रपूरच्या विकासाच्या दृष्टीने चार सेक्टर पाडण्यात आले असून सर्व सेक्टरमध्ये जीवनावश्यक गरजांची पूर्तता करणाऱ्या बाजारपेठेसह दळणवळणासाठी रुंद रस्त्यांचाही अंतर्भाव आहे. गेल्या चार वर्षात जुळ्या चंद्रपुरात रस्ते आणि नाल्यांचे जाळे निर्माण केले गेले. विद्युत पुरवठाही पोहचविण्यात आला. मात्र ज्यांच्यासाठी हे सर्व होत आहे, त्या नागरिकांनीच मात्र या नव्या शहराकडे पाठ फिरविल्याने निराशाजनक चित्र निर्माण झाले आहे.नव्या चंद्रपुरात सध्या ५०० क्वॉर्टर तयार आहेत. या सोबतच २१४ फ्लॅटची योजनाही तयार आहे. नव्या कृती आराखड्यानुसार या क्वॉर्टरपर्यंत रस्ते, नाल्या, वीजही पोहचली आहे. अलिकडेच पत्रकारांसाठी १०० घरकुलांचा प्रस्तावही निघाला आहे. या परिसरात रस्ते, वीज, नाल्या तयार झाल्या आहेत. या बांधकामात महत्वाची भूमिका बजावणाऱ्यांमध्ये जयंत मामीडवार यांच्या गजानन कन्स्ट्रक्शन कंपनीचे नाव पुढे आहे. या परिसरात उभारल्या जाणाऱ्या बगीचासाठी खनिज विकास निधीतून तरतुद करण्यात आली आहे. दररोज २ लाख व्यक्तींना पाणी पुरवठा करू शकणारा जलशुद्धीकरण प्रकल्पही पूर्णत्वाकडे आला आहे.हा परिसर चंद्रपूरकरांना खुणावत असला तरी अद्यापही आवश्यक सोई सुविधा न पोहचल्याने चंद्रपूरकरांचे बिऱ्हाड नव्या शहराकडे वळताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे.