शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
4
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
5
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
6
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
7
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
8
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
9
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
10
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
11
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
12
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
13
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
14
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
15
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
16
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
17
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
18
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
19
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
20
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

पाणीपुरवठा योजना १२ वर्षानंतरही तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 21:43 IST

२००५-०६ मध्ये पळसगाव येथे जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत पाणी पुरवठा नळ योजनेची टाकी बांधण्यात आली. मात्र बांधकाम अर्ध्यावरच रखडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देपाण्याची टाकी बनली शोभेची वास्तू : पळसगावात पाणी टंचाई

लोकमत न्यूज नेटवर्कपळसगाव : २००५-०६ मध्ये पळसगाव येथे जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत पाणी पुरवठा नळ योजनेची टाकी बांधण्यात आली. मात्र बांधकाम अर्ध्यावरच रखडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे.पळसगाव हे बल्लारपूर येथून १५ कि.मी. अंतरावर आहे. तेरा वर्षापूर्वी शासनाने लाखो रुपये खर्च करून नळ योजनेची टाकी बांधली. मात्र नळ वितरण प्रणालीला अल्पावधितच ग्रहण लागल्याने संबंधित काम पूर्णत्वास गेले नाही. प्रारंभी नळ योजनेचे काम धडाक्यात सुरू झाल्याने नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. घरापर्यंत पाणी पोहचेल, असेही अनेकांना वाटले, पण त्यांचा आनंद काही दिवसातच मावळला. पाणी घरापर्यंत येऊ शकले नाही. त्यामुळे अद्याप पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. जलस्वराज्य प्रकल्पाचे काम अर्ध्यावरच थांबल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. पूर्वी पळसगावात नळाद्वारे पाणी वितरण केल्या जात होते. परंतु टाकी जीर्नवस्था झाल्याने ती बंद करण्यात आली. त्यानंतर पळसगावात टप्याटप्याने सरकारी दहा बोअरवेल मारण्यात आल्या. परंतु त्या एकाही बोरवेलचे पाणी पिण्यायोग्य नाही. केवळ एकमेव बोरिंगचे पाणी हे पिण्यायोग्य आहे. त्यामुळे त्या एकाच बोरींगवर महिलांची गर्दी असते. अनेकवेळा महिलांमध्ये भांडण सुद्धा होत आहे. कधी या बोरिंगला बिघाड आला, तर पुन्हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर होतो. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे.पाण्यासाठी भटकंतीगावातील जुनी पाण्याची टाकी पाळून नव्याने बांधण्यात आली. मात्र योजना मागील १३ वर्षांपासून पुर्णत्वास गेली नाही. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी अनेकवेळा प्रशासनाकडे पाठपुरावाही केला आहे. मात्र काहीही उपयोग झाला नाही. आता गावात पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. प्रशासनातर्फे बोअरवेल लावण्यात आल्या. मात्र पाणी पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांचा आरोग्याचा प्रश्नही गंभीर होत आहे.