शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

घाईगडबडीच्या सुनावणीमुळे अतिरिक्त शिक्षक पुन्हा अडचणीत

By admin | Updated: August 22, 2016 01:48 IST

माध्यमिक विभागातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी शिक्षणाधिकारी सुनावणी घेऊन आज २२ आॅगस्टला निर्णय घेणार आहेत.

मराशिपची तक्रार : पालकमंत्र्याकडे धाव घेणारचंद्रपूर : माध्यमिक विभागातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी शिक्षणाधिकारी सुनावणी घेऊन आज २२ आॅगस्टला निर्णय घेणार आहेत. केवळ दोन दिवसांत शिक्षक व शिक्षण संस्थांकडून माहिती मागविण्यात आली आहे. या सर्व घाईगर्दीच्या प्रक्रियेवर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने आक्षेप नोंदविला आहे. या प्रक्रियेत घोडेबाजाराला उत्तेजन मिळणार असल्याचा आरोप करून अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या न्यायालयात घेऊन जाणार असल्याची माहिती दिली आहे.पुणे येथील शिक्षण आयुक्तांनी महाराष्ट्रातील अनुदानित शाळांतील अतिरिक्त शिक्षकांची व रिक्त पदांची संख्या १६ आॅगस्ट २०१६ रोजी प्रसिद्ध केली. या परिपत्रकानुसार अतिरिक्त झालेल्या व रिक्त पदे असलेल्या शाळांना २० आॅगस्टला सायंकाळी ५ वाजेपर्यंत हरकती घेण्याबाबत उल्लेख होता. या हरकतीवर २२ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत माध्यमिक शिक्षणाधिकारी निर्णय घेऊन अंतिम यादी प्रसिद्ध करणार आहेत. त्यानंतर २४ व २५ आॅगस्टला समायोजनाची प्रक्रिया सुरू होणार आहे.अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना त्यांची बाजू व्यवस्थितपणे मांडता यावी, याकरिता हा कार्यक्रम पुढे ढकलून नव्याने जाहीर करण्यात यावा. जेणेकरून ‘चोर सोडून सन्याशाला फाशी’ असा प्रकार होऊ नये, यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात येईल, असे नागपूर विभागाचे उपाध्यक्ष रंजीव श्रीरामवार, रमेश चिकाटे, दिवाकर पुद्धटवार, विनय कावडकर, अरुण रहांगडाले, दिलीप मैकलवार आदींनी कळविले आहे. (प्रतिनिधी)अनेक शिक्षक वंचित राहणारया संदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दोन प्रकारचे फार्म वाट्सअपवर टाकलेले आहेत. त्यातील एक अतिरिक्त शिक्षकांसाठी असून त्यामध्ये संस्थेचा अभिप्राय मागीतला आहे. त्यासाठी शिक्षकांना अवधीच मिळाला नाही. दुसरा संस्थेसाठी आहे, हे दोन्ही फार्म २० आॅगस्टला संबंधितांना भरून शिक्षण विभागाला देणे आवश्यक होते. २१ आॅगस्टला रविवार आणि २२ आॅगस्टला सुनावणी असल्यामुळे अनेक अतिरिक्त शिक्षक व संस्थाचालक फार्म भरू शकले नाहीत. त्यामुळे व्यक्तिगत स्वरूपात सुनावणीपासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे. संस्थाचालक किंवा शिक्षक हजर नसल्यास एकतर्फी निकाल जाहीर करणार आहेत. त्यात एकाच दिवशी एवढ्या सुनावण्या घेतल्यास शिक्षकांना न्याय मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. यात ‘घोडे बाजार’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.