शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

प्रशासनाने दिशाभूल केली - नरेश पुगलिया

By admin | Updated: February 4, 2016 00:59 IST

या संदर्भात माहिती देण्यासाठी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी खासदार नरेश पुगलिया म्हणाले,....

या संदर्भात माहिती देण्यासाठी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी खासदार नरेश पुगलिया म्हणाले, स्मशानभूमीमध्ये प्रेत जाळण्याच्या संदर्भात प्रशासनाने घेतलेली भूमिका दिशाभूल करणारी आहे. या स्मशानभूमीवर मंगळवारी प्रेत जाळण्याच्या पूर्वी प्रशासनाने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बैठक घेतली होती. एकीकडे कार्यकर्ते, नागरिक यांना बैठकीत गुंतवून ठेवून जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या बंदोबस्तात आणि दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करून पे्रत जाळण्याची प्रक्रिया पार पाडली. प्रशासनाची आणि पोलिसांची ही कृती दिशाभूल करणारी असून जनतेच्या धार्मिक भावना पायदळी तुडविणारी आहे, असे ते म्हणाले.पुगलिया पुढे म्हणाले, १९९९ च्या काळात इरई नदीच्या पात्रात प्रेत जाळण्याची प्रथा होती. पर्यावरणाला धोका असल्याने आपण आपल्या खासदार फंडातून ही स्मशानभूमी बांधली. महसूल विभागाने ३० आर जागा दिली, त्यावर तीन शेड बांधण्यात आले. आमदार फंडातून भींतही बांधण्यात आली. ही स्मशानभूमी दाताळा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केली. मात्र पाणी आणि वीज बिलाचा खर्च परवडत नसल्याने ग्रामपंचायतीने नकार दिला. त्यामुळे अडवानी, हसानी यांना देखभाल दुरूस्तीच्या खर्चासह ती चालविण्यास दिली. नंतरच्या काळात लाकडाचे कोठार बांधण्यात आले. मात्र कालांतराने ही स्मशानभूमी बंद पडली. त्यात झुडूपे वाढली. दाताळाच्या नागरिकांनीही येथे वापर बंद केला. नंतरच्या काळात या परिसरात अन्य मंदीरासह बालाजींचे मंदीर बांधकाम सुरू झाले. तेव्हापासून सर्व नागरिकांनी मोक्षधामवर प्रेत जाळणे सुरू केले. ग्रामपंचायतीने ही जागा बालोद्यानसाठी देण्याचा ठराव घेवून प्रशासनाला पाठविला. स्मशानभूमीला कुलूप लावून बंदचा फलकही लावण्यात आला होता. असे असतानाही केवळ एकाच कुटूंबाने आपल्या घरातील व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी या स्मशानभूमीचा वापर सुरू केला. मंगळवारची घटनाही त्यातूनच घडली आहे. नगरसेवक डोडाणी यांच्यामागे राजकीय पाठबळ असल्यानेच हा प्रकार जाणीवपूर्वक घडला, मात्र त्यातून नागरिकांच्या भावना दुखविण्यात आल्याचे पुगलिया म्हणाले. ही स्मशानभूमी कुण्या एका समाजाला कधीच नव्हती, जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्र्याच्या मागे फिरण्यापेक्षा वस्तुस्थिती तपासावी, आही टोला पुगलियांनी लगावला. पत्रकार परिषदेला राहूल पुगलिया, अ‍ॅड. अविनाश ठावरी, नगरसेवक अशोक नागापुरे, प्रविण पडवेकर, प्रशांत दानव, वसंत मांढरे, गावंडे गुरूजी, माजी नगराध्यक्ष डॉ. महाकूलकर आदी उपस्थित होते.