शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

पाणीपुरवठा योजना १२ वर्षानंतरही तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 21:43 IST

२००५-०६ मध्ये पळसगाव येथे जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत पाणी पुरवठा नळ योजनेची टाकी बांधण्यात आली. मात्र बांधकाम अर्ध्यावरच रखडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देपाण्याची टाकी बनली शोभेची वास्तू : पळसगावात पाणी टंचाई

लोकमत न्यूज नेटवर्कपळसगाव : २००५-०६ मध्ये पळसगाव येथे जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत पाणी पुरवठा नळ योजनेची टाकी बांधण्यात आली. मात्र बांधकाम अर्ध्यावरच रखडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे.पळसगाव हे बल्लारपूर येथून १५ कि.मी. अंतरावर आहे. तेरा वर्षापूर्वी शासनाने लाखो रुपये खर्च करून नळ योजनेची टाकी बांधली. मात्र नळ वितरण प्रणालीला अल्पावधितच ग्रहण लागल्याने संबंधित काम पूर्णत्वास गेले नाही. प्रारंभी नळ योजनेचे काम धडाक्यात सुरू झाल्याने नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. घरापर्यंत पाणी पोहचेल, असेही अनेकांना वाटले, पण त्यांचा आनंद काही दिवसातच मावळला. पाणी घरापर्यंत येऊ शकले नाही. त्यामुळे अद्याप पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. जलस्वराज्य प्रकल्पाचे काम अर्ध्यावरच थांबल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. पूर्वी पळसगावात नळाद्वारे पाणी वितरण केल्या जात होते. परंतु टाकी जीर्नवस्था झाल्याने ती बंद करण्यात आली. त्यानंतर पळसगावात टप्याटप्याने सरकारी दहा बोअरवेल मारण्यात आल्या. परंतु त्या एकाही बोरवेलचे पाणी पिण्यायोग्य नाही. केवळ एकमेव बोरिंगचे पाणी हे पिण्यायोग्य आहे. त्यामुळे त्या एकाच बोरींगवर महिलांची गर्दी असते. अनेकवेळा महिलांमध्ये भांडण सुद्धा होत आहे. कधी या बोरिंगला बिघाड आला, तर पुन्हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर होतो. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे.पाण्यासाठी भटकंतीगावातील जुनी पाण्याची टाकी पाळून नव्याने बांधण्यात आली. मात्र योजना मागील १३ वर्षांपासून पुर्णत्वास गेली नाही. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी अनेकवेळा प्रशासनाकडे पाठपुरावाही केला आहे. मात्र काहीही उपयोग झाला नाही. आता गावात पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. प्रशासनातर्फे बोअरवेल लावण्यात आल्या. मात्र पाणी पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांचा आरोग्याचा प्रश्नही गंभीर होत आहे.