शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
3
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
4
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
5
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
6
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
7
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
8
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
9
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
10
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
11
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
12
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
13
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
14
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
15
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
16
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
17
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
18
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
19
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
20
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!

पाणीपुरवठा योजना १२ वर्षानंतरही तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 21:43 IST

२००५-०६ मध्ये पळसगाव येथे जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत पाणी पुरवठा नळ योजनेची टाकी बांधण्यात आली. मात्र बांधकाम अर्ध्यावरच रखडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देपाण्याची टाकी बनली शोभेची वास्तू : पळसगावात पाणी टंचाई

लोकमत न्यूज नेटवर्कपळसगाव : २००५-०६ मध्ये पळसगाव येथे जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत पाणी पुरवठा नळ योजनेची टाकी बांधण्यात आली. मात्र बांधकाम अर्ध्यावरच रखडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे.पळसगाव हे बल्लारपूर येथून १५ कि.मी. अंतरावर आहे. तेरा वर्षापूर्वी शासनाने लाखो रुपये खर्च करून नळ योजनेची टाकी बांधली. मात्र नळ वितरण प्रणालीला अल्पावधितच ग्रहण लागल्याने संबंधित काम पूर्णत्वास गेले नाही. प्रारंभी नळ योजनेचे काम धडाक्यात सुरू झाल्याने नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. घरापर्यंत पाणी पोहचेल, असेही अनेकांना वाटले, पण त्यांचा आनंद काही दिवसातच मावळला. पाणी घरापर्यंत येऊ शकले नाही. त्यामुळे अद्याप पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. जलस्वराज्य प्रकल्पाचे काम अर्ध्यावरच थांबल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. पूर्वी पळसगावात नळाद्वारे पाणी वितरण केल्या जात होते. परंतु टाकी जीर्नवस्था झाल्याने ती बंद करण्यात आली. त्यानंतर पळसगावात टप्याटप्याने सरकारी दहा बोअरवेल मारण्यात आल्या. परंतु त्या एकाही बोरवेलचे पाणी पिण्यायोग्य नाही. केवळ एकमेव बोरिंगचे पाणी हे पिण्यायोग्य आहे. त्यामुळे त्या एकाच बोरींगवर महिलांची गर्दी असते. अनेकवेळा महिलांमध्ये भांडण सुद्धा होत आहे. कधी या बोरिंगला बिघाड आला, तर पुन्हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर होतो. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे.पाण्यासाठी भटकंतीगावातील जुनी पाण्याची टाकी पाळून नव्याने बांधण्यात आली. मात्र योजना मागील १३ वर्षांपासून पुर्णत्वास गेली नाही. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी अनेकवेळा प्रशासनाकडे पाठपुरावाही केला आहे. मात्र काहीही उपयोग झाला नाही. आता गावात पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. प्रशासनातर्फे बोअरवेल लावण्यात आल्या. मात्र पाणी पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांचा आरोग्याचा प्रश्नही गंभीर होत आहे.