शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

लेखा परीक्षणात अडली भिसीची पाणी पुरवठा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 01:01 IST

येथे १ कोटी ९९ लक्ष रुपये किंमतीची नवी राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली असली तरी, चार वर्ष लोटूनसुद्धा जुन्या ५ कोटी ८० लक्ष रुपये किंमतीच्या योजनेचा लेखा परीक्षण अहवाल अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणीत रखडलेल्या, नव्या पूरक पाणीपुरवठा योजनेला शासनाकडून मंजुरी मिळणे कठीण आहे.

ठळक मुद्देपाणीप्रश्न : थ्री फेज एक्स्प्रेस फिडरचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाकडे

लोकमत न्यूज नेटवर्कभिसी : येथे १ कोटी ९९ लक्ष रुपये किंमतीची नवी राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली असली तरी, चार वर्ष लोटूनसुद्धा जुन्या ५ कोटी ८० लक्ष रुपये किंमतीच्या योजनेचा लेखा परीक्षण अहवाल अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणीत रखडलेल्या, नव्या पूरक पाणीपुरवठा योजनेला शासनाकडून मंजुरी मिळणे कठीण आहे. त्यामुळे यावर्षीही पाणी समस्या निकाली लागल्याची शक्यता कमीच आहे.लेखा परीक्षण अहवाल जर जून महिन्यात शासनाला सादर झाला तरी त्याला मंजूरी मिळेपर्यंत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही योजना अधांतरीच राहील, अशी भिती व्यक्त केली जात आहे.१५ एप्रिल रोजी नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी भिसीच्या ग्राम पंचायत कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले. साहित्याची नासधूस करण्यात आली. पोलिसात ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने अज्ञात नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर येथील लोकप्रतिनिधींना जाग आली आणि २६ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश वारजूकर यांनी भिसीच्या पाण्याच्या मुद्दा उपस्थित करत चर्चा घडवून आणली. मात्र अजूनतरी पाणी या समस्येवर कोणताही तोडगा निघाला नाही. एका वर्षापूर्वी भिसीच्या राष्ट्रीय पेयजल योजनेला मंजुरी मिळाली असती, तर तात्काळ त्या योजनेतून भिसी पाणीपुरवठा योजनेसाठी धापरला तलावावर नवीन थ्री फेज एक्स्प्रेस फिडरची व्यवस्था करता आली असती. तलावावर २४ तास थ्री फेज वीज प्रवाह मिळाल्यास फिल्टर प्लांटला नियमित व पुरेसा पाणीपुरवठा झाला असता. पण तो पर्याय सद्यातरी अशक्यप्राय असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सध्या पाण्याची पातळी खालावली आहे. मे व जून महिन्यात पाणीसाठा आटण्याची शक्यता आहे. भिसीतच नव्हे तर सर्वत्र नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी वेळीच या समस्येकडे लक्ष दिले असते, तर ही समस्या आज उद्भवली नसती. ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतील रक्कम यावर खर्च करणे अपेक्षित होते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.भिसीच्या जुन्या ५ कोटी ८० लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेची कंत्राटदारांची शिल्लक देयके याच महिन्यात अदा करण्यात आली असून लेखा परीक्षण अहवाल तयार करणे सुरु आहे. लेखा परीक्षणाचे काम किचकट असल्यामुळे हे काम मे महिन्याच्या शेवटपर्यंत पूर्ण करण्यात येईल.त्यानंतर भिसीच्या राष्ट्रीय पेयजल योजनेच्या मंजुरीचा मार्ग मोकळा होईल.- आनंद भालाधरे ,डेप्युटी इंजिनिअर, जीवन प्राधिकरण, चंद्रपूर.एम.ए.सी.पी. योजने अंतर्गत न्यू फिडर एक्स्प्रेस करिता जिल्हाधिकाऱ्यांकडे पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती, चिमूर मार्फत प्रस्ताव सादर केला करण्यात आला आहे.- अनिरुद्ध शेंडे ,सचिव, ग्राम पंचायत,भिसी

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतWaterपाणी