शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

समाजकार्याचे विद्यार्थी घडविणार आदर्श गाव

By admin | Updated: February 14, 2016 01:10 IST

भारतातील बहुसंख्य युवापिढी खेड्यांमध्ये वसलेली आहे. देशाचा विकास करायचा असेल तर ग्रामीण भागाचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे.

वतन लोणे घोडपेठ भारतातील बहुसंख्य युवापिढी खेड्यांमध्ये वसलेली आहे. देशाचा विकास करायचा असेल तर ग्रामीण भागाचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. या संकल्पनेतून प्रेरणा घेवून समाजकार्य विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी भद्रावती तालुक्यातील गोरजा हे गाव पाच वर्षांसाठी दत्तक घेतले आहे. आगामी काळामध्ये गोरजा या गावाला आदर्श रूप देण्यासाठी हे विद्यार्थी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत.शैक्षणिक अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूरद्वारा संचालित सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज आॅफ सोशल वर्क पडोलीच्यावतीने गोरजा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात ग्रामीण समाजकार्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.अंदाजे ७५० लोकसंख्येचे गोरजा हे गाव चंद्रपूर-नागपूर महामार्गापासून चार किलोमीटर आतमध्ये आहे. देशात एकीकडे बुलेट ट्रेन धावत असताना या गावामध्ये अद्याप महाराष्ट्र शासनाच्या एसटी महामंडळाची बस पोहोचली नाही. ९० टक्के शेतकरी कुटुंबसंख्या असलेल्या या गावातील नागरिकांना आजही आरोग्य, वीज, रस्ते, पाणी, स्वच्छता यांसारख्या मूलभूत प्रश्नांनाच सामोरे जावे लागत आहे.शासनदरबारीही उपेक्षित असलेल्या गोरजा या गावाला समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली आणि आठ दिवसीय निवासी ग्रामीण समाजकार्य शिबिराचे आयोजन केले. त्यामुळे नागरिकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. सर्व गोरजावासीयांनी शिबिरार्थींचे स्वागत केले तसेच सहकार्यही केले.गोरजा येथे सध्या महिला बचत गट, पुरूष बचत गट, भजनमंडळ, गुरूदेव सेवा मंडळ, शाळा व्यवस्थापन समिती, युवक मंडळ, क्रीडा मंडळ, तंटामुक्त समिती यांसारख्या शासकीय व खासगी अशा एकूण दोन डझनांपेक्षाही जास्त समित्या आहेत. या शासकिय, निमशासकीय व खासगी समित्यांना कार्यरत करून व त्यांच्या मार्फतीने राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या विकासात्मक विविध योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच ग्रामपंचायत व ग्रामसभा यांच्यात योग्य समन्वय साधून व लोकांच्या सहभागातून गावाची सामाजिक, आर्थिक, भौगोलिक व राजकिय उन्नती करण्यासाठी विद्यार्थ्यांतर्फे कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.ग्रामपंचायत व ग्रामसभा यांच्यात योग्य समन्वय साधून कृती आराखड्यानुसार गावाचा विकास साधण्यासाठी ग्रामविकास समितीची स्थापना करण्यात आली आहे.सुशीलाबाई रामचंद्रराव मामिडवार कॉलेज आॅफ सोशल वर्क पडोलीचे प्राचार्य डॉ. सुनील साकुरे यांच्या मार्गदर्शनात प्रा. डॉ. ममता ठाकूरवार, प्रा. सुभाष गिरडे, प्रा. किरणकुमार मनुरे हे या समितीचे समन्वयक असणार आहेत.यावेळी प्रबोधनासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. शिबिरार्थींच्या प्रयत्नाने येणा-या काळात गोरजा हे आदर्श गाव बनेल, असा आशावाद नागरिकांनीही व्यक्त केला आहे.