शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

घाईगडबडीच्या सुनावणीमुळे अतिरिक्त शिक्षक पुन्हा अडचणीत

By admin | Updated: August 22, 2016 01:48 IST

माध्यमिक विभागातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी शिक्षणाधिकारी सुनावणी घेऊन आज २२ आॅगस्टला निर्णय घेणार आहेत.

मराशिपची तक्रार : पालकमंत्र्याकडे धाव घेणारचंद्रपूर : माध्यमिक विभागातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी शिक्षणाधिकारी सुनावणी घेऊन आज २२ आॅगस्टला निर्णय घेणार आहेत. केवळ दोन दिवसांत शिक्षक व शिक्षण संस्थांकडून माहिती मागविण्यात आली आहे. या सर्व घाईगर्दीच्या प्रक्रियेवर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने आक्षेप नोंदविला आहे. या प्रक्रियेत घोडेबाजाराला उत्तेजन मिळणार असल्याचा आरोप करून अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या न्यायालयात घेऊन जाणार असल्याची माहिती दिली आहे.पुणे येथील शिक्षण आयुक्तांनी महाराष्ट्रातील अनुदानित शाळांतील अतिरिक्त शिक्षकांची व रिक्त पदांची संख्या १६ आॅगस्ट २०१६ रोजी प्रसिद्ध केली. या परिपत्रकानुसार अतिरिक्त झालेल्या व रिक्त पदे असलेल्या शाळांना २० आॅगस्टला सायंकाळी ५ वाजेपर्यंत हरकती घेण्याबाबत उल्लेख होता. या हरकतीवर २२ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत माध्यमिक शिक्षणाधिकारी निर्णय घेऊन अंतिम यादी प्रसिद्ध करणार आहेत. त्यानंतर २४ व २५ आॅगस्टला समायोजनाची प्रक्रिया सुरू होणार आहे.अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना त्यांची बाजू व्यवस्थितपणे मांडता यावी, याकरिता हा कार्यक्रम पुढे ढकलून नव्याने जाहीर करण्यात यावा. जेणेकरून ‘चोर सोडून सन्याशाला फाशी’ असा प्रकार होऊ नये, यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात येईल, असे नागपूर विभागाचे उपाध्यक्ष रंजीव श्रीरामवार, रमेश चिकाटे, दिवाकर पुद्धटवार, विनय कावडकर, अरुण रहांगडाले, दिलीप मैकलवार आदींनी कळविले आहे. (प्रतिनिधी)अनेक शिक्षक वंचित राहणारया संदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दोन प्रकारचे फार्म वाट्सअपवर टाकलेले आहेत. त्यातील एक अतिरिक्त शिक्षकांसाठी असून त्यामध्ये संस्थेचा अभिप्राय मागीतला आहे. त्यासाठी शिक्षकांना अवधीच मिळाला नाही. दुसरा संस्थेसाठी आहे, हे दोन्ही फार्म २० आॅगस्टला संबंधितांना भरून शिक्षण विभागाला देणे आवश्यक होते. २१ आॅगस्टला रविवार आणि २२ आॅगस्टला सुनावणी असल्यामुळे अनेक अतिरिक्त शिक्षक व संस्थाचालक फार्म भरू शकले नाहीत. त्यामुळे व्यक्तिगत स्वरूपात सुनावणीपासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे. संस्थाचालक किंवा शिक्षक हजर नसल्यास एकतर्फी निकाल जाहीर करणार आहेत. त्यात एकाच दिवशी एवढ्या सुनावण्या घेतल्यास शिक्षकांना न्याय मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. यात ‘घोडे बाजार’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.