शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

जंगलालगतच्या शेतात वणवा लावल्यास होईल कारवाई; वनविभागाने शेतकऱ्यांना बजावल्या नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 13:51 IST

यंदा वनविभाग कडक : २ वर्षे कारावासाची शिक्षाही जंगलात वणवा लावणाऱ्याला ठोठावली जाऊ शकते.

प्रवीण खिरटकर लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : शेतात उन्हाळ्यामध्ये पिके नसतात. शेतीची मशागत करताना शेतकरी शेतात वणवा लावतात. हा वणवा कधीकधी जंगलात जात असतो. त्यामुळे जंगलातील झाडे व वन्यप्राण्यांना त्याची मोठ्या प्रमाणात झळ पोहोचते. सध्या राज्यातील वनविभाग अॅक्शन मोडवर आला असून, जंगलालगतच्या शेतामध्ये वणवा लावण्याआधी वनविभागास कळवावे, अन्यथा वनविभाग कायदेशीर कारवाई शेतकऱ्यावर करणार आहे. याबाबतच्या नोटीस वनविभागाने शेतकऱ्यांना दिल्या आहेत.

उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. पानझळ सुरू झाली असल्याने झाडाची पाने पूर्णतः सुकलेली आहेत. जंगलात मोहफूल वेचताना तसेच तेंदूपत्ता गोळा करताना आग लावण्याचे प्रकार आढळून येतात. तसेच शेतकरी शेतातील गवत पुढील हंगामात येऊ नये, याकरिता शेतातील धुन्ऱ्यावर वणवा लावतात. वणवा लावल्यानंतर ती आग पूर्णपणे विझली की नाही, याची शहानिशा कुणीच करताना दिसत नाही. आग विझली नाही तर ती हवेने जंगलात पसरते. अशा प्रकारे जंगलाला आग लागल्याच्या अनेक घटना उन्हाळ्यामध्ये घडत असतात. एकदा जंगलाला आगेची झळ बसल्यास नवीन रोपे तयार होत नाही. वनस्पती नष्ट होतात. वन्यप्राणी आगीमुळे आपला मूळचा अधिवास सोडून इतरत्र भटकंती करतात. 

अशी आहे शिक्षेची तरतूदवनविभागात वणवा लावताना पूर्वसूचना दिली नाही, हा वणवा जंगलात पोहोचलास त्या शेतकऱ्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व भारतीय वन अधिनियम १९२७ यानुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे. नुकसानीची किंमत आणि पाच हजार रुपये दंड व दोन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली जाते. 

जाळरेषा ठरते महत्त्वाचीजाळ रेषेमुळे वणवा जंगलात पसरू शकत नाही. वनातील विविध प्रजातीच्या वनस्पतीचे संरक्षण होण्यास यामुळे मोठी मदत होते. त्यामुळे वनविभागातर्फे उन्हाळ्यात दरवर्षी अशा प्रकारे जाळ रेषा काढली जाते. तीन मीटर, सहा मीटर, नऊ मीटर, बारा मीटर आधी प्रकारानुसार जाळ रेषा काढली जाते. ती महत्त्वाची असते. 

"जंगलालगतच्या शेतकऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे शेतात वणवा लावण्यापूर्वी वनविभागास कळवावे. त्यामुळे वनविभाग सहकार्य करेल."- सतीश शेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वरोरा

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर