शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
4
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
5
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
6
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
7
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
8
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
9
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
10
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
11
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
12
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
13
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
14
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
15
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
16
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
17
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
18
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
19
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
20
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!

इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रिया मागासवर्गीयांसाठी अन्यायकारक.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:42 IST

विसापूर: महाराष्ट्र राज्यात अभियांत्रिक महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आवेदन पत्र ऑनलाइन भरण्याची अंतिम तारीख ही १५ डिसेंबर होती.त्यानंतर पात्रता फेरीत ...

विसापूर: महाराष्ट्र राज्यात अभियांत्रिक महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आवेदन पत्र ऑनलाइन भरण्याची अंतिम तारीख ही १५ डिसेंबर होती.त्यानंतर पात्रता फेरीत विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यांकन करून प्राधान्यक्रमाने आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड केल्या जात होती. पूर्वी प्रथम पात्रता फेरीच्या राऊंड मध्ये आरक्षणानुसार अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,ओबीसी व एनटी विद्यार्थ्यांची जागा गुणानुक्रमाने भरल्या जायच्या व त्यानंतर आरक्षणाचा कोटा शिल्लक राहिल्यास दुसऱ्या फेरीत किंवा तिसऱ्या फेरीत त्याच प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे पात्र ठरलेल्याना प्रवेश द्यायचा. परंतु या नियमाला बगल देऊन पहिल्या पात्रता फेरीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया तील कोटा शिल्लक राहिल्यास त्या जागा सरळ खुल्या प्रवर्गात टाकल्या जात आहे. या पद्धतीने मागासवर्गीयांचे आरक्षण पद्धतशीररीत्या सरकार संपवण्याचा घाट रचत आहे.ही प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी अतिशय अन्यायकारक आहे.

वैद्यकीय प्रवेशात मात्र या नवीन नियमानुसार प्रवेश प्रक्रिया वापरत नसून जुन्या पद्धतीने पहिल्या पात्र फेरीत शिल्लक राहिलेला कोटा दुसऱ्या अथवा तिसऱ्या फेरीत पूर्ण करत आहे. आरक्षणाच्या निकषानुसार त्याच प्रवर्गातील विद्यार्थी ची निवड केली जात आहे किंवा त्या प्रवगातील विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास ती जागा मागासवर्गीय कोट्यात वापरल्या जात आहे.

परंतु या नवीन पद्धती मध्ये सरकारने अभियांत्रिकी प्रवेश भरती बाबत मार्गदर्शन किंवा सूचना ठळक प्रसिद्ध किंवा जाहीर केल्या नाही त्यामुळे विद्यार्थी व पालक संभ्रमात आहे म्हणून शासनाने याबाबत खुलासा सादर करून जुन्या पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवावी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय दूर करावा;अशी मागणी विद्यार्थी संघटनेकडून होत आहे.

कोट:-पहिल्या फेरीत मागास वर्गीय (अनु.जाती, अनु.जमाती, ओबीसी, एनटी) प्रवर्गातील कोट्यातील जागा शिल्लक राहण्याची शक्यता अधिक आहे. तेव्हा दुसऱ्या फेरीत शिल्लक जागा त्याच गटात किंवा उमेदवार उपलब्ध नसल्यास उर्वरित आरक्षणातील गटात कन्वर्ट करणे हिताचे आहे. याआधी अशीच प्रवेश प्रक्रिया राबविल्या जायची परंतु त्या खुल्या प्रवर्गात बदल करणे ही प्रक्रिया अतिशय धोकादायक असून आरक्षण संपण्याचा जणू घाटच आहे.

प्रा. नीरज नगराळे राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर.