शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
"ठाकरे बंधू बोलबच्चन...बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
3
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
4
सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
7
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
8
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?
9
“शेतकरी कर्जमाफी फाइलवर सही करण्यास फडणवीस-शिंदे-पवारांच्या हाताला लकवा मारला आहे का?”: सपकाळ
10
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
11
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
12
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
13
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
14
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
15
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
16
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
17
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
18
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
19
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
20
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...

इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रिया मागासवर्गीयांसाठी अन्यायकारक.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:42 IST

विसापूर: महाराष्ट्र राज्यात अभियांत्रिक महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आवेदन पत्र ऑनलाइन भरण्याची अंतिम तारीख ही १५ डिसेंबर होती.त्यानंतर पात्रता फेरीत ...

विसापूर: महाराष्ट्र राज्यात अभियांत्रिक महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आवेदन पत्र ऑनलाइन भरण्याची अंतिम तारीख ही १५ डिसेंबर होती.त्यानंतर पात्रता फेरीत विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यांकन करून प्राधान्यक्रमाने आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड केल्या जात होती. पूर्वी प्रथम पात्रता फेरीच्या राऊंड मध्ये आरक्षणानुसार अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,ओबीसी व एनटी विद्यार्थ्यांची जागा गुणानुक्रमाने भरल्या जायच्या व त्यानंतर आरक्षणाचा कोटा शिल्लक राहिल्यास दुसऱ्या फेरीत किंवा तिसऱ्या फेरीत त्याच प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे पात्र ठरलेल्याना प्रवेश द्यायचा. परंतु या नियमाला बगल देऊन पहिल्या पात्रता फेरीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया तील कोटा शिल्लक राहिल्यास त्या जागा सरळ खुल्या प्रवर्गात टाकल्या जात आहे. या पद्धतीने मागासवर्गीयांचे आरक्षण पद्धतशीररीत्या सरकार संपवण्याचा घाट रचत आहे.ही प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी अतिशय अन्यायकारक आहे.

वैद्यकीय प्रवेशात मात्र या नवीन नियमानुसार प्रवेश प्रक्रिया वापरत नसून जुन्या पद्धतीने पहिल्या पात्र फेरीत शिल्लक राहिलेला कोटा दुसऱ्या अथवा तिसऱ्या फेरीत पूर्ण करत आहे. आरक्षणाच्या निकषानुसार त्याच प्रवर्गातील विद्यार्थी ची निवड केली जात आहे किंवा त्या प्रवगातील विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास ती जागा मागासवर्गीय कोट्यात वापरल्या जात आहे.

परंतु या नवीन पद्धती मध्ये सरकारने अभियांत्रिकी प्रवेश भरती बाबत मार्गदर्शन किंवा सूचना ठळक प्रसिद्ध किंवा जाहीर केल्या नाही त्यामुळे विद्यार्थी व पालक संभ्रमात आहे म्हणून शासनाने याबाबत खुलासा सादर करून जुन्या पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवावी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय दूर करावा;अशी मागणी विद्यार्थी संघटनेकडून होत आहे.

कोट:-पहिल्या फेरीत मागास वर्गीय (अनु.जाती, अनु.जमाती, ओबीसी, एनटी) प्रवर्गातील कोट्यातील जागा शिल्लक राहण्याची शक्यता अधिक आहे. तेव्हा दुसऱ्या फेरीत शिल्लक जागा त्याच गटात किंवा उमेदवार उपलब्ध नसल्यास उर्वरित आरक्षणातील गटात कन्वर्ट करणे हिताचे आहे. याआधी अशीच प्रवेश प्रक्रिया राबविल्या जायची परंतु त्या खुल्या प्रवर्गात बदल करणे ही प्रक्रिया अतिशय धोकादायक असून आरक्षण संपण्याचा जणू घाटच आहे.

प्रा. नीरज नगराळे राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर.