शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी येत नाही अन् बोलणार पण नाही" असं म्हणणाऱ्या भोजपुरी अभिनेता पवन सिंहचा भाजपात प्रवेश
2
फिलीपीन्समध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या
3
मी आठ युद्धे थांबवली, नोबेल न मिळाल्यास..; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
4
फेरारी कार नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्...
5
आम्हाला अजूनही अटकेच्या आदेशाची प्रत मिळाली नाही; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचा दावा
6
Video - "एक, दोन रुपये तरी द्या..."; इन्फ्लुएन्सर iPhone 17 Pro Max घेण्यासाठी मागतेय डोनेशन
7
कोण आहेत आशीष पांडे आणि कल्याण कुमार? मोदी सरकारनं 'या' पदावर केली नियुक्ती
8
RBI MPC Policy Live: दिवाळीत कर्ज महागच! EMI कमी होण्याची वाट पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास; रेपो दर 'जैसे थे'
9
मूर्ती लहान पण कीर्ती महान! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली; ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रमी शतक
10
Zubeen Garg : "७ दिवसांत बाहेर येईल मृत्यूमागचं सत्य"; सिंगर झुबीन गर्गच्या पत्नीच्या संशयावरुन मॅनेजरला अटक
11
Asia Cup 2025: ' ट्रॉफी पाहिजे तर...',  बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट...
12
७५ वर्षाचा नवरदेव अन् ३५ वर्षाची नवरी; लग्नाच्या रात्रीच वृद्ध पतीचा मृत्यू, घातपाताचा संशय
13
AUS W vs NZ W, ICC Women’s World Cup 2025, Live Streaming : न्यूझीलंडसमोर ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान, कारण...
14
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनची वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
15
"माझ्या वडिलांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...", 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली- "मी त्यांना..."
16
बनावट नोटाचा 'बाजार'; कोणत्या राज्यात सर्वाधिक छपाई, महाराष्ट्र कोणत्या गुन्ह्यांमध्ये पहिला?
17
आजपासून UPI पेमेंटचं महत्त्वाचं फीचर बंद; आता थेट पैसे मागता येणार नाहीत!
18
Sonam Kapoor Pregnant: दुसऱ्यांदा आई होणार सोनम कपूर? 'वायू'च्या जन्मानंतर कुटुंबात पुन्हा चिमुकल्या पाहुण्याची चाहुल
19
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
20
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल

२१ वर्षांनंतरही जुळे चंद्रपूर नागरिकांच्या प्रतीक्षेतच

By admin | Updated: November 19, 2014 22:35 IST

प्रचंड गाजावाजा करून तब्बल २१ वर्षांपूर्वी नियोजित केलेल्या जुळ्या चंद्रपूरला अजूनही नागरिकांच्या वसाहतीचीच प्रतीक्षा आहे. केवळ बोटावर मोजण्याएवढी तुरळक आणि विरळ वस्ती सोडली तर,

१९९३ चा आहे आराखडा : अजूनही केवळ तुरळक वसाहतगोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूरप्रचंड गाजावाजा करून तब्बल २१ वर्षांपूर्वी नियोजित केलेल्या जुळ्या चंद्रपूरला अजूनही नागरिकांच्या वसाहतीचीच प्रतीक्षा आहे. केवळ बोटावर मोजण्याएवढी तुरळक आणि विरळ वस्ती सोडली तर, अजूनही बराचसा भूभाग ओसाडच आहे. यामुळे जुन्या चंद्रपूरवरचा भार अजूनही कायमच आहे.२१ आॅगस्ट १९९३ मध्ये नव्या चंद्रपूरची संकल्पना अस्तीत्वात आली होती. त्यानंतर २ सप्टेंबर १९९३ रोजी जुळ्या चंद्रपूरचा नियोजन आराखडा (डी.पी. प्लॅन) तयार करून तो सादर करण्यात आला होता. १ हजार ६०० हेक्टर म्हणजे ४ हजार एकर परिसरात हे नवे शहर वसविले जाणार आहे. या नियोजन आराखड्यात रूंद रस्ते, उद्याने, शालेय परिसर, रूग्णालये, बाजारपेठा, ट्रक टर्मिनल हब, जल शुद्धीकरण प्रकल्प, डे्रनेज लाईन, जल-मल निस्सारण योजना आदींसह अनेक बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. हा आराखडा केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवून त्या दृष्टीने आखणीही करण्यात आली आहे. नव्या चंद्रपूरच्या विकासाच्या दृष्टीने चार सेक्टर पाडण्यात आले असून सर्व सेक्टरमध्ये जीवनावश्यक गरजांची पूर्तता करणाऱ्या बाजारपेठेसह दळणवळणासाठी रुंद रस्त्यांचाही अंतर्भाव आहे. गेल्या चार वर्षात जुळ्या चंद्रपुरात रस्ते आणि नाल्यांचे जाळे निर्माण केले गेले. विद्युत पुरवठाही पोहचविण्यात आला. मात्र ज्यांच्यासाठी हे सर्व होत आहे, त्या नागरिकांनीच मात्र या नव्या शहराकडे पाठ फिरविल्याने निराशाजनक चित्र निर्माण झाले आहे.नव्या चंद्रपुरात सध्या ५०० क्वॉर्टर तयार आहेत. या सोबतच २१४ फ्लॅटची योजनाही तयार आहे. नव्या कृती आराखड्यानुसार या क्वॉर्टरपर्यंत रस्ते, नाल्या, वीजही पोहचली आहे. अलिकडेच पत्रकारांसाठी १०० घरकुलांचा प्रस्तावही निघाला आहे. या परिसरात रस्ते, वीज, नाल्या तयार झाल्या आहेत. या बांधकामात महत्वाची भूमिका बजावणाऱ्यांमध्ये जयंत मामीडवार यांच्या गजानन कन्स्ट्रक्शन कंपनीचे नाव पुढे आहे. या परिसरात उभारल्या जाणाऱ्या बगीचासाठी खनिज विकास निधीतून तरतुद करण्यात आली आहे. दररोज २ लाख व्यक्तींना पाणी पुरवठा करू शकणारा जलशुद्धीकरण प्रकल्पही पूर्णत्वाकडे आला आहे.हा परिसर चंद्रपूरकरांना खुणावत असला तरी अद्यापही आवश्यक सोई सुविधा न पोहचल्याने चंद्रपूरकरांचे बिऱ्हाड नव्या शहराकडे वळताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे.