शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

जिल्ह्यातील नागरिकांसह, पशु-पक्ष्यांनाही उन्हाच्या दाहकतेचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:08 IST

दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून तापमानही ४५ ते ४७ अंश सेल्सीअसवर गेले आहे. त्यामुळे सर्वांनाच या वाढत्या उन्हाचा फटका बसत आहे. नागरिकांसह पशुपक्षांच्याही दिनचर्येवर यामुळे परिणाम पडला आहे. विशेष म्हणजे, दिवसभर पक्षी नजरेतही दिसत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून तापमानही ४५ ते ४७ अंश सेल्सीअसवर गेले आहे. त्यामुळे सर्वांनाच या वाढत्या उन्हाचा फटका बसत आहे. नागरिकांसह पशुपक्षांच्याही दिनचर्येवर यामुळे परिणाम पडला आहे. विशेष म्हणजे, दिवसभर पक्षी नजरेतही दिसत नाही.रोज दिवसभर नजरेस पडणारे पक्षी सध्या उन्हाच्या तीव्रतेपासून स्वत:चा बचाव करीत आहे. दुपारच्या सुमारास रस्त्यावर वाहनांचा शुकशुकाट असतो. अलिकडे बदललेल्या तापनामाचा फटका शहराबरोबर ग्रामीण भागावरही पडला आहे.यापूर्वी ग्रामीण भागात भरपूर झाडे-झुडपे बघायला मिळत होते. परंतु, अलिकडे या सर्व बाबी नष्ट होताना दिसत आहेत. शासनाच्या विविध योजनांमुळे ग्रामीण भागाचेही चित्र पालटले आहे. गावातील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते, घरांमध्ये झाडाझुडपांचा अभाव यामुळे ग्रामीण भागातही तापमानाने उच्चांक गाठला आहे.ग्रामीण भागात शेतकरी व मजुरवर्ग मोठ्या प्रमाणता आहे. हे दोन्ही वर्ग श्रमिक आहेत. या दोन्ही वगार्तील लोकांचा चरितार्थ चालविण्यासाठी उन, वारा, पाऊस झेलून काम केल्याशिवायच गत्यंतर नाही. मोठमोठ्या इमारती झोपडी व झाडांच्या आडोशाला घरटी बांधून राहणाऱ्या पक्ष्यांना आपले अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.दिवसभर घराच्या किंवा मानवी वस्तीत उन्हाची तीव्रता वाढल्याने अनेक पक्षी नजरेस पडत नाहीत. नागरिकांचा निसर्गात वाढता हस्तक्षेप व त्यामुळे निर्माण झालेल्या तापमानात वाढ याचाच हा दुष्परिणाम असल्याचे जाणकारांचे मत आहे.निसगार्चा समतोल राखण्यासाठी प्रत्येक घरट्यांचे अस्तित्व महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक उन्हाळ्यात वाढत जाणारे तापमान पक्ष्यांसाठी घातक आहे.वाढत जाणाºया उन्हापासून बचाव करण्यासाठी बºयाच पक्ष्यांनी झाडे, झुडपे, घरे, इमारतीमध्ये आश्रय घेतला असून या पक्ष्यांना पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे म्हणून पक्षीप्रेमी पक्ष्यांसाठी सहानुभमी दर्शवित असले तरी वाढत्या उन्हामुळे पक्षी मिळेल त्या ठिकाणी स्थलांतरित होत असून उन्हापासून बचाव करीत आहे. वाढत्या उन्हाचाही पक्षांवर मोठा फरक जाणवू लागला आहे.